भ्रष्टाचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भ्रष्टाचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ऑक्टोबर १७, २०११

अण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद

अग्निवेश का बाहेर पडले ?
भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रणशिंग फुंकले आहेत. देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी देशात प्रभावी जनलोकपाल कायदा मंजूर करणे, परदेशातील काळा पैसा भारतात आणणे, निवडणुकांच्या पद्धतींमध्ये बदल घडवणे आणि हे सर्व अंमलात आणण्यासाठी उपोषण, मौनव्रत, सरकारवर टीका, राजकीय-सामाजिक दबाव अशा मार्गांचा अवलंब करणे असे सर्व वातावरण आहे. अण्णा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे.

शनिवार, एप्रिल १६, २०११

अण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न

सध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटवर कुठेही जा...एकाच गोष्टीची चर्चा...अण्णा हजारेंचे आंदोलन. एका रात्रीत अण्णांना देवत्व बहाल करण्यात आले. आण्णा म्हणजे या देशातील सर्व सामन्यांचे मसीहा, तारणहार अशा प्रकारची मांडणी केली गेली. काही उत्साही अण्णाप्रेमी तर घोषणाच देत होते, ‘अण्णा हजारे आंधी है, देश कें दुसरे गांधी है’. गांधींना पण बरे वाटले असेल...चला एकदाचा दुसरा गांधी तयार झाला (कि केला) तर...समाजात अण्णा हजारे म्हणजे दुसरे गांधी आहेत असे मानून त्यांच्या आंदोलनाची, उपोषणाची भरपूर चर्चा केली गेली.

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes