बुधवार, एप्रिल २०, २०११

ही बहुजनांची संस्कृती नाही

गेले काही दिवस बहुजन चळवळीतील कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी खरा इतिहास मांडणे आणि खोटया व विकृत इतिहासाला विरोध करणे यात बहुजन तरुणांनी आघाडी घेतली आहे. जिथे क्रिया आहे तिथे ओघानेच प्रतिक्रिया येणारच. बहुजनांचा इतिहास विकृत करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला विरोध होणारच. दीडशे वर्षापूर्वी महात्मा फुले व सावित्रीमाई या दाम्पत्याने बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्याअगोदर अपवादानेच बहुजन समाजातील लोक शिक्षण घेत होते. सामान्य बहुजन समाजाला तर शिक्षणाची दारे पूर्णपणे बंदच होती. त्यामुळे कितीही खोटा इतिहास मांडला गेला तरीही बहुजन समाजाची त्यावर कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. बहुजन समाजाला गुलामीत लोटण्याचे षडयंत्र राबवले गेले तरी बहुजन समाज त्याविरुद्ध पेटून उठत नव्हता. 

पण आज काळ बदललाय. फुले दाम्पत्याने केलेल्या सामाजिक, शैक्षणिक क्रांतीमुळे बहुजन समाज जागृत होवू लागला आहे. पंडितांच्या कोंडीत सापडलेली शिक्षणाची गंगा फुले दाम्पत्याने बहुजनांच्या घराघरात पोहचवली. पुढे शाहूंनी तोच वारसा चालू ठेवला. डॉ. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून बहुजन समाजाला आपले हक्क-अधिकार बहाल केले गेले. आता बहुजन समाज शिकतोय, अभ्यास करतोय, चिंतन करतोय ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे सध्याच्या काळात कुणी खोटा इतिहास निर्माण करण्याचा किंवा बहुजन समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर बहुजन त्याची चिकित्सा करू लागला आहे. बहुजन समाजातील तरुणांमध्ये तर कमालीचा उत्साह आहे. कारण गेली पाच हजार वर्षे गुलामीची काळीकुट्ट रात्र अनुभवल्यानंतर नुकतीच कुठे स्वातंत्र्याची पहाट दिसू लागली आहे. त्यामुळे बहुजन तरुण उत्साहाने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ पुढे नेत आहे.

परंतु हे सर्व करत असताना आपण जे विचार मांडतोय त्यात उत्साहाच्या भरात किंवा आतापर्यंत ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्याबद्दलच्या रागामुळे द्वेष दिसू लागला आहे. समोरच्या व्यक्तीने किंवा प्रवृत्तीने ज्या भाषेत मांडणी केली आहे त्याच भाषेत बहुजन त्यांना उत्तर देवू लागले आहेत.त्यामुळे चळवळीच्या अवतीभोवती एक द्वेषमुलक वातावरण तयार होत आहे. द्वेषावर आधारित चळवळ टिकू शकत नाही हा इतिहास आहे. अशा चळवळीला थोड्याच दिवसात कमालीची लोकप्रियता प्राप्त होते, परंतु लगेच तिच्या संपण्याचीही प्रक्रिया चालू होते. हिटलरची चळवळ द्वेषावर आधारित होती. हजारो ज्यूंची त्याने अमानुष कत्तल केली होती. हिटलरच्या अतिरेकामुळे हिटलर तर संपला पण त्याची चळवळही संपली. बहुजनांची चळवळ जर संपू नये किंवा तिला नकारात्मक प्रसिद्धी मिळू नये असे वाटत असेल तर बहुजनांनी आपल्या चळवळीची दिशा ठरवली पाहिजे. भडक न लिहिता वैचारिक मांडणी करता येवू शकते हे डॉ. आ. ह. साळुंखेनी आपल्या लेखणीतून दाखवून दिले आहे. डॉ. आ. ह. साळुंखे सरांनी आजपर्यंत ३०-३५ पुस्तके लिहिली. शेकडो लेख लिहिले आणि हजारो व्याख्याने दिली. परंतु कधीही द्वेषमुलक विचार मांडला नाही. त्यांच्या मांडणीत एक प्रकारचा विवेक दिसून येतो. डॉ. साळुंखे सर बहुजनीय चळवळीचे मार्गदर्शक आणि जेष्ठ विचारवंत, अभ्यासक आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर बहुजन समाज चळवळीची दिशा ठरवणार असेल तर ही चळवळ दीर्घकाळ टिकू शकेल आणि इच्छित साध्य प्राप्त करता येईल.

बहुजन तरुणांना भडकवण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केले जातात. बहुजनांनी आपला वेळ आणि शक्ती फक्त प्रतिक्रिया देण्यात खर्च करावी यासाठी षडयंत्र रचले जात आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बहुजन या षडयंत्राला बळी पडत आहेत. ज्या लोकांनी बहुजन महामानवांची बदनामी केली त्याना प्रत्युत्तर देताना बहुजन तरुणांची भाषाही घसरते. परिणामी दोन्ही बाजूंकडून वैचारिक वाद-प्रतिवाद होण्याऐवजी शिव्या आणि अश्लील भाषा वापरण्यात येते. बहुजनांनी आपली उज्वल संस्कृती लक्षात घेतली पाहिजे. शिव्या देणे ही आपली संस्कृती नाही. सत्य इतिहास मांडणे हा द्वेष नाही. परंतु ते करत असताना आपली वैचारिक मांडणी मात्र सभ्य भाषेत करावी. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत कोणतीही टिपण्णी करताना विशेष काळजी घ्यावी. स्त्री कोणत्याही जाती-धर्मातील असो, तिची बदनामी करता कामा नये. तिच्याबद्दल अश्लील आणि घाणेरड्या भाषेत आपण लिहिता कामा नये. आपली ती संस्कृती नाही. बहुजन समाजाने नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर केला आहे.

अरे ज्या समाजात बुद्ध, महावीर, सम्राट अशोक, बळीराजादी बहुजन संस्कृतीचे महानायक होवून गेले तो समाज द्वेषमुलक भूमिका घेता कामा नये. या महामानवानी जगाला प्रेमाचा, समतेचा संदेश दिला. तो आपण आत्मसात केला पाहिजे. जग जोडायचे असेल तर ते प्रेमानेच जोडले पाहिजे हा बुद्धविचार आहे. बळीराजासारखा समतेचा महानायक आपल्या समाजात होवून गेला. छ. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे, गाडगेबाबा, तुकोबा, नामदेव, तुकडोजी अशी फार मोठ्या मनाची, मानवतेचा पुरस्कार करणारी माणसे आपल्या समाजात घडली आहेत. जिजाऊ, अहिल्यामाई, सावित्रीमाई, रमाई यासारखी उज्वल स्त्री परंपरा आपल्याला लाभली आहे. आजपर्यंत बहुजन समाजाने अन्याय सहन केला आहे. परंतु अन्याय करावा अशी आपल्या महामानवांची शिकवण नाही. स्वतःच्या घासातील अर्धा घास भुकेल्याला देणे आणि प्रेमाने जग जोडणे ही बहुजनीय संस्कृती आहे. आपण ती लक्षात घेवून प्रेमाचा संदेश समाजात पोहचवला पाहिजे. याचा अर्थ अन्याय सहन करा किंवा विकृतीला विरोध करू नका असा अजिबात नाही. उलट अन्याय आणि विकृतीच्या विरोधात ठामपणे उभे रहा. परंतु ते करत असताना भाषा मात्र सभ्य वापरा. जेणेकरून आपल्या भाषेमुळे बहुजनीय चळवळ बदनाम व्हायला नको.

बहुजन चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे कि आपणाला भडकवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातोय. त्या षडयंत्राला बळी पडू नका. अभ्यासपूर्ण भाषेत समोरच्याचा प्रतिवाद करा. तरच बहुजनीय चळवळीला अधिक झळाळी आणि वैचारिक पावित्र्य प्राप्त होईल.

13 टिप्पणी(ण्या):

Prof. Hari Narke प्रा. हरी नरके म्हणाले...

SAMTOL,VIVEKI,MUDDESUD,MAULIK LEKH.
NEED OF THE HOUR.

अनामित म्हणाले...

Part-1
मराठा समाजाने सामुहिक धर्मांतर करावे
ब्राह्मणी धर्मातील जातीय विखारामुळे व्यथित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागपुरात धर्मांतर केले. हिंदू धर्माचा त्याग करून आपल्या लक्षावधी अनुयायांसह बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. माझ्या मते हिंदूनावाचा धर्मच अस्तित्वात नाही. हिंदू ही एक राजकीय व्याख्या आहे. दिल्ली मस्लिम राज्यकत्र्यांच्या ताब्यात गेल्यानंतर सर्व एतद्देशीयांसाठी हिंदू ही संज्ञा वापरली गेली. वस्तुत: सर्व एतद्दीयांच्या धार्मिक श्रद्धा आणि रीतीरिवाज यात खूप फरक होते, आजही आहेत. या विषयी एक लेख मी यापूर्वीच लिहिला आहे. तो याच ब्लॉगवर उपलब्ध आहे. मी हिंदू धर्माला ब्राह्मणी धर्म (या पुढे या लेखात हिंदू धर्माचा उल्लेख ब्राह्मणी धर्म असाच येईल.) म्हणते. आणि तेच अधिक योग्य आहे, असे माझे ठाम मत आहे. बाबासाहेबांनी ब्राह्मणी धर्म सोडला.
डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर : २० व्या शतकातील सर्वांत मोठी घटना
असो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर ही २० व्या शतकातली या देशातील सर्वांत मोठी घटना होती. त्याचे सामाजिक आणि धार्मिक परीमाण तर झालेच, परंतु राजकीय परीणामही झाले. उत्तर प्रदेशातील आज अस्तित्वात असलेले मायावती यांचे सरकार हे बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या क्रांतीचे फलित होय. बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या भूमीत क्रांतीचे रणशिंग फुंकले त्याची परीपक्व राजकीय फळे उत्तर प्रदेशात पाहायला मिळाली. मायावती यांच्या नेतृत्वाचा वाटा या फळात नक्कीच आहे. तथापि, बाबासाहेबांच्या धर्मांतराचे सर्वंकश परीणाम अजून फलित व्हावयाचे आहेत. बाबासाहेबांचे धर्मांतर होऊन ५० वर्षे उलटून गेल्यानंतरही त्याचे सर्वंकश परीणाम का दिसून येत नाहीत, याची कारणे अनेक आहेत. ब्राह्मणी धर्म हा एक घुय्या (रंग बदलणारा सरडा इंग्रजीत घुय्याला शॅमिलिऑन म्हणतात.) आहे. तो वातावरणाचा परीवेश पाहून रंग बदलतो. हे एक प्रमुख कारण त्यामागे आहे. वैदिक धर्माच्या चिकित्सेत मी ब्राह्मणी धर्माच्या रंगबदलूपणाचा हिशेब मांडला आहे. तो वाचकांनी जरूर पाहावा. ब्राह्मणी धर्म आपल्या छद्मावरणासह टिकवून ठेवण्यात सर्वांत मोठा वाटा ब्राह्मणी धर्माच्या छायेखाली वावरणा जातीसमूहांचा आहे. वस्तूत: हे जातीसमूह ब्राह्मणी जातीसमूहापासून अगदी भिन्न आहेत. त्यांच्या चालीरीती, देवदेवस्की, रोटी-बेटी व्यवहार सगळे काही भिन्न आहे. उदा. जाट, खत्री हे जातीसमूह स्वत:ला हिंदू मानण्यास फार पूर्वीपासून कां कू करीत आले आहेत. महान धर्मसंस्थापक गुरुनानकांच्या नेतृत्वाखाली जाट-खत्री समाज एकवटला. उत्तरेतील इतर काही जातीसमूहांची साथ घेऊन गुरुनानकांनी नवीन धर्माचा प्रकाश जगाला दिला.
वारकरी चळवळ
गुरुनानकांनी उत्तरेत धर्मचळवळ सुरू केली, त्याच्या आधीपासून महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठ्ठल नामक लोकदैवताला मानणारया लोकांची मोठी लोकचळवळ सुरू होती. त्या काळातील सर्व बिगर ब्राह्मणी धार्मिक चळवळींपेक्षा ही चळवळ जास्त शिस्तबद्ध आणि संघटित होती. परंतु या चळवळीतून शीखांसारखा नवा धर्म अस्तित्वात येऊ शकला नाही. याची कारणेही अनेक आहेत. या लोकचळवळीला आद्य शंकराचार्यासारख्या धूर्त ब्राह्मणाने वेदांशी जोडले. पांडुरंगाष्टकम लिहून चळवळीचे सांस्कृतिकरण केले. त्यातून या चळवळीचे लोकपण संपले. त्याबरोबरच नवा धर्म अस्तित्वात येण्याची शक्यताही संपली.

अनामित म्हणाले...

Part-2
महानुभाव चळवळ
महात्मा चक्रधर स्वामी प्रणित महानुभव धर्माने वेदांचे प्रामाण्य उघडपणे नाकारले. आपली स्वतंत्र अवतार व्यवस्था निर्माण केली. पूजापद्धती, संस्कार पद्धती, दीक्षापद्धती आदी सर्व ब्राह्मणी धर्मापासून वेगळे केले. ब्राह्मणी धर्मात स्त्रियांना संन्यास घेण्याची मुभा नव्हती. चक्रधरांनी ती दिली. श्रीचक्रधरांचा प्रभाव एवढा होता की, देवगिरीच्या यादवराजाची महाराणीही श्रीचक्रधरांची शिष्या बनली. श्रीचक्रधरांचे नवे धर्ममत अशाप्रकारे महाराष्ट्राच्या राजवाड्यात, राणीवशात पोहोचले. तरीही नवा धर्म अस्तित्वात आलाच नाही. ब्राह्मणी धर्माचा एक पंथ अशी महानुभवांची ओळख निर्माण झाली.
बिगर ब्राह्मणी चळवलींच्या खांद्यावर ब्राह्मणी धर्माचा झेंडा
वारकरी आणि महानुभाव या दोन्ही चळवळी समतेच्या पायाभवर उभ्या आहेत. श्रीचक्रधरांनी तर गावकुसाबाहेरील वस्तीत भिक्षा मागण्याचे आदेश आपल्या भिक्षूंना दिले, तर नामदेवांनी पंढरपूरच्या वाळवंटात चोखा मेळा यांना छातीशी कवटाळले. या दोन्ही चवळवळी उत्तरेत पंजाबपर्यंत पोहोचल्या. नामदेवांच्या वचनांना शिखांच्या गुरुग्रंथसाहेबात आदराने जागा मिळाली. महानुभाव पंथाचे मठ आजही पंजाबात आहेत. एवढा प्रभाव असतानाही या चळवळी +ब्राह्मणी जोखड झुगारण्याच्या+ आपल्या मूळ उद्देशापासून भरकटल्या. वारकरी चळवळीचे तर मातेरे झाले. ज्यांना वेद वाचण्याचा, ऐकण्याचा आणि पाहण्याचा अधिकार नव्हता, अशा जाती वारकरी चळवळीच्या रूपाने आपल्या खांद्यावर वेदप्रणित ब्राह्मणी धर्माचा भार वाहताना पुढे दिसू लागल्या.

अनामित म्हणाले...

Part-3
चळवळी अपयशी का ठरल्या?
या दोन्ही चळवळी संपूर्ण क्रांती आणण्यात अपयशी का ठरल्या, याची काही ठळक कारणे आहेत. या चळवळीच्या आधी किमान ३०० ते ४०० वर्षे महाराष्ट्रात मजबूत राज्यव्यवस्था होत्या. यादवकाळात या दोन्ही चळवळी ऐनबहरात आल्या. काही तरी नवे घडेल, असे वाटत असतानाच परचक्राचा फेरा आला. अल्लाऊद्दीन खिलजीच्या रूपाने नवे संकट महाराष्ट्रावर आले. त्यामुळे या चळवळींच्या विकासाला पायबंद बसला. नवा विचार मांडण्याचे दिवस संपले. आपले जे काही अर्धे-कच्चे आहे, ते टिकविण्यातच महाराष्ट्राची सर्व शक्ती खर्ची पडली. शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत ही स्थिती कायम होती. तोपर्यंत ब्राह्मणी धर्म सावरला होता. वारकरी आणि महानुभाव या दोन्ही चळवळी ब्राह्मणी धर्माने नेस्तनाबूत केल्या होत्या. ब्राह्मणी धर्माच्या विरुद्ध फळी निर्माण करून जन्माला आलेल्या या चळवळींच्या खांद्यावरच ब्राह्मणी धर्माची पताका आली होती. महाराजांना दीर्घायुष्य लाभते तर कदाचित खरया महाराष्ट्र धर्माचा उदय होऊही शकला असता. कारण आपला राज्याभिषेक महाराजांनी ब्राह्मणी वैदिक पद्धतीने करवून घेतल्यानंतर निश्चलपुरी या गोसावी समाजातील एका संन्याशाच्या हातून पुन्हा एकदा करवून घेतला होता. यावरून महाराजांच्या दृष्टीचा आवाका लक्षात येतो. महाराजांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यांना घातपात झाला, असे मत नवीन संशोधक मांडित आहेत. महाराजांकडून ब्राह्मणी धर्मव्यवस्थेला धक्का बसू शकतो, असा संशय तत्कालीन ब्राह्मणांना आला होता का? त्यातून त्यांनी महाराजांना घातपात केला का? यावर सखोल संशोधन होण्याची गरज आहे.
ब्राह्मणी व्यवस्था उखडून टाकण्याची संधी पुन्हा आली आहे!
असो. अशा प्रकारे वारकरी आणि महानुभाव या दोन धर्मचळवळींच्या रूपाने नवधर्मस्थापनेची संधी महाराष्ट्राने अकारव्या-बाराव्या शतकात गमावली. या पैकी कोणतीही एक चळवळ यशस्वी झाली असती, तरी महाराष्ट्र धर्माच्या खांद्यावरील ब्राह्मणी जोखड उतरले गेले असते. पण तसे व्हायचे नव्हते. जे तेव्हा होऊ शकले नाही, ते आता एक हजार वर्षांनी २१ व्या शतकात तरी होईल का? महाराष्ट्रावरील ब्राह्मणी धर्माचे जोखड उतरेल का?... मला असे वाटते की, अकराव्या-बाराव्या शतकात हुकलेली संधी पुन्हा एकदा चालून आलेली आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात राजकीय स्थिरता आहे. महाराष्ट्राच्या मातीत परीवर्तनाचे वारेही वाहत आहे. आता योग्य वेळ आली आहे. विषमतेचा विखार प्रसवणारी ब्राह्मणी धर्मव्यवस्था पूर्णत: उखडून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे.
धर्मांतराशिवाय दुसरा उपाय नाही
विषमतेचा विखार निर्माण करणारी व्यवस्था उखडून फेकण्यासाठी उपाय काय आहे? उपाय एकच आहे. धर्मांतर. होय धर्मांतरच. या देशाच्या घटनेने प्रत्येक नागरिकाला हवा तो धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे. माझे असे मत आहे की, महाराष्ट्राने या अधिकाराचा वापर करून धर्मांतर करायला हवे. विशेषत: संपूर्ण मराठा समाजाने धर्मांतर करायला हवे. मराठा समाज महाराष्ट्रात संख्येने जास्त आहे. मराठा समाजाने घाऊक पातळीवर धर्मांतर केल्यास महाराष्ट्रात मोठे धर्मचक्रप्रवर्तन होईल. इतर जातींनाही प्रेरणा मिळेल आणि एक हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी पाहिलेले समानतेचे स्वप्न साकार होईल.

अनामित म्हणाले...

Good thought.
Be pepare for the same.

अनामित म्हणाले...

Mayavatichi UP madhali satta ata geli ahe mitra.

अनामित म्हणाले...

ज्यांना लाथा घालायला हव्यात, त्यांच्या आम्ही पाया पडतो !
मी धर्मांतराचा हा एक विचार दिला आहे. त्यावर मतभेद होऊ शकतात. पण मराठा समाजाला ब्राह्मणी वर्चस्व असलेला हिंदू धर्म एक ना एक दिवस सोडून आपली स्वतंत्र वाट चोखाळावीच लागणार आहे. हिंदू हा धर्म नसून, ब्राह्मणांनी त्यांच्या फायद्यासाठी तयार केलेली एक व्यवस्था आहे. हे समजून घ्या. मग माझ्या लेखावर योग्य दिशेने विचार होईल. आपण किती दिवस ब्राह्मणांच्या ओंजळीने पाणी पिणार आहोत. आरएसएस ही ब्राह्मणी संघटना या देशात ब्राह्मणांचे राज्य आणण्यासाठी गुप्त कारस्थाने करीत आहे. भाजपाच्या अध्यक्षपदी नितीन गडकरी या ब्राह्मणाची निवड त्यासाठीच करण्यात आली आहे.
बदनामी कशी सहन करणार?
ज्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायचे नाकारले. राज्याभिषेक करण्यासाठी अब्जावधी रूपयांची लाच महाराजांकडून घेतली. ज्यांनी लेनला हाताशी धरून जिजाऊंची बदनामी केली, त्या ब्राह्मणांचा कावा मराठे कधी ओळखणार आहेत. की आंधळेपणाने त्यांच्याच मागे जाणार आहेत? ज्यांना जिजाऊंची बदनामी करणारया ब्राह्मणी धर्माबद्दल आदर वाटतो, त्यांना स्वत:ला मराठा म्हणवून घेण्याचा तरी अधिकार आहे का?
तरीही आम्ही स्वतःला मराठे म्हणवतो..
ज्यांनी महाराज आणि राजमातेची बदनामी कोली, त्यांच्या हातून आम्ही आमच्या मुला-मुलींची लग्ने लावतो. आमच्या वाडवडिलांच्या मृत्यूनतंर त्यांच्याच हातून विधि करून घेतो. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सत्यनारायण घालतो. महाराजांची बदनामी केल्याबद्दल ज्यांना लाथा घालायला पाहिजे, त्यांच्या आम्ही पाया पडतो. त्यांना दक्षिणा देतो. आणि तरीही आम्ही स्वत:ला महाराजांचे वारसदार आणि मराठे म्हणून मिरवतो. आपल्याला समाजाला खरोखरच लाज राहिलेली नाही. याबद्दल मला तीव्र वेदना होतात.
हिन्दुत्वाचे मृगजळ
ब्राह्मणवाद्यांनी या देशात हिन्दुत्वाचे मृगजळ उभे केले आहे. संभाजीनगर, हिन्दूराष्ट्र ही अशाच मृगजळाची उदाहरणे आहेत. हे संभाजीनगर म्हणतात, ते बहुजनांना भुलविण्यासाठी यांचे केंद्रात सात-आठ वर्षे सरकार होते, तेव्हा यांनी कायदेशीररित्या संभाजीनगर असे नामकरण का केले नाही? कारण यांना तसे करायचेच नव्हते. मते मिळविण्यासाठी फक्त महाराजांचे नाव वापरायचे होते.
तीन ठाकरे महाराष्ट्राला उल्लू बनवित आहेत
आरएसएस आणि ठाकरे हे ब्राह्मण आगी लावतात. मराठे आणि बहुजनांची पोरे त्यांच्या चिथावणीला बळी पडून पेटवा पेटवी करतात. आणि नंतर तुरुंगात सडत पडतात. ठाकरयांना हिन्दुत्ववाद हवा आहे की, मराठीवाद हे कोणी सांगू शकेल का? कोणीच सांगू शकत नाही. कारण त्यांना कोणताच वाद नको आहे. त्यांना "वापरवाद" करायचा आहे. बहुजनांच्या पोरांना वापरून घ्यायचे आहे. ठाकरे नावाचे तीन माणसे सगळ्या महाराष्ट्राला उल्लू बनवित आहेत. आणि बहुजन महाराष्ट्र त्याला बळी पडत आहे, हीच खरी शोकांतिका आहे...

अनामित म्हणाले...

RRS baddal satya vachayache asalyas Shri. Mukund Shintre yanche "Sanghacha burakha" he pustak jarur vachave.

निखील सावंत म्हणाले...

आजकाल बरेच लोक बुरखा घालून मराठा समाजाच्या पाठी लागले आहेत. मराठ्यांनी धर्मांतर करणे ह्यांना इतके गरजेचे का वाटते आहे ते आता सर्व सामान्य मराठ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. दलितांचे प्रश्न जसे धर्मांतर करून सुटले नाहीत तसे मराठा समाजाचेही सुटणार नाहीत. मराठ्यांना उपदेश करण्याआधी स्वत:चे तोंड आरश्यात पहा. मराठ्यांमध्ये जे साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट आहेत त्यांना सर्व सामान्य गरीब मराठ्यांची मदत करायला सांगा.
मराठा समाज आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागे पडत असताना मराठ्यांचे स्वयंघोषित नेते म्हणवून घ्यायला यांना लाज वाटत नाही? आणि उपदेश करून करणार काय तर ब्राह्मणांच्या घरांवर दगड मारा? ब्राह्मणांना जाळा? ही असली भाषा मराठ्यांच्या नावावर निर्ल्लजपणे खपवली जाते. याच्यापुढे एक गोष्ट यांनी नीट लक्षात ठेवावी. तुम्हाला जे शेण खायचे असेल ते खायला तुम्ही मोकळे आहात. पण सामान्य मराठा समाज तुमच्या पाठी नाही हे वास्तव आहे. म्हणूनच मराठ्यांनी धर्मांतर करावे यासाठी तुम्हाला इतका आटापिटा करावा लागतो आहे. बाबासाहेबांना दलितांची अशी मनधरणी करावी लागली नव्हती. कारण दलितांनी त्यांना नेता म्हणून स्वीकारले होते. मराठ्यांचे दुर्दैव हे आहे की महाराष्ट्र तर सोडाच पण मराठ्यांच्या हिताचा विचार करणारा देखील नेता आज अस्तित्वात नाही.
मराठ्यांची बदनामी करणाऱ्या ह्या षंढ नेत्यांना आणि त्यांचे पट्टे गळ्यात घालून भुंकणाऱ्या ह्या पाळीव प्राण्यांना आधी लाथा घातल्या पाहिजेत. मराठा समाज तुमच्या दारातल्या तुकड्यांवर जगत नाही. स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला आम्ही समर्थ आहोत. मराठ्यांच्या नेतृत्वाची फाटकी झूल पांघरून आपल्या विकृतीचे प्रदर्शन करणे थांबवा. तुमच्या किळसवाण्या अस्तित्वाची आमच्यासारख्या सामान्य मराठ्यांना गरज नाही.

अनामित म्हणाले...

Nikhil bala kadhi sudharnar, ki asach jati abhiman balgun pidhyan pidhyanche khachchikaran karnar. Lakshyat thev jatila chitkun rahilas tar tuzi kiv karavi tevhadi kamich ahe.

अनामित म्हणाले...

मराठा-ब्राम्हण संघर्षाचे मूळ कशात?
अनेकांना मराठा व ब्राम्हण या दोन समाजात एवढा पराकोटीचा संघर्ष का अस प्रश्न पडला असेल. त्याचे उत्तर असे आहे की हा संघर्ष नवीन नाही व त्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. तसेच हा संघर्ष केवळ मराठा-ब्राम्हण असा नसून जाट विरुद्ध ब्राम्हण, राजपूत विरुद्ध ब्राम्हण, बहुजन विरुद्ध ब्राम्हण, जैन विरुद्ध ब्राम्हण, बौद्ध विरुद्ध ब्राम्हण, शीख विरुद्ध ब्राम्हण असा अनेक पदरी आहे. यातील महत्वाची गोष्ट अशी की येथे सगळीकडे समान शत्रू ब्राम्हण हाच आहे. असे का याचे ब्राम्हणांनी आत्म परीक्षण करायला पाहिजे!

या संघर्षाचे मूळ ब्राम्हणांनी आपल्या धार्मिक सत्तेच्या बळावर आपले वर्चस्व राज्यकर्त्या जमातींसह सगळ्यांवर लादण्याचे जे खटाटोप केले त्याच्यात आहे. प्राचीन काळी समणांनी (जैन व बौद्धांनी) ब्राम्हणांशी यशस्वी लढा देवून त्यांची धार्मिक सत्ता संपवली. (समण या मागधी शब्दाचा संबंध समतेशी आहे. पण ब्राम्हणांनी समण या शब्दाचे रुपांतर श्रमण या संस्कृत शब्दात करून त्याचा मूळ अर्थ नाहीसा केला).

पतंजलीने आपल्या योग सूत्रात श्रमण आणि ब्राम्हण यांचे वैर साप आणि मुंगसाप्रमाणे शाश्वत (कधी न संपणारे) असते असे म्हंटले आहे. येथे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की त्यावेळचे हे समण आजच्या मराठ्यांचे, जाटांचे, राजपुतांचे पूर्वज होते.


जाटांनी ब्राम्हणांचे वर्चस्व कधीच मान्य केले नाही. एकतर जाट स्वत:ला हिंदू मानत नाहीत, व त्या समाजातील बहुतांश लोक शीख, जैन आणि इस्लाम या धर्मांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे जाटबहुल प्रदेशांमध्ये (पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान वगैरे) ब्राम्हणांचा वर्चस्ववाद अजिबात चालत नाही. पण इतिहासातील ब्राम्हणी कारस्थानांची जाट समाजाला आठवण असल्याने की ते लोक ब्राम्हणांना शिव्या घातल्याशिवाय जेवतही नाहीत!

पण दुसरीकडे राजपूत आणि मराठा लोकांचा ब्राम्हणांशी संघर्ष असला तरी ते आजही स्वत:ला हिंदू समजतात व धार्मिक बाबतीत पूर्णपणे ब्राम्हणांच्यावर अवलंबून आहेत.

ब्राम्हणांचा वर्चस्ववाद मोडून काढायचा असेल तर मराठ्यांनी सर्वात अगोदर तथाकथित हिंदू धर्म सोडून द्यायला पाहिजे. कारण ब्राम्हणांची दादागिरी हिंदू धर्माच्या आधारे चालते. न रहेगा बांस तो न रहेगी बांसरी. जाटांनी हे करून दाखवले आहे.

हिंदू धर्माच्या आधारे ब्राम्हणांची चालणारी रोजी रोटी बंद पडली, की तेही देव आणि देवळे यापासून मुक्त होतील.

अनामित म्हणाले...

Farach chhan comment ahe. Lihit raha.

अनामित म्हणाले...

NIKHIL SAWANT-YOU ARE GREAT.EVADHE DHADAS DAKHAVLYABUDDAL. BRAHMANANWAR VIDHYAK TIKA
JARUR KARAWI.PUN HINDUDHARMAT FUT PADNYACHYA
ANTERRASHTRIYA KATA CHE TAR APAN BALI THARAT NAHI
NA YACHAHI VICHAR HONE JARUR AHE.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes