![]() |
अफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. |
अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार होता . शिवरायाना संपविण्याचा विडा त्याने उचलला होता आणि त्यासाठी तो स्वराज्यावर चालून आला होता . स्वराज्याचा शत्रु या दृष्टीने शिवाजी महाराज त्याच्याकडे पाहात होते . याला धार्मिक रंग अजिबात नव्हता . शिवरायानी अफजल खानाला ठार मारले नसते तर राजांचेच काही बरे वाईट होण्याची शक्यता होती . कारण अफजल खान कपटी म्हणुन प्रसिद्ध होता . त्यामुळे शिवराय सर्व तयारीनिशी खानाच्या भेटीस गेले होते . खानाने महाराजाना आलिंगन दिल्यानंतर खानाने महाराजांच्या पाठीत कट्यारीने वार केला . परन्तु चिलखत असल्याने महाराज बचावले व चपळाइने त्यानी वाघनखे खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला .
तेवढ्यात राजांवर धावून आलेल्या सय्यद बंडाला जीवा महालेनी जागेवरच गार केला. हा झाला इतिहास . याला विरोध करण्याचे कारण नाही . परंतु यापुढे काय झाले ते जाणीवपूर्वक दुर्लक्षिले गेले आहे. अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शिवारायांच्या अंगावर वार केला. राजानी तो वार चुकविन्याचा प्रयत्न केला परंतु कपाळावर वार झालाच.
![]() |
हा इतिहास का दाखवला जात नाही ? |
महाराजांच्या कपाळावर खोल जखम झाली. शिवरायांच्या आयुष्यात त्याना एकमेव जखम करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू-ब्राम्हण होता . परन्तु त्याला कधीच हायलाईट केले जात नाही . उलट इतकी गंभीर बाब इतिहासापासुंन लपवून ठेवण्याचे महापातक अनेक जण आजवर करत आले आहेत . ब्राम्हण म्हणुन कोण मुलाहिजा करू पहातो ? हे शिवाजी राजांचे विचार . मग असे असताना अफजल खानाबरोबर कृष्णा कुलकर्णीचाहि इतिहास समाजासमोर मांडायला हवा, पण तसे होत नाही . जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्यासारख्या काही मराठा सरदारांचा स्वराज्याला विरोध होता . मग जावळीच्या मोरेंची जर शिवरायांचे शत्रु म्हणुन मांडणी केली जात असेल तर कृष्णा कुलकर्णीकडे केवळ ब्राम्हण म्हणुन दुर्लक्ष करायचे का ? तोही स्वराज्याचा शत्रु होता ही बाब अग्रक्रमाने का मांडली जात नाही ?
अफजल खानाचा शिवरायानी वध केल्यानंतर त्यांच्यातील राजकीय शत्रुत्व (धार्मिक नव्हे ) शिवरायानी तिथेच संपवून टाकले. ज्या शत्रूला आपण स्वताच्या हाताने ठार केले त्याचीच कबर सन्मानपूर्वक प्रताप गडावर उभारणारा राजा एकमेवाद्वितियच म्हणावा लागेल. शिवरायांचे मोठेपण नेमके याच्यात आहे. त्यानी कधीच परधर्माचा द्वेष केला नाही . पर्धर्मियाना नेहमी सन्मानाने वागविले .युद्धाच्या प्रसंगी कोणत्याही धार्मिक स्थळाना अथवा धर्मग्रंथाना हानी पोहचवायची नाही शिवरायांचा दंडक होता . परंतु आज नेमके त्याच्या उलट वर्तन चालले आहे . अफजल खानाच्या नावाखाली मुस्लिम द्वेष करायचा किंवा त्याना बोचेल अशी इतिहासाची मांडणी जाणीवपूर्वक करायची, असे प्रकार सर्रास घडत असतात. अफजल खान मुसलमान होता म्हणुन तो स्वराज्याचा शत्रु नव्हता किवा तो स्वराज्याचा शत्रु होता म्हणुन सर्व मुसलमान स्वराज्याचे शत्रु आहेत, असेही कुणी समजू नये. सर्व जाती -धर्माचे मावळे शिवरायांच्या पदरी होते . दौलत खान दर्यासारंग हा मुसलमान त्यांचा आरमार प्रमुख होता. नुरखान बेग नावाचा मुसलमान त्यांचा घोडदळ प्रमुख होता . इब्राहिम खान नावाचा मुसलमान त्यांचा पायदळ प्रमुख होता. काझी हैदर हा मुसलमान त्यांचा वकील, न्यायाधीश होता. मदारी मेहतर हाही त्यांच्या दरबारी आहे. मुसलमान मौनी बाबा त्यांचे गुरु होते . राजांच्या अंगरक्षकापैकी अर्धे मुसलमान होते आणि ही प्रामाणिक, जीवाला जीव देणारी माणसे होती. आयुष्यात त्यानी कधीही राजांशी गद्दारी केली नाही. असे असताना फ़क्त अफजल खान वध हे एकच प्रकरण समाजासमोर नेहमी मांडायचे आणि राजांच्या पदरी असणाऱ्या प्रामाणिक मुसलमान मावळ्याकडे दुर्लक्ष करायचे, हे कितपत बरोबर आहे . शिवरायांचे कर्तुत्व फ़क्त अफजल खान वधापुरते मर्यादित नाही याचे भान आम्ही ठेवणार आहोत की नाही ? शिवरायांच्या चरित्राचा चिकित्सक अभ्यास करून ते विचार , तो आचार आम्ही आमच्या आचरणात आणले तर “धार्मिक दंगली ” सारख्या वाईट घटना आम्ही टाळू शकतो. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात ना , “शिवाजी महाराज हे काही डोक्यावर घेवून नाचायाचे विषय नाहित तर डोक्यात घालायचे विषय आहेत .”
शिवरायांचे खरे चरित्र समाजासमोर मांडले पाहिजे. शिवरायांचा लढा कोणत्याही जाती -धर्माविरुद्ध नव्हता तर स्वराज्याशी बेइमानी करणाऱ्या, इथल्या मातीवर अत्याचार करणार्या सैतानांच्या विरुद्ध होता. शिवराय सर्वधर्म समभावानेच आयुष्यभर जगले. त्यांच्या पश्चात आम्ही त्यांच्याच आचार विचाराना काळिमा फासला तर शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आम्हाला उरणार नाही.
जय जिजाऊ , जय शिवराय !!
54 टिप्पणी(ण्या):
खूपच सुंदर...............तुमची शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांशी बांधिलकी, शोषितांच्या उत्थानासाठी असलेली तळमळ व त्यासाठी तुम्ही घेत असलेली मेहनत या ब्लोग वरून कळून येते. आपल्या कार्यास खूप सदिच्छा.
प्रेमानंद गायकवाड ..
ch. shivaji maharaj yanchya padari asanarya musalman lokanchi mahiti milu shakel kay ? plz. help and give me some information about them.
उभ्या जीवनात शिवरायांच्या डोकाच्या केसालाही धक्का लावायची हि कोणाचीही हिंमत झाली नाही पण ते काम स्व:तला उच्च समजणाऱ्या बामन असल्याचा किडा ज्याच्या डोक्यात वळवळत होता त्याची वळवळ राज्यांनी एका तलवारीच्या घावात संपवली आणि दाखवून दिलं दशह्तवाद असाही संपवावा लागतो !!मग तो धार्मिक असो किंवा इतिहासातील घुसखोरीचा.........!
विषयाची मांडणी खुप छान आहे...पण मला तुला एकाच प्रश्न विचारायचा आहे ..कृष्णा भास्कर कुलकर्णी तुला दिसले ...मग बाजी प्रभु देशपांडे का कधी दिसले नाहीत? सावरकर,चाफेकर लोकमान्य टिळक,आद्य क्रांतीकारक वासुदेव बलवंत फडके ही लोक दिसली नाहीत की ह्यांचे कर्तुत्वही तुला मान्य नाही...झाली होती चुक पुर्वजान्ची अस आपण म्हणू पण आत्ता हां द्वेष कशासाठी मित्रा? ब्रह्मण आहे म्हणून नाही...पण मी ३१ डिसेम्बर ला जेव्हा लोक दारुत बुडलेले असतात त्या वेळी दर वर्षी कोणत्यातरी गडावर असतो. आणि सांगायला अतिशय दुक्ख होते की ज्या गडानवर आपल्या शुर मावळ्यान्नी लढताना रक्ताचे पाट वाहीले तीथे आपलेच मराठी बांधव दारूचे पाट वाहातायत.तुला अस नाही वाटत की आधी आपल्यातला छात्रपतीं विषयी चा आदर जागृत करणे आवश्यक आहे..तो आदर तुझ्यात आहे ..माझ्यात आहे...पण इतरांचे काय? जुने सगळे विसरून आपण ह्या देशाला बलशाली आणि वैभव सम्पन्न करायला हवे असे नाही का वाटत तुला..आपण आपापल्या जातींवीषायी अभिमान बाळगुन ह्या विषयावर एकत्र यायला काय हरकत आहे?
विषयाची मांडणी खुप छान आहे...पण मला तुला एकाच प्रश्न विचारायचा आहे ..कृष्णा भास्कर कुलकर्णी तुला दिसले ...मग बाजी प्रभु देशपांडे का कधी दिसले नाहीत? सावरकर,चाफेकर लोकमान्य टिळक,आद्य क्रांतीकारक वासुदेव बलवंत फडके ही लोक दिसली नाहीत की ह्यांचे कर्तुत्वही तुला मान्य नाही...झाली होती चुक पुर्वजान्ची अस आपण म्हणू पण आत्ता हां द्वेष कशासाठी मित्रा? ब्रह्मण आहे म्हणून नाही...पण मी ३१ डिसेम्बर ला जेव्हा लोक दारुत बुडलेले असतात त्या वेळी दर वर्षी कोणत्यातरी गडावर असतो. आणि सांगायला अतिशय दुक्ख होते की ज्या गडानवर आपल्या शुर मावळ्यान्नी लढताना रक्ताचे पाट वाहीले तीथे आपलेच मराठी बांधव दारूचे पाट वाहातायत.तुला अस नाही वाटत की आधी आपल्यातला छात्रपतीं विषयी चा आदर जागृत करणे आवश्यक आहे..तो आदर तुझ्यात आहे ..माझ्यात आहे...पण इतरांचे काय? जुने सगळे विसरून आपण ह्या देशाला बलशाली आणि वैभव सम्पन्न करायला हवे असे नाही का वाटत तुला..आपण आपापल्या जातींवीषायी अभिमान बाळगुन ह्या विषयावर एकत्र यायला काय हरकत आहे?
मला फक्त कृष्णा भास्कर कुलकर्णी दिसले असे नाही तर मी अफझल खानाचाही इतिहास मांडला आहे. अफझल खान वधासंदर्भात घडलेल्या इतर गोष्टी जसे कि कृष्णा भास्कर कुलकर्णी वध, जिवाजी महालेनी शिवरायांचा वाचवलेला प्राण, अफझल खानच्या समर्थनार्थ वाईच्या ब्राम्हणांनी केलेला यज्ञ या गोष्टी का मांडल्या जात नाहीत ? इतिहास मांडायचा तर त्याच्या सर्व बाजू प्रामाणिकपणे मांडल्या पाहिजेत, पण तसे होत नाही . का ?
तुम्ही वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणता. त्यांच्या आधी उमाजी नाईक सशस्त्र क्रांती करून फासावर चढले. मग ते आद्य क्रांतिकारक ठरत नाहीत का ?
टिळकांनी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रश्नी सामाजिक न्यायाची बाजू न घेता सनातनी ब्राम्हणांची बाजू का घेतली ?
सावरकरांनी सहा सोनेरी पानामध्ये पुष्यमित्र शुंग याचा समावेश कशाच्या आधारावर केला. त्यातच सावरकर शिवरायांच्या स्वराज्याला, कर्तुत्वाला 'काकतालीय न्याय' म्हणतात. असे का ? जे सावरकर देव मनात नाहीत ते शिवरायांच्या कर्तुत्वाचे श्रेय देवाला का देतात ?
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे ब्राम्हण नव्हते ते कायस्थ प्रभू होते.पण त्यानाही ब्राम्हण म्हणून मांडण्यात कोणाचा हात आहे ? या प्रश्नांचा तुम्ही प्रथम विचार करा.
अरे राजू,
शहाजीराजांनी कोणाची चाकरी केली? लखूजी जाधवरावांनी कोणाची चाकरी केली? मुसलमानांसमोर कुर्निसात करताना काय त्यांनी मराठ्यांवर वार केले नाहीत? बामणांनी मराठा मारला अन मराठ्यांनी बामण मारले. झाले गेले सगळे स्वर्गात गेले...नाहीतर जहन्नममध्ये गेले.
लेका, आता तरी डोळे उघड आणि बामण, मराठा करत बसण्यापेक्षा सरहद्दीपलीकडल्या मुसलमान, चिनी कारस्थान्यांकडे बघ. नाहीतर तुझी पिलावळ अजून २०० वर्षांनी चिनी भाषेत चिनचुनटुनटुन करत बोलत असले.
Anonymous- जर एवढी तळमळ होती तर स्वताचे खरे नाव का लिहिले नाही. तुम्हा लोकांना समाजावर परत एकदा ब्राम्हणी गुलामी लादायची आहे. त्यासाठी तुमचे हे सगळे धंदे चालू आहेत. शहाजीराजांनी आणि लाखुजीराव जाधवांनी निजामशाही आणि आदिलशाहीत काम केले परंतु तो राजकीय भाग होता. ब्राम्हणांनी मात्र सर्व परकीय आक्रमकांच्या नोकऱ्या पत्करल्या. स्वराज्याला विरोध केला. जाती वर्चस्वाच्या भावनेने शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. काही मराठ्यांनी शिवरायांना विरोध केलं तो राजकीय हेतूने परंतु ब्राम्हणांनी मात्र जातीयवादी दृष्टीने विरोध केला हा मुलभूत फरक प्रथम लक्षात घ्या.
Ha etihashi koni nakaarat naahi aani mi lihale aahe tehi nakarta yet nahi parantu Mirjet te nakarnyacha praytn jhala ase mi lihale aahe
ty veli jar tumhi dile aahe tase poster lavale asate aani tyala virodh jhala asata tar tehi chukiche tharle asate :)
tarihi ek gosht lakshat ghyave rajyanvar Afzal khan chalun aala hota kulkarni nahve tyamule khanala jast highlight karnyat aale aahe
dhanyavad :)
kasa asta anonymous said....
tumha lokana sagala kahi mahit asta..
pan te manya karayala kamipana vatat asto...
nahitar amhi ha sagla itihas marathi shalet nasta ka shiklo asto??
lecture kontya cast cha teacher deto he important nasta.....
te kontya castchya lonkani syllabus set kela ahe tyavar baracha dependent asta....
खूपच सुंदर...............तुमची शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांशी बांधिलकी, शोषितांच्या उत्थानासाठी असलेली तळमळ व त्यासाठी तुम्ही घेत असलेली मेहनत या ब्लोग वरून कळून येते. आपल्या कार्यास खूप सदिच्छा.
anand.d.chandanshive.
onymous- जर एवढी तळमळ होती तर स्वताचे खरे नाव का लिहिले नाही. तुम्हा लोकांना समाजावर परत एकदा ब्राम्हणी गुलामी लादायची आहे. त्यासाठी तुमचे हे सगळे धंदे चालू आहेत. शहाजीराजांनी आणि लाखुजीराव जाधवांनी निजामशाही आणि आदिलशाहीत काम केले परंतु तो राजकीय भाग होता. ब्राम्हणांनी मात्र सर्व परकीय आक्रमकांच्या नोकऱ्या पत्करल्या. स्वराज्याला विरोध केला. जाती वर्चस्वाच्या भावनेने शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. काही मराठ्यांनी शिवरायांना विरोध केलं तो राजकीय हेतूने परंतु ब्राम्हणांनी मात्र जातीयवादी दृष्टीने विरोध केला हा मुलभूत फरक प्रथम लक्षात घ्या.aani khara etihas sanga dadoji konddav shivrayacha guru nastana taila guru banvaych aani ramdashashi shivaji maharajanchi kadhi bhait zalich nahi tari ramdasana guru banvaych yas munuvadi bamni kava samjaych ka
aani katerta hi rashtbhakti asvi jer dashacha pragtit jer kuthala dharm jaat aadvi yet asel ter taiya dharhacha aabhiman balgaycha ka dashacha ho aani dharm manje hindu muslim buddhist krihchen parashi aani ankhi je kahai astel te nahiter yana vatnar fakt aamich manuvadi aani tu as manlaki aamchi pudhi pidi chini bolan taychi kalgi karu nko pen tuzayi aatacha pidila teri kavlacha shapatun mukt ker mela kay manaychahai tula samjle aselc karen tu samjdar aahai 21 shatkat grah tare rashi dev yycha navaver dahnda karanapeksha vidnanacha maragver chalayla shikva tumch pudhi pidi tumche aabhar manil
Hellooo Prakash,
Mala Ch.Shivaji Maharajanche shiv charitra aani
Lekhak vishavs patil yanci sambhaji aani Chava ya kadambarya havya aahet.
jar tuzykade asatil tar plz mala tynachi softcopy mazya mailid var send kar.
vijaysinhspatil@gmail.com
Ek Maratha,
VIjay Patil
|| Jay Shivaji Jay Bhavani ||
Prakash pol saheb,
Mage pahu naka pudhe paha. pragati karayachi asel tar. suryakade pahat chala.positive view thevun vichar karayala pahije. tu Brahman mi maratha te te aamke te dhamke karnyapekshya Deshasathi dhadpad kara te sarthak hoiel.
मुस्लिमविरोध काय आणि ब्राह्मणविरोध काय शेवटी बहुजनांची डोकी भडकवणे महत्वाचे! नाही का? आणि आता तर बहुजनांच्या बरोबरीने ब्राह्मणांची डोकी भडकवण्याचे उद्योगही जोरात सुरु आहेत म्हणे. चालायचेच, जीवो जीवस्य जीवनम!
i like
कोण म्हणत हा इतिहास दाखवला जात नाही हा इतिहास माहिती आहे आणि नितीन देसाई यांनी ही आपल्या मालिकेत दाखवला आहे
ye lavdya prakash he asle ghanerde likhan band kar
I am worried about You...Forget Past Live Present.....
Copied a reply from this site itself :
---चिल्लर कार्टून प्रकरण काढून दलित समाजाची भावना भडकविण्याचा घाणेरडा धंदा कॉंग्रेसचा आहे. प्रश्न कार्टून चा नाही अस्तित्वाचा आहे. आजपर्यंत एकही बहुजन पंतप्रधान होऊ शकला नाही, का ? महाराष्ट्रात मुख्यमंत्री मराठा असल्यानंतर उपमुख्यमंत्री सुद्धा मराठा असावा असा आग्रह का ? संगमा सारख्या आदिवासी बहुजन नेत्याला राष्ट्रपती पदासाठी पाठींबा न देता शरद पवार कॉन्ग्ग्रेस च्या मुखर्जी या बामणाच्या पाठीशी उभे राहतात हे सर्व मागास लोकांच्या नजरेसमोर आहे. बहुजन मेला तरी चालेल पण अभिजन जगाला पाहिजे हे षड्यंत्र आहे. बहुजनांच्या भावनांची कदर असती तर छगन भुजबळ उप मुख्यमंत्री राहिले असते, पण मराठ्यांना बहुजनांच्या हाती सत्ता असलेली सहन होत नाही. ह्यांना मुसलमान चालतात पण दलित नको. शिवस्मारकासाठी करोडो खर्च्णारे इंदू मिल साठी आम्हाला भिक मागायला लावतात. अजून यांची मस्ती सरली नाही म्हणून उदयन भोसले सारखा एखादा फडतूस आमदार / खासदार स्वतःला छत्रपती म्हणून घेतो. एक चव्हाण गेला ( ashok ) तर दुसरा आणला (प्रीठीराज ), ह्यांना कोणी दलित - ओबीसी नेता दिसला नाही काय ? मुसलमानांना आता ओबीसी कोट्यातून आरक्षण देणार म्हणे , आणि वेगळा मराठा आरक्षण देणार, म्हणजे आमचा कोटा मुसलमानांना आणि मराठ्यांचा कोटा मराठ्यांना, सरकार आहे कि गम्मत आहे ?
----
Marathas consider themselves superior and they get just offended because historically Brahmins were considered superior to them. They could not bear that, but when it comes to treat Dalits or OBCs equal, they are not ready to give up their historical superiority.
आपले विचार स्तुत्य आहेत त्यात काही शंका नाही. खरा इतिहास दडपता काम नये किंवा आजकाल शिवाजी किंवा बाबासाहेब हे निवडणुकीपुरते आणि तितकेच उरले आहेत. आणि गांधी शिवाय तर पत्ताही चला नाही ! असो. तर या विषयावर शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे छान नाटक आले आहे ते सर्वांनी पहावे आणि व्यक्ती आणि जातीभिनेवेश बाजूला सारून एक राजा आणि तत्कालीन सर्वच समाज व्यवस्था आणि माणूस याचा अर्थ जाणून घ्यावा असे वाटते. या नाटकाला हार्दिक शुभेच्चा आणि तुम्हालाही!!
याच अफझलखानबरोबर राजांचे काका खंडोजी खोपडे नव्हते का ? .......
शहाजीराजांना पकडण्याचे व महाराजांचे बंधू संभाजी यांना कपटाने मारण्याच्या कारस्थानात घोरपडे सहभागी नव्हते ....... तुम्हाला नको असलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती पुस्तकात ( जे तुम्ही सवयीप्रमाणे पूर्ण वाचले नसणारच ) एक वाक्य आहे ------- " जे स्वराज्याच्या बाजूचे मग ते मराठा असोत, ब्राह्मण असोत, मुसलमान असोत किंवा कोणी असोत ते सारे 'मराठे ' व जे स्वराज्याच्या विरोधातील मग ते मराठा असोत, ब्राह्मण असोत, मुसलमान असोत किंवा कोणी असोत ते सारे 'मोगल '
आम्ही असले लेख वाचून काय करतो? कृष्णाजी भास्कर वकिलाला आणि समस्त बामणांना चार शिव्या देतो. पण अफजलखान वधाच्या पोष्टरवर बंदी घालणा-या कॉंग्रेसला मते देतो. दादोजी कोंडदेवच्या पुतळ्याला हालवताना पोलीस बंदोबस्त मिळतो, राहूल गांधीला मिळतो. पण मराठी पाट्यांच्या आंदोलनाला मिळत नाही. आम्ही टोलनाक्यावर निमूटपणे टोल देतो (टोलवाले इतिहास निर्मान करत आहेत). पाकीस्तानच्या क्रिकेट टिमला भारतात आमंत्रण देतो आता तर क्रिकेटवालेच नाही तर सिनेमातले नट, नट्या, गायक, संगितकार सगळ्यांनाच उघडे रान आहे. आपले पोलिस भारतातून गायब झालेल्या पाकीस्तानी नट्यांच्या शोधात आहेत. आपले शत्रू काय कमी आहेत काय? तेव्हा आपल्यातल्या आपल्या लोकांशी भांडत बसणे म्हणजे पुन्हा पानिपताची वेळ येईल.
mala atishay daya yetey tumchi. swatacha swaarth saadhanyasathi kay lihitay tumhi he? afzalkhan vadha chya Poster la virodh koni kela - sadhyachya musalmananni. visaru naka he. ugachah Hindu na dosh deu naka. Blog visitors cha abhyas faar jast nasto & mag te Hindu virodhi hou laagtat.
sawarkaranche pustak 'mopalyanche band' vaacha, ani samjun ghya 'islam'... samjla ka?
jay shivray...
dhanyavaad...
isha.teenager@gmail.com
अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शिवारायांच्या अंगावर वार केला. राजानी तो वार चुकविन्याचा प्रयत्न केला परंतु कपाळावर वार झालाच.
हा इतिहास का दाखवला
जात नाही ?
महाराजांच्या कपाळावर खोल जखम झाली. शिवरायांच्या आयुष्यात त्याना एकमेव जखम करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू-ब्राम्हण होता . परन्तु त्याला कधीच हायलाईट केले जात नाही . उलट इतकी गंभीर बाब इतिहासापासुंन लपवून ठेवण्याचे महापातक अनेक जण आजवर करत आले आहेत . ब्राम्हण म्हणुन कोण मुलाहिजा करू पहातो ? हे शिवाजी राजांचे विचार .
can you provide the historical proof for the above statements? otherwise its a false and bogus theory. also please note that afzalkhan has came from bijapur to vai to kill shivaji raje, not the his vakil krishanaji bhaskar. so its quite natural to show afzal khan in the poster. otherwise we have to make poster with sayyad banda and all others . history or war history is always betwwen two famous persons , not between their sardars and sepoys.
Pol Saheb, tumche kiti abhar manve he kalat nahi. Maratha-Bhujan Samaja madhe jo khota Itihas perla aahe to Janyas far vel lagel pan tumhi je karta aahat tya kamache mol nahi. Shivaji Raje aste tar tyani nakki tumchi hattivarun varat kadhali asti. Shevti vinati kato ki Khara itihas lokan vachayla milava yasathi. Pratyek shaharat ti uplabdh kara. ani online kharedisathi website dya.. Tumche shtash abhar.....||Jay Jijavu, Jay Shivaray||
aapan yabaddal leahalya baddal dhanavaad...!
jai shivaji
अफजलखानवध हे प्रकरण निरनिराळ्या लोकांनी निरनिराळ्या रीतीने वर्णन केले आहे ज्योतिबा फुले आपल्या पोवाड्यामध्ये म्हणतात " फुले समग्र वांग्मय पान न ५१
"अफजलखान शूर पठाण आला वाईस /शोभला मोठ्या फौजेस /
कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षीस /फितविले लोभी ब्राह्मणास
गोपीनाथ फसवी पठाणा आणी एकांतास /चुकला नाही संकेतास
माते पाई डोई ठेवी ,लपवी हत्यारास /बरोबर आला बेतास
वर भेटभाव वाघनख मारी पोटास /भयभीत केले पठाणास
पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस /झोंबती एकमेकास
हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस /पठाण मुकला प्राणास
ज्योतिबा फुले म्हणतात राजेंनी अफजलचा वकील फितूर करून घेतला व त्याला एकट्याला बोलावून घेतले त्याला पाहून राजे वाघाला घाबरतात तसे घाबरले त्यास बोलावून कपटाने त्याचा खून केला (वास्तविक असा आरोप तर मुस्लिम इतिहासकारांनी सुद्धा केलेला नाही जेव्हा अफजलने प्रथम वार केला तेव्हा राजे चिलखत असल्याने वाचले )आणि नंतर स्वतःच्या बचावासाठी त्याला मारले )आणि त्याचा वकील कृष्णाजी कुलकर्णीला फितूर करून घेतले होते त्यामुळे त्याला मारण्यचा प्रश्नच उदभवत नाही
· शाहू महाराजांनी शिवाजी महाराजंचा इतिहासाचे पुनर्लेखन होऊन सत्य इतिहास लोकांसमोर यावा म्हणून कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या मराठा जातीच्या माणसाला शोध घेवून पुन्हा विश्वसनीय शिवचरित्र लिहिण्याची विनंती केली त्यास त्यांनी रु १००० ची देण्गीसुद्धा दिली इंदोरच्या होळकरांनी याला रु २४००० /ची देणगी दिली व त्याच्या ६००० प्रती विकत घेवून त्या जगातील निरनिराळ्या ग्रंथालयांना भेट दिल्या त्या शिवचरित्रात अफजलखानाचा वधाचा प्रसंग खालीलप्रमाणे दिलेला आहे (पान न ६६ )महाराजांनी खानाकडील लोकास जागा देताना कृष्णाजी भास्करचे बिराड इतरापासून दूर असावे रात्रीच्या वेळेस त्यास उठवून बोलले कि तुम्ही जातीचे ब्राह्मण आजपर्यंत मी जे काही केले आहे ते हिंदुधर्म रक्षणासाठी प्रत्यक्ष भवानीने मला आज्ञा केली आहे कि गो-ब्राह्मणांचे रक्षण कर मी हे जे कार्य आरंभिले आहे त्यास आपल्यासारख्या ब्राह्मणाचे सहाय्य हवे महाराजांचे भाषण ऐकुन त्याने राजेना विचारले कि मी काय करू अशी तुमची अपेक्षा आहे त्यावर महाराजांनी सांगितले कि अफजलखानाला विश्वास धाखवून तो इकडे भेटीस येईल असे करावे त्यानुसार त्याने अफजलला प्रतापगडावर आणले यानंतर कृष्णाजी भास्कर मरेपर्यंत शिवाजी व संभाजी महाराजंच्या सेवेत होता संभाजीने त्यावर एक कामगिरी सोपविल्याची नोंद इतिहासात आहे सध्याचा जो लालमहाल आहे त्यात वरच्या मजल्यावर एक प्रदर्शनी आहे त्यात शिवाजी महाराज यांच्या एका अस्सल पत्राची प्रत लावली आहे त्यातसुद्धा महाराजांनी कृष्णाजी भास्करला एक कामगिरी सोपविल्याची नोंद आहे
याव्यतिरिक्त सरदेसाई नावाचे एक इतिहासकार होऊन गेले जे बडोदा सरकारचे सेक्रेटरी होते आणि त्यांनी संपादित केलेली मराठी रियासत आज अत्यंत विस्व्सनिय ग्रंथ म्हणून ओळखला जातो याच्या संपादक मंडळामध्ये जयसिंगराव पवारासारखे ब्राह्मणेतर इतिहासकार सुद्धा आहेत त्यात सुद्धा कृष्णाजी भास्करबद्ध्ल केळुस्करयांनी दिलेल्या माहितीशी बरेच साम्य आहे त्यमुळे केवळ ब्राह्मणावर भुंकत राहणेसाठी याचा वारंवार उपयोग केला जातो जो खोटा आहे
manya shivaji maharaj RAJE banle te fakta Musliman mule.. Kharach muslim hote mhanun tar Maratha Samrajya ubhe rahile. ho ki nahi POLLLLLLLLLLLLLLLLLLLLLL
खरे आहे तुमचे. अफझल खानाच्या पदरी असलेल्या कृष्णाजी भास्कराने शिवाजी महाराजांवर वार केला हे कोणी नाकारले नाही तसेच बाजीप्रभू देशपांडे ह्यांनी शेकडो वार शिवाजी महाराजाना सुखरूप ठेवण्यासाठी झेलले हे हि कोणी नाकारले नाही.
खुद्द छत्रपती नी अष्ट प्रधान मंडळात सात ब्राह्मण ठेवले होते. खुद्द छत्रपतीनी मातृवत असणारया (पितृवत अथवा गुरुवत म्हणाल्यावर अजून वाद व्ह्यायचा) सोनोपंतांची महाबळेश्वर येथे तुला केली (मातोश्री जिजाउञ्च्या तुलेसोबत).
कृष्णाजी भास्कराने शिवाजी महाराजांवर वार केला हे कोणी लपवले असते तर आपल्याला कसे माहित झाले? तुम्ही अफजल खानासोबत 'खरा इतिहास' म्हणून कृष्णाजी भास्कराचे चित्र प्रसिद्ध करू पाहता मग ते अनेक मराठ्यांच्या साठी सुद्धा प्रसिद्ध करावे लागेल . मोरे, पिसाळ,खोपडे, सावंत, घोरपडे, शिर्के, निंबाळकर इतकेच काय खुद्द एकोजीराजे सुद्धा शिवाजी महाराजांवर चालून आले होते. (अर्थात तुम्हाला ते चालेल कारण तो (स्वार्थाचा)राजकीय भाग आहे).
प्रत्यक्ष पित्याला हत्तीच्या पायी दिलेले असतानाही धाकल्या छत्रपतीसाठी जिवाजी बाजी लावणारे , स्वतःचे वतन लिहून सोडून राजाराम महाराजांना जिंजीच्या वेढ्यातून सोडवणारे खंडोबल्लाळ 'स्वामीभक्त' ठरण्यासाठी कोणाच्या प्रमाण पत्राची आवश्यकता आहे काय?
महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेणारा महायोद्धा बाजीराव असो वा ज्याच्या कर्तृत्वाने केवळ अचंबित होवू शकतो असे माधवराव पेशवे असोत - ह्यांनी सातारकर छत्रपतींना कायम स्वामी मानले - कोल्हापूर आणि सातारा ह्यांच्यातले वाद मिटावे म्हणून सदैव प्रयत्न केले.
स्वराज्यासाठी वेळोवेळी अनेकांनी योगदान (अनेक त्याग, प्रसंगी बलिदान) दिले आहे - गोपालकृष्ण गोखले,टिळक, रानडे, आगरकर, कर्वे,वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर किती नावे घ्यावी...?
समाज सुधारणा करण्यासाठी धडपडणारे, अस्पृश्यता निवारण करण्यासाठी धडपडणारे आगरकर, सावरकर, प्रबोधनकार ठाकरे,साने गुरुजी ब्राह्मण होते.
महाराष्ट्रासाठी लढा देणार्यात अग्रणी आचार्य अत्रे,महाराष्ट्रासाठी अर्थमन्त्रिपदाचा राजीनामा नेहरूच्या तोंडावर फेकणारे चिंतामणराव देशमुख ब्राह्मण होते (चंद्र, सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणणारे स. का. पाटील कोण होते ? दिल्लीची हुजरेगिरी करणारे यशवंतराव चव्हाण कोण होते ? - यशवंतराव चव्हाण आणि नंतरचे सगळे चव्हाण तसेच पवार, पाटील ह्यांनी कायम दिल्लीपुढे गुढघे टेकलेलेच आहेत).
असो, आजही गाव पातळीपासून मंत्रालयापर्यंत कारभार हाकणारे (आणि लुटणारे) कोण आहेत? गावो गावात दलितांवर अत्याचार (बलात्कार/मारहाण/प्रसंगी हत्या) करणारे कोण आहेत?
आजही मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी लढणारे, समाजसेवेत अग्रणी असणारे कोण आहेत? स्वतःच्या कर्तृत्वाने (कला, क्रीडा आणि थोड्या फार प्रमाणात उद्योगात हि ) महाराष्ट्राची ध्वजा उंचावणारे कोण आहेत?
इतिहास उघड्या डोळ्यांनी आणि स्वच्छ मनाने पहा आणि तो चुकीचा वाटत असेल तर वर्तमान पहा (मागची एक दोन दशके) .
बरी वाईट माणसे सगळीकडे असतात मात्र म्हणून पूर्ण जातीला वाईट ठरविणे चूक आहे.
तुमच्या टिपण्णी मधून ब्राह्मण द्वेष दिसतो. आत्मपरीक्षणासाठी उदाहरणे दिली, कृपया जाती द्वेष थांबवा एवढीच मनःपूर्वक विनंती.
मित्र हो, आम्ही लहानपणापासून राजा शिवछत्रपती वाचतो, आम्हाला कधीच मुस्लीम द्वेष वाटत नाही. मुसलमानांना तेव्हाचे आक्रमक आपले वाटण्याचे काय कारण आहे? ते तेव्हा हिंदूच होते ही वस्तुस्थिती का लपवून ठेवली जात आहे? बाबासाहेबांनी ब्राह्मणांवर जे ताशेरे ओढले आहेत ते का लपवून ठेवले जात आहेत? मुस्लिम राज्यकर्त्यांकडून हिंदूंची अवहेलना थांबवण्यासाठी शिवरायांची तळमळ नव्हती का? त्यास काही नाव द्या. १. हिंदूंवर जिझिया कर लादण्याविरुद्ध औरंगज़ेबास शिवाजी महाराजांनी का पत्र लिहिले? २. मिर्झा राजेंना आपण एकाच धर्माचे आहोत, हे आवाहन का केले? ३. काशीते मंदिर पाडल्यामुळे शिवाजी महाराज व्यथित होते, हा उल्लेख रणजीत देसाईंच्या श्रीमान योगीमध्येसुद्धा आहे. इतिहास बाबासाहेबांना लपवता येत नाही आणि तुम्हालासुद्धा!
मित्रानो एकमेकांशी भांड नका
लेख चांगला आहे
आणि कृष्ण भास्कर कुलकर्णी लोकांच्या मनात एक घृणा म्हणून पाहिले जातात आज पर्यट
मी स्वतः जातीने 96 कुली मराठा आहे
आपापल्या पूर्वजांची यादि काढून वाद विवाद करण्यापेक्षया
या नरसिंह छत्रपति युगपुरुषाने काय केले
याचा बोध घ्या
शिवरायांच्या माराठा संराज्याच्या काळात भारत हां जगातील सर्वात श्रीमंत देश होता
आणि भिकारी पण दिसत न्हावते
याच कारन एवढाच आहे की,
त्या वेळ ची प्रजा अतिप्रामानिक होती
मग आता का नाही
आम्ही शुर ही तितकेच आहोत आणि हुशार ही तितकेच
फ़क्त इकमेकांची एकमेक्काला जाणीव ठेवायला पाहिजे
सगळी बाब ठेवा बीआजुला
आणि हो
मनोरंजनाच् एक ताज उदाहरण देतो
काल परवा झी टाकीज वर स्टेज शो होता
तर त्यात काही एक्टर्स एक्टिंग करात होते
ति
कशाचि म्हणायची तर महाभारतातल्या द्रोपदी वस्त्रहरण ची
स्टेज च वातावरण एकदम फालतू
आणि महत्वाच् म्हणजे
जी लोक हे पाहत होते
ते खुप एन्जॉय करात होते यांचा चाल्लेला विनोद पाहुन
ह्या भडव्यांच्गि एवढी हिम्मत की ज्या पांडवा मुले
भारत घडला
त्याचाच प्रयोग हे फालतू फ़िल्मी लोक मनोरंजनाची बाजू म्हणून घेतात
विरोध करायचा ना तर अगोदर असल्या प्रकाराना विरोध करा
!!जय भवानी!!
!!जय जिजाऊ!!
!!जय शिवराय!!
!!जय शंभुराजे!!
!!जयोस्तु मराठा!!
ARE MAVLYANO MAHARAJNCHE BODH VAKYA VISRLATE --- AAJ ATHVAN KAROON DETO NANTAR BHANDU NAKA --
' JO JO SHATRY JAISA JAISA ZAHLA TO TO SHATRU TAYSA TAYSA PADAKRANT KELA '
SHIVAJI MAHARAJ , KULKARNI , KHAN ANI SAVRKAR KAY TUMHALA KANAT SAGLA KHAR SANGUN GELE KA ???
KA TUMHALA CCTV CHA PURAVA PAHIJE AHE MARATHYNCHYA
( NOT ONLY MARATHA ) HI EKCH JAMAT AHE HI PAR VAYVELA(NORTH WEST ) BHIDLI PAR ATAK,PESHAVAR PARYANT
MARAGATHE HARLE FAKT 2 KARNANI ---
1) AAPAAPSATIL KALAH
2) JUNI HATYARE CAUSE WE ARE NOR EQUIPED AND AWARE
OF NEW SCIENCE AND TECHNOLOGY ARISING IN EUROPE .
BAHADDURI , HIMMAT , RAJKARAN , SAMAJKARAN HYAT MARATHE CHATRAPATI NANTAR KUTHECH KANI NHAVTE .
BHANDU NAKA , CHIKHALFEK TAR KARU NAKACH NAKA....
गायकवाड़ साहेब
यांची तळमळ आणि बांधीलकि आंबेडकर विचारांशी नाही आहे
यांची विचारसरानी ब्राम्हण द्वेष आणि मुस्लिम धर्मा बरोबर आहे
कारण कृष्णजी भास्कर ला महाराजानि मारल हे कोणीच लपवालेल नाही ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे
पण हे बालबुद्धि चे पोळ चंद्रराव मोरे आणि कृष्णजी भास्कर ची तुलना करतात याला काय बोलावे
कृष्णजी भास्कर हां साधा वकील आहे आणि मोरे हे स्वताला राजे म्हणावत
दौलत खान
नुरखान बेग
हे लोक महाराजां कड़े सुरवाती च्या काळात होते
तर सिद्धि हिलाल हां सरदार अफजल खाना बरोबर आला होता पण अफजल खान मेल्या नंतर स्वराज्यात सामिल झाले होते
महाराजांचा विरोध मुस्लिम धर्माला नव्हता पण त्यानी त्या मधे तुर्की आणि स्वकीय असा फरक नक्कीच केला आहे
तुर्की मुस्लिमानि इथल्या सामान्य रायतेच् छळ केला आणि त्याचं धर्मांतर केल आणि जुल्मी सत्ता राबवली
ह्याचा महाराजाना राग होता
त्याच वेळी दक्षिणी मुस्लिम जनता हिला महाराजानि कधीच विरोध केलेला नाही कारण हे लोक जबरदस्ती धर्मांतर केलेले होते किंवा महिला वर अत्याचार केल्या मुळे झालेले मुस्लिम होते
आजही कोकणात किंवा देशभरात मराठी किंवा हिन्दू आड़नावाचे मुस्लिम लाखो भेटतील
एक तर ह्या लोकां वर अत्याचार झाले आणि त्याचं धर्मांतर झाल आणि दुसऱ्या बाजूला स्वकीय हिंदू नी त्याना आपलस केल नाही
म्हणून हे लोक दुरावले आणि कायम चे मुस्लिम झाले
जस गोव्या मधे झाल फ़क्त विहिरि मधे पावाचे टुकड़े टाकून ते पाणी पियाल्या नंतर आपल्याच लोकांनी त्याना तुम्ही बाटला अस जाहिर केल
हिंदू धर्मा मधील त्याकाळी असणाऱ्या ख़ुळचट कल्पना मुळे लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन झाल नाही
पोळ तुमच कर्तुत्व काय आहे हो
उगाच एखाद्या शेंबड्या मुलाने उठायाच् आणि कोणालाही काहीही बोलायच अस झाल आहे तुमच
ज़रा डोक शांत ठेवा उमाजी नाईक यांचा कोणी कधी अपमान केला आहे का
त्यांचा त्याग कोणी नाकरला आहे का
अर्थात तेवढी आमची लायकी नाही याची जान आम्हाला आहेच
तुम्ही टिळक यांची उनिधुनि काढता त्याच वेळी हे विसरता की
इंग्रजांनी त्याना भारतीय असंतोषाचा जनक म्हणाल आहे
शाहू महाराज आणि टिळक यांची ऊँची पहा कार्य पहा
आणि तुमच कर्तुत्व काय आहे की तुम्ही त्यांच्या वैचारिक मतभेदा वर भाष्य कराव
सावरकर 2 वेळा झालेली जन्मठेप पहा
त्यानी भोगलेल्ल्या यातना पहा
त्यानी शिवरायां वर लिहिलेल काव्य तुम्हाला दिसत नाही
म्हणजे मुसळ दिसत नाही आणि कुसळ मात्र दिसत
आग्र्याच्या सुटके नंतर सापडलेले डाबिर आणि सोनदेव हे वकील जर फौलाद खानच्या कैदे मधे महाराजांचा प्लान सांगतात तर महाराज आले असते का परत
9 महीने त्यालोकानी छळ सहन केला आणि नेताजी पालकर चौथ्या दिवशी मुस्लिम झाले यावरून किती छळ होत असेल याची कल्पना येईल
कृष्णजी बोकिल हां जर अफजल खानाला फितूर झाला असता आणि महाराजांचा प्लान त्याला सांगितला असता तर वाचले असते का महाराज..??
उगाच तुमचे सड़के विचार आम्हाला नका सांगू ते तुमच्या कड़े राहुद्या
आम्हाला मराठी मानसाच् योगदान समजत तो ब्राम्हण का बहुजन हां फरक तुम्ही करा
आम्हाला नका शिकवु
आणि हां सडका आणि द्वेषाचा इतिहास तुमच्या मुलाना शिकवा
आमच्या मुलाना माफ़ करा
कृष्णजी भास्कर ला मारल हे आम्हाला माहीत आहेच की
ते कोणी लपवल आहे
आता वाई च्या ब्राम्हणानि यज्ञ केला हां शोध तुम्हाला कुठून लागला हे नाही सांगिताल तुम्ही
टिळक आणि शाहू महाराज यांची सामाजिक ऊँची पहा काय आहे ते
आणि तुमच कर्तुत्व तपासून पहा मग तुमचा अधिकार पोचतो का ते त्यांच्या बद्दल बोलायचा
आधी तुमची योग्यता तपासा
टिळकाना इंग्रज बोलतात भारतीय असंतोषाचा जनक अस
राहिले सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा झालेले ऎसे किती लोक तुम्हाला माहीत आहेत
आणि त्याना ती शिक्षा कशा साठी झाली ते पहा एकदा
त्यानी लिहिलेल्या पुस्तका मधल एक वाक्य उचलायच आणि आम्हाला सांगायच बाकीच् पुस्तक आम्ही वाचाल आहे पोळ साहेब
राहिला बाजीप्रभु चा विषय तर
तर ते कोण आहेत ते तुम्ही नका आम्हाला सांगू
माझ गाव च वेळवंड खोऱ्यात आहे
आणि माझ्या बाजूला शिंद हे बाजीप्रभुनच् गाव आहे
ईथे या आणि मग आम्हाला त्यांची जात शिकवा
तेंव्हा हां असला सडका इतिहास तुमच्या जवळ ठेवा
तुमची योग्यता नाही हे मात्र नक्की
पोळ हे घ्या पहिल माझ नाव
प्रशांत देशमुख भोर तालुका पुणे जिल्हा
यादाव सत्ते चा अस्त झाल्या नंतर पुढे स्वराज्य एई पर्यन्त
यवनांची सत्ता होती
सपूर्ण समाज़ गुलामगिरी मधे असताना
तेंव्हा कुठे ब्राम्हणी सत्ता होती हो..??
का सगळेच मुस्लमानाचे गुलाम होते
उगाच काही पण सांगू नका
संपूर्ण भारत यवनी आक्रमनाने त्रासला असताना कसली आली ब्राम्हण गुलामी हो
शहाजी राजे आणि लखुजि जाधव यांची नोकरी म्हणजे राजकीय भाग
आणि तेच काम ब्राम्हणानि केल की त्या म्हणजे नोकरया
ब्राम्हणानि परकीय आक्रमानांच्या नोकऱ्या पत्कारल्या तर मराठ्यांनी 1300 साला पासून दूसर काय केल..??
तुमच्या
मोरे चंद्रराव
खोपडे
घाडगे
पांढरे
खराटे
सावंत
सुर्वे
शिर्के
निंबाळकर
जाधव
भोसले
बाजी घोरपडे
कृष्णजी बांदल
यानी कोणत्या स्वराज्य साठी पायघड्या घातल्या होत्या ते तरी सांगा
उगाच अकलेचे तारे तोडू नका आणि आम्हाला शहाणपण शिकवु नका कोणती नोकरी आणि कोनत राजकारण हे न समजन्या एवढे आम्ही दुधखुळे नाही
आणि ज्या ब्रामनानि महाराजाना विरोध केला ना त्यापेक्षा मदत केलेल्या लोकांची यादि खुप मोठी आहे
आम्ही मराठ्यांनी वतना साठी काय काय केल आहे ते आम्हाला माहीत आहे
ब्राम्हणानि केल की फितुरि आणि आम्ही केल की मग राजकारण काय..??
वर जी यादि दिली आहे त्याचं काय राजकारण होत ते समजावून सांगा ज़रा आम्हाला
आणि ही यादि अजुन खुप मोठी आहे
ही फ़क्त झलक दाखवली आहे तुम्हाला
लाचार आम्ही पण होतो
सत्ते साठी
वताना साठी
चला मान्य करुया की दादोजी महाराजांचे गुरु नाहीत
पण आता मला सांगा शहाजी राजानी महाराजांची जबाबदारी कोना वर दिली होती
पुण्या मधला लाल महाल आणि शिवपुर चा महाराजांचा वाडा कोणी बांधला
मग जर दादोजींचा काही संबंध नाही तर ते त्याठिकानि कशाला असतील..??
महाराजांचे ते गुरु होते अस कोणीही बोलल नाही तर
महाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था होती त्याची जबाबदारी दादोजी वर होती
तुम्ही त्याचं महाराजांच्या आयुष्यात असलेल अस्तित्व नाकारु शकत नाही
आता रामदास यांच्या विषयी तुम्हीच मला माहिती दया थोड़ी
1-निश्चयाचा महामेरु हे पत्र महाराजाना कोणी लिहिल
2- शिवरायांचे आठवावे रूप हे पत्र संभाजी राजांना कोणी लिहिल
3- चाफळ ला राहाणारे रामदास अचानक स्वराज्याच्या सज्जनगडा वर राहायला कसे आले
4- ज्याना महाराज भेटले नाहीत आशा रामदास स्वामिला गडा वर राहून कस दिल
5- चाफळ ची सनद महाराजानि रामदास स्वामीना का दिली
6- त्या सोबत जे पत्र महाराजानि लिहिल आहे त्यात रामदास स्वामींचा उल्लेख गुरुवर्य असा का केला आहे
7- रामदास स्वामिनी समाधि घेतल्या नंतर संभाजी राजानी त्याचं मंदिर सज्जनगड़ा वर फ़क्त 6 महिन्यात का बांधून घेतल
उगाच कोणाच् पण ऐकून काही पण विचार करू नका
आपण कितीही नाकारल तरी सत्य बदलत नाही
अफजल खाना सोबत महाराजांचे काका मंबाजी भोसले होते
खंडोजी खोपडे हे उत्रोलि तर्फ भोर इथेले देशमुख आहेत
इरफान तुमच कौतुक वाटत आहे की आपण हे वाचल आहे
पण तुम्हाला खर सांगू का महाराज असते तर पोळ ची मिरवणूक हत्ती वरुण काढायाची गरज नसती पडली
कारण पोळ याचं लिखाण एवढं महान नाही आहे
पण
त्यांची मिरवणूक गाढवा वरुण नक्की काढावि
मी छाती वर हात ठेवून तुम्हाला सांगतो हां माणूस समाजा मधे द्वेष पसरावन्याच् काम करतो आहे
तुम्हाला जर खरच महाराज समजून घ्यायचे असतील तर
शिवभारत वाचा
जेधे शकावली वाचा
आणि सभासद बखर वाचा
हे ज्याणी लिहिल आहे त्या लोकांनी प्रत्यक्ष महाराजाना पाहिल् आहे त्यांच्या सोबत काम केल आहे
हे पोळ सारखे लिखाण करणारे त्या लिखानाचा वट्टेल तो अर्थ काढतात
त्यापेक्षा तुम्ही स्वता वाचा आणि स्वताच्या बुद्धि प्रमाणे विचार करा
अगदी बरोबर
जशी जशी नविन कागड़पत्र समोर येतात तसा इतिहास पुन्हा मांडावा लागतो
मी प्रशांत देशमुख
वेळवंड खोरे तर्फ भोर
आमचा एक महजरनामा आहे 1670 साल चा
त्या वेळी स्वता महाराज सुद्धा उपस्थित होते
असा उल्लेख आहे
वेळवंड खोरे हे वाई खोऱ्यां पासून तस जवळच आहे
हे कृष्णजी भास्कर वाईचे अफजलखाना चे सुभेदार पण होते
तर सदर महजरनामा वाचला असता त्यात सुभेदार म्हणून कृष्णजी भास्कर यांचा उल्लेख आहे
म्हणजे याचा अर्थ असा निघतो की
जसे सिद्धि हिलाल, नाईकजी पांढरे ही माणस अफजल खान मेल्या नंतर महाराजाना सामिल झाली
तसेच कृष्णजी भास्कर याना अफजल खाना पासून महाराजानि पूर्वीच आपल्या बाजूला वळवल असण्याची शक्यता आहे
कारण
मित्रानो हे सगळ आम्हाला माहीत आहे
पण त्या पोळ ला कोणी तरी सांगा
आणि पोळ थोड़ी अक्क्ल शिका या नविन मुलां कडून
ब्लॉग तुमचा आणि प्रतिक्रया देणारे तुम्हालाच मूर्खात काढत आहेत
या वरुण तरी समजून जा आम्ही इतिहास वाचला आहे काय अगदी कोळून पियालो आहे
आणि एक लेखकाच् लेखन वाचून नाही आम्ही बोलत तर 10 वेगळ्या वेगळ्या लोकांची पुस्तक वाचली आहेत आणि मग आमच मत तैयार झाल आहे
तेंव्हा तुमचा बालिशपना बंद करा
मित्रानो हे सगळ आम्हाला माहीत आहे
पण त्या पोळ ला कोणी तरी सांगा
आणि पोळ थोड़ी अक्क्ल शिका या नविन मुलां कडून
ब्लॉग तुमचा आणि प्रतिक्रया देणारे तुम्हालाच मूर्खात काढत आहेत
या वरुण तरी समजून जा आम्ही इतिहास वाचला आहे काय अगदी कोळून पियालो आहे
आणि एक लेखकाच् लेखन वाचून नाही आम्ही बोलत तर 10 वेगळ्या वेगळ्या लोकांची पुस्तक वाचली आहेत आणि मग आमच मत तैयार झाल आहे
तेंव्हा तुमचा बालिशपना बंद करा
पोळ आता खुप पोळत आसेल
तर तर बंद करा तुमचा बकवास
कारण ईथ सगळे मराठा आहेत आमचे राजे कसे होते
है आमाला माहीती आहे तुमचा ईतीहास 100 वर्षाने
सांगा तरी कोनी आईकनार नाही
पोळ आता खुप पोळत आसेल
तर तर बंद करा तुमचा बकवास
कारण ईथ सगळे मराठा आहेत आमचे राजे कसे होते
है आमाला माहीती आहे तुमचा ईतीहास 100 वर्षाने
सांगा तरी कोनी आईकनार नाही
https://www.rajasthanhistory.com/blog/chhatrpati-maharaj-shivaji-raje/chhatrapati-maharaj-shivaji-raje-4-the-execution-of-afzal-khan
ह्या हिंदी वेबसाईटवर छत्रपती शिवराय यांचा चुकीचा इतिहास मांडला आहे या विरुद्ध कुठे तक्रार करता येईल का?
अरे मुर्खा निजाम शहा हा मुळचा ब्राम्हण होता राज्याभिषेका वेळी महाराजां वर ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला होता
अरे भाऊ महाराजांना जेवढ्या वेळा विरोध झाला तो ब्राह्मणांन कडून आणि हे दस्ता ऐवजा मध्ये आहे गाढवा
पोळ ...
अहो अभ्यास करुन लिहा हो ...
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू मौनी महाराज मुस्लिम ????
अभ्यास कमी पडतोय आणि द्वेष पसरवण्याचा उद्योग जास्त दिसतोय तुमचा ...
महाराजांचे गुरु मौनी महाराज हे मूळच्या उत्तर प्रदेशातून धार्मिक आक्रमणातून धर्म वाचवण्यासाठी भारतात परिक्रमेस आलेल्या अनेक साधू संतांपैकी एक असून ते सुरुवातीला चंदगड तालुक्यातील हेरे गावात आल्याची नोंद सापडते आणि त्यानंतर उत्तूर, बाळेघोल, बुदलमूख येथून कोकणात आणि तेथून शेवटच्या काही वर्षात पाटगाव येथे आले असून ते मुस्लिम असल्याचा शोध आपण कसा लावला !!!!
आपल्याला कदाचित 'बाबा याकूत' म्हणायचे असेल पण आपल्या वाचनात ऐतिहासिक दस्त कमी आणि पिवळी पुस्तके जास्त आल्याचे आढळते ...
असो ... कोण हिंदू होते आणि कोण मुस्लिम होते हे दाखवून देऊन भांडणे लावायचे तुमचे मूळचे उद्योग करु नका ...
भारतीय बना ...
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ