रविवार, एप्रिल २४, २०११

बहुजनांनो आत्मपरीक्षण करा

विषमतावादी ब्राम्हणी व्यवस्थेच्या दलदलीत रुतून बसल्यामुळे बहुजन समाजाची म्हणावी तशी प्रगती झाली नाही. हजारो वर्षे बहुजन समाजावर इथल्या व्यवस्थेने अन्यायच केलेला आहे. बहुजनांच्या या परिस्थितीला अन्याय करणारी सनातनी भिक्षुकशाही जेवढी जबाबदार आहेत तेवढेच अन्याय सहन करणारेही बहुजनही जबाबदार आहेत. बहुजन समाजाला ब्राम्हणी गुलामीतून बाहेर काढण्यासाठी बुद्ध-महावीरांपासून फुले-शाहू-आंबेडकर आणि बळीराजा, सम्राट अशोकापासून शिवरायांपर्यंत अनेक महापुरुषांनी आपले आयुष्य खर्ची घातले. काहींनी सामाजिक चळवळी उभारून तर काहींनी राजकीय चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या प्रगतीला, विकासाला चालना दिली. तरी अजूनही हा समाज या गुलामीतून पुरता बाहेर पडलेला नाही. कोणत्याही समाजाला स्वतःवरील अन्यायाची जाणीव झाल्याशिवाय तो अन्यायाविरुद्ध पेटून उठत नाही. बहुजन समाजाला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची पूर्णपणे जाणीव...

बुधवार, एप्रिल २०, २०११

ही बहुजनांची संस्कृती नाही

गेले काही दिवस बहुजन चळवळीतील कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी खरा इतिहास मांडणे आणि खोटया व विकृत इतिहासाला विरोध करणे यात बहुजन तरुणांनी आघाडी घेतली आहे. जिथे क्रिया आहे तिथे ओघानेच प्रतिक्रिया येणारच. बहुजनांचा इतिहास विकृत करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला विरोध होणारच. दीडशे वर्षापूर्वी महात्मा फुले व सावित्रीमाई या दाम्पत्याने बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्याअगोदर अपवादानेच बहुजन समाजातील लोक शिक्षण घेत होते. सामान्य बहुजन समाजाला तर शिक्षणाची दारे पूर्णपणे...

शनिवार, एप्रिल १६, २०११

अण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न

सध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटवर कुठेही जा...एकाच गोष्टीची चर्चा...अण्णा हजारेंचे आंदोलन. एका रात्रीत अण्णांना देवत्व बहाल करण्यात आले. आण्णा म्हणजे या देशातील सर्व सामन्यांचे मसीहा, तारणहार अशा प्रकारची मांडणी केली गेली. काही उत्साही अण्णाप्रेमी तर घोषणाच देत होते, ‘अण्णा हजारे आंधी है, देश कें दुसरे गांधी है’. गांधींना पण बरे वाटले असेल...चला एकदाचा दुसरा गांधी तयार झाला (कि केला) तर...समाजात अण्णा हजारे म्हणजे दुसरे गांधी आहेत असे मानून त्यांच्या आंदोलनाची, उपोषणाची भरपूर चर्चा केली गेली....

गुरुवार, एप्रिल १४, २०११

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १७ - फेरआढावा, परिशिष्टे

फेरआढावा समाज जीवन प्रवाही असते. त्‍यामुळे सांस्‍कृतिक बाबींचे स्‍वरुप काळाच्‍या ओघात बदलत असते. समाजाच्‍या आकांक्षा आणि गरजा यातही बदल होत असतो. पुढच्‍या काळात विविध क्षेत्रातील तज्‍ज्ञांकडून आणि सर्वसामान्‍य नागरिकांकडून या धोरणाच्‍या संदर्भात ज्‍या सूचना प्राप्‍त होतील, त्‍यांमधून समाजाच्‍या या आकांक्षा आणि गरजा व्‍यक्‍त होतील. स्‍वाभाविकच, या धोरणात समाविष्‍ट...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १६ - संकीर्ण

भाषा, साहित्‍य, कला इ. प्रकारच्‍या वर्गीकरणात चपखलपणे समाविष्‍ट होऊ न शकणा-या, तथापि सांस्‍कृतिक दृष्‍टया ज्‍यांची नोंद करणे अत्‍यावश्‍यक आहे, अशा काही महत्‍त्‍वपूर्ण बाबींचा ‘संकीर्ण’ या गटामध्‍ये अंतर्भाव करण्‍यात आला आहे. १. सामाजिक सलोखा – आपला समाज वेगवेगळी जीवनशैली असलेल्या जनसमूहांनी बनलेला आहे...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १५ - क्रीडासंस्कृती

क्रीडा हे मानवाला श्रमदास्‍यातून मुक्‍त करणारे आणि व्‍यक्‍तीला अन्‍य व्‍यक्‍तीशी/व्‍यक्‍तींशी केल्‍या जाणा-या निकोप स्‍पर्धेतून उच्‍च कोटीचा आनंद देणारे मानवी संस्‍कृतीचे कलेइतकेच महत्‍त्‍वाचे अंग आहे. आरोग्‍य, मानसिक संतुलन, अन्‍य व्‍यक्‍तींबरोबरचे योग्‍य समायोजन, ताण सहन करण्‍यासाठीचे मनोबळ, पराभव पचवण्‍याची आणि यश नम्रपणे स्‍वीकारण्‍याची संयत वृत्‍ती इ. सांस्‍कृतिक गुणांचे संवर्धन करण्‍याच्‍या दृष्‍टीन...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १४ - महिलाविषयक सांस्कृतिक दृष्टिकोण

स्त्रीविषयक जीवनमूल्यांचा विचार केल्याखेरीज सांस्कृतिक जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. आपल्या समाजातील काही विवेकी लोक स्त्रीचे सांस्कृतिक जीवनातील उचित स्‍थान ओळखत होते. परंतु त्याच वेळी स्त्रीचा अनादर करणार्‍या काही प्रथाही आपल्या समाजात अस्तित्वात होत्या. महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक स्त्री-पुरुषांनी केलेला त्याग व संघर्ष यांच्यामुळे अशा प्रथा दूर करण्याच्या बाबतीत अनुकूल ...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १३ -स्‍मारके आणि पुरस्कार

समाजाला असाधारण योगदान देणार्‍या स्त्री-पुरुषांची मोठी मालिका महाराष्ट्राच्या इतिहासात निर्माण झालेली आहे. अशा व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारणे वा त्यांच्या नावाने विशिष्ट पुरस्कार देणे होय. १. स्मारक सल्लागार समिती - शासनातर्फे नवीन स्‍मारकांची निर्मिती करताना संबंधित स्‍मारकाच...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १२ - कला

कला ही निसर्गनिर्मित सृष्टीला अधिक रमणीय बनविणारी मानवनिर्मित प्रतिसृष्टी असते. ती मानवाच्या अस्तित्वाला अधिक सुंदर बनविते. त्याच्या अंतर्बाह्य जीवनसत्त्वाला आविष्कृत करते, माणसा-माणसाला प्रसन्नपणे जोडते आणि समग्र मानवी जीवनाला आनंदमय करते. कोणत्याही कलाक्षेत्रातील कामगिरी हा त्या समाजाच्या नवनिर्माणक्षम प्रज्ञेचा एक अत्यंत महत्त्वाचा मापदंड असतो. माणसाच्या मनुष्यत्वाला उन्नत व...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ११ - प्राच्यविद्या

पौर्वात्य देशांच्या सर्वांगीण अभ्यासासाठी विकसित करण्यात आलेली ज्ञानशाखा म्हणजे प्राच्यविद्या. भारतविषयक अशाच अभ्यासासाठी असलेल्या ज्ञानशाखेला भारतविद्या म्हणतात. प्राचीन/प्राचीनोत्तर भूतकालीन पदार्थ व घटना यांचे अध्ययन इ. करणारी पुरातत्त्वविद्या, महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी असलेले पुराभिलेखागार इत्यादींचा अंतर्भाव प्राच्यविद्येच्या क्षेत्रात होतो. प्राचीन वास्तू , उत्खननात सापडलेल्या वस्तू...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १० - लेखन

१. युनिकोडचा अधिकृत वापर – संगणक माध्यमात देवनागरी लिपीच्या उपयोगाबाबत सर्वत्र एकवाक्यता नसल्याने मराठीतून संगणकीय संवाद साधण्यास मर्यादा येतात. म्‍हणून, जागतिक पातळीवर सर्व प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन युनिकोडच्या अंतर्गत विकसित केलेल्या देवनागरी लिपीच्या प्रमाणित संस्करणाचा शासनव्यवहारात अधिकृत वापर करणे बंधनकारक करण्यात येईल. त्यामुळे सर्वसामान्य जनता आण...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ९ - अमराठी भाषकांसाठी उपक्रम

१. अन्य भाषांसाठी अकादमी - महाराष्ट्र शासनाने हिंदी, गुजराती, सिंधी आणि उर्दू भाषांतील साहित्यासाठी चार स्वतंत्र अकादमी स्थापन केल्या आहेत. यांपैकी प्रत्येक अकादमीला दरवर्षी आवश्यकतेनुसार पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. या अकादमींची माहिती गुजरात शासनाला कळविण्यात येईल. गुजरात राज्याची मातृभाषा असलेल्या गुजराती भाषेची अकादमी महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली आहे...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ८ - अनुवाद

१. मराठीचा वापर व दुभाषांची मदत - राज्य शासनाचे मंत्री, प्रशासकीय प्रमुख, तसेच विभागप्रमुख इ. मान्यवरांनी शासकीय, सार्वजनिक कार्यक्रमांत बोलताना शक्यतो मराठी भाषेत बोलावे, अशी अपेक्षा ठेवण्यात येईल. अमराठी, विशेषत: परदेशांतील प्रतिनिधी यांच्या समवेत होणा-या अधिकृत बैठका/ कार्यक्रम यांमध्ये संवाद साधताना मराठीचे भाषांतर करण्यासाठी दुभाषाची/ अनुवादकाची मदत घेण्यात येईल. त्यामुळे मराठीचे...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ७ - बृहन्महाराष्ट्र

१. बृहन्महाराष्ट्र परिचय पुस्तिका - बृहन्महाराष्ट्रातील तसेच विदेशांतील मराठी भाषकांच्या संस्थांचे स्वरूप, उद्दिष्टे, कार्य इत्यादींचा परिचय करून देणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात येईल. ‘राज्य मराठी विकास संस्था’ यासाठी योजना तयार करील व राबवील. २. बृहन्महाराष्ट्र मंडळे साहाय्य - महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांना तसेच ...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ६ - ग्रंथसंस्कृती

१. कोश-आवृत्त्या - विषयवार परिभाषा कोशांच्या सुधारित व संवर्धित आवृत्त्या प्रकाशित करण्यात येतील आणि त्या मराठी भाषकांना सहज प्राप्त होतील, अशी व्यवस्था करण्यात येईल. सर्व अनुदानित सार्वजनिक ग्रंथालयांना तसेच शाळा / महाविद्यालये / विद्यापीठे यांना हे कोश विकत घेणे बंधनकारक करण्यात येईल. २. विश्वकोश प्रकल्पाला चालना –...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ५ - लोकसंस्कृती

१. लोकसाहित्य समिती - लोकसाहित्याचे संकलन व प्रकाशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या लोकसाहित्य समितीला अधिक आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या समितीचे कार्य अधिक व्यापक करण्यात येईल. २. आदिवासी कोश - महाराष्ट्रातील आदिवासींचा सामाजिक-सांस्कृतिक-मानववंशशास्त्रीय दृष्ट्या समग्र ...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ४ - भाषा आणि साहित्य

ज्ञानाचे संचयन आणि संक्रमण स्थलकालांच्या मर्यादा ओलांडू शकते, ते प्रामुख्याने भाषेमुळेच होय. संगीतनृत्यांपासून ते चित्रशिल्पांपर्यंत नानाविध कलांना अधिक आस्वाद्य बनविण्याचे कार्यही भाषा नक्कीच करते. ती एकीकडे व्याकरणाच्या आणि लेखनपद्धतीच्या नियमांचा मानही राखते आणि दुसरीकडे काळाच्या ओघात त्या नियमांच्या संहितेला वेगळे वळण देऊन आशयाला सतत ताजेपणाही देत राहते. ती ललित साहित्यापासून ते गंभीर विवेचनापर्यंत विविध मार्गांनी अंतर्बाह्य सृष्टीला अभिव्यक्त करते. भाषेचे हे अंगभू...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ३ - अग्रक्रम

प्रस्तुत सांस्कृतिक धोरणात अंतर्भूत करण्यात आलेल्या सर्वच बाबी आपापल्या परीने महत्त्वाच्या असल्यामुळे त्यांच्या संदर्भातील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल. तथापि या समग्र धोरणाची अंमलबजावणी योग्य त्या कार्यक्षमतेने करण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक क्षेत्रातील काही मूलभूत बाबींच्या पूर्ततेकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अशा काही बाबींची नोंद या धोरणाच्या प्रारंभी अग्रक्रम म्हणून करण्यात आली असून शासन त्यांची अंमलबजावणी तत्परतेने करील...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- २ - धोरणाची पायाभूत तत्‍त्‍वे

महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या स्‍थापनेला यंदा पन्‍नास वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यस्थापनेपासूनच या संपूर्ण कालखंडात महाराष्ट्र शासनाने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. तरीही सांस्‍कृतिक क्षेत्रात आतापर्यंत झालेल्‍या महाराष्‍ट्राच्‍या प्रवासाचा आढावा घेणे आणि भावी वाटचालीचे नियोजन करणे, या दृष्‍टीने हा क्षण निर्णायक महत्त्वाचा आहे. हे महत्त्व ध्यानात घेऊन आणि राज्‍यस्‍थापनेच्या सुवर्णमहोत्‍सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्याचे सांस्कृतिक धोरण निश्चित केले आहे....

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १ - भूमिका

कोणत्याही समाजाच्‍या प्रतिभेचा सर्वांगीण असा सामूहिक आविष्‍कार त्या समाजाच्‍या सांस्‍कृतिक मूल्‍यांमधून होत असतो. प्रकृतीवर म्‍हणजेच निसर्गाकडून जे काही प्राप्‍त झालेले असते त्‍यावर आपल्‍या विविधांगी सर्जनशीलतेच्‍या आधारे संस्‍कार करून मानव जे काही निर्माण करतो, ती त्‍याची संस्‍कृती होय. प्रत्‍येक व्‍यक्‍तीची संस्‍कृती ही दुस-या व्‍यक्‍तीच्‍या संस्‍कृतीहून...

बुधवार, एप्रिल १३, २०११

बाबासाहेबांच्या गौरवशाली कार्य आणि विचारांना विनम्र अभिवादन.......

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बहुजन स्वातंत्र्याला कायद्याचे अधिष्ठान मिळवून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल हा जन्मदिवस. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त बहुजन समाजाला स्वाभिमानाने जगण्यासाठी आपल्या विचार आणि आचारातून भक्कम वैचारिक बळ दिले. बाबासाहेबांच्या विचारांना स्मरून बहुजन समाजाने शैक्षणिक, सामाजिक आणि ...आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाने गरजेचे आहे. जातीपातीच्या राक्षसाला गाडून टाकून सर्व भारतात बुद्धविचाराचा प्रसार करण्यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे. बाबासाहेबांना अपेक्षित प्रबुद्ध भारत घडवणे हे आपले लक्ष्य आहे. ...

सोमवार, एप्रिल ११, २०११

महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन....

महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला. महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते. बळीराजा आणि इतर असुर हे आमचे खरे पूर्वज आहेत हे सत्य महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितले. बहुजन समाजाला शैक्षणिक दृष्ट्या सबळ बनवून ब्राम्हणी वर्चस्वाला खिंडार पाडले. बहुजनांचे खरे महानायक आणि त्यांचे खरे स्वरूप फुल्यानीच समजावून सांगितले. ...

गुरुवार, एप्रिल ०७, २०११

क्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख

विश्वचषक अंतिम सामन्यात भारत विजयी झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत बी.सी.सी.आय. ने प्रत्येक खेळाडूला एक करोड रुपये देण्याची घोषणा केली.  भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला आणि  गर्भश्रीमंत असणाऱ्या सर्व खेळाडूंवर बक्षिसांच्या रुपाने करोडो रुपयांची उधळण झाली.  खेळाडूंना पैसा देण्यास आमचा विरोध नाही. परंतु क्रिकेटकडे इतके लक्ष देत असताना या देशातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न नजरेआड करून चालणार नाहीत.  जे लोक  देशासाठी आपली जमीन देतात. त्यांच्या जमिनीवर अनेक प्रकल्प उभे राहतात, त्या लोकांना मात्र आपले गाव सोडून आश्रीतासारखं दुसऱ्याच्या गावात राहायला लागतं. त्यांच्या मुला-बाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. या सर्व समस्या सोडवण्यासाठी हजारो लोक दररोज संघर्ष करत आहेत. खेळाडूंना सामना जिंकल्यावर बक्षीस देण्यासाठी जशी...

Page 1 of 3712345Next

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes