![]() |
अग्निवेश का बाहेर पडले ? |
भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रणशिंग फुंकले आहेत. देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी देशात प्रभावी जनलोकपाल कायदा मंजूर करणे, परदेशातील काळा पैसा भारतात आणणे, निवडणुकांच्या पद्धतींमध्ये बदल घडवणे आणि हे सर्व अंमलात आणण्यासाठी उपोषण, मौनव्रत, सरकारवर टीका, राजकीय-सामाजिक दबाव अशा मार्गांचा अवलंब करणे असे सर्व वातावरण आहे. अण्णा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे.
देशातील भ्रष्टाचार संपला पाहिजे हीच सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. कारण सर्वात जास्त नुकसान आणि त्रास सहन करावा लागतो तो या सामान्य लोकानांच. त्यामुळे अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी जे करताहेत त्यामुळे आपले जीवन सुखकर बनेल या भाबड्या आशेने अनेकांनी अण्णांकडे डोळे लावले आहेत. त्यामुळे अण्णा, त्यांचे सहकारी किंवा त्यांच्या आंदोलनाची चिकित्सा करायची म्हटले तर बरेच लोक भुवया विस्फारून पाहतात. परंतु सत्यशोधन हा जागृत माणसाचा गुणधर्म आहे. त्यामुळे जो माणूस कुणाचा गुलाम नाही, कुणाचा भक्त नाही तो माणूस जर चिकित्सा करू लागला तर काय चुकले ?
अण्णांचे आंदोलन उभे राहिल्यानंतर या देशातील प्रसारमाध्यमांनी रात्रंदिवस अण्णा हजारेच दाखवले. अण्णांचे उपोषण चालले होते त्या १०-१२ दिवसाच्या कालावधीत टीवी वर फक्त अण्णा, अण्णा आणि अण्णा. अण्णांना जणू काय यांनी देवत्व बहाल करून टाकले. अण्णा हजारे उपोषण करत होते, तेव्हा अण्णांच्या सहकार्यांपैकी का कुणी उपोषणाला बसले नाहीत. वयस्कर अण्णांना उपोषणाला बसवून त्यांचे सहकारी असणारे केजरीवाल, बेदी मात्र खावूनपिवून भाषणे ठोकत असत. यांच्या बोलण्याला तर सुमार राहिला नव्हता. केजरीवाल आणि बेदी बाईंनी तोंडाला फेस येईपर्यंत भाषणे ठोकली. ग्रामीण भागातील बहुजन नेत्यांची टिंगल टवाळी करत आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन केले. हे दोघे आपल्या तोंडाची वाफ घालवत असताना अण्णा मात्र त्यांना एका शब्दाने बोलत नव्हते याचेच जास्त आश्चर्य वाटत होते. त्यावेळी अण्णा बोलायचे ते फक्त घोषणा देण्यासाठी. अण्णा घोषणा द्यायचे आणि बेदी, केजरीवाल सरकार बरोबर चर्चा करायचे. गोपीनाथ मुंडे अण्णांना भेटायला गेले तर या बेदी बाईंनी चक्क 'चोर आया' म्हणून त्यांची निर्भत्सना केली. पत्रकारांनी स्पष्टीकरण विचारले तेव्हा म्हणाल्या, 'मैने उनको पहचाना नही.' पहिली महिला आयपीएस अधिकारी. कर्तुत्ववान महिला अधिकारी. सर्व देश फिरलेला. भरपूर अनुभव गाठीशी. आणि गोपीनाथ मुंडे, भाजपाचे खासदार. देशात ओबीसीचे नेते म्हणून ओळख. तरीही या खासदाराला माजी आयपीएस अधिकारी असलेल्या किरण बेदी यांनी ओळखले नाही. आश्चर्य वाटते ना ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख अण्णांच्या स्टेजवर येवून गेले. खरेतर तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण संघाचे स्वरूप, त्यांचे कार्य आणि विचारसरणी या सर्वांना विरोध करणारा एक मोठा वर्ग भारतात आहे. समाजावर ब्राम्हणी वर्चस्व लादण्यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी वाटेल तसा मार्ग अवलंबणे ही संघाची कामे. संघ ही ब्राम्हणी विचारांची संघटना असल्याने बहुजन समाज संघापासून फटकून असतो. अण्णांना संघाचा पूर्ण पाठींबा आहे. आणि अण्णानाही ते मान्य आहे. त्यामुळे बहुजन समाज अण्णांकडे संशयास्पद नजरेने पाहू लागला. अण्णांच्या लोकपाल बिलात बहुजन, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक यांना काहीच जागा नाही हे लक्षात आल्यानंतर तर बहुजन समाजातील अनेक जागृत घटकांनी अण्णांच्या या बिलाला विरोध केला.
अण्णांचे जुने सहकारी असणारे अनेकजण आता अण्णांच्या सोबत नाहीत. अण्णांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत अनेकांनी त्यांच्याशी काडीमोड घेतली आहे. काहीजणांना तर अण्णांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अक्षरशः हाकलून लावले आहे. टीम आण्णा म्हणजे केजरीवाल, बेदी आणि प्रशांत भूषण यांच्या शिवाय अण्णांचे पानही हलत नाही. अण्णांच्या या कोर टीम शिवाय अण्णा कोणताही निर्णय स्वतंत्रपणे घेवू शकत नाहीत. अण्णा मुळातच हेकेखोर आहेत. बोलताना अण्णा बऱ्याच वेळा चुकतात. केजरीवाल आणि बेदी यांना तर आपण स्वतःच अण्णा असल्याचा भास होत असेल. केजरीवाल यांच्या समर्थकांनी तर आता त्यांना भावी पंतप्रधान ठरवून टाकले आहे. (कदाचित किरण बेदी यांना गृह मंत्रालय आणि प्रशांत भूषण यांना न्याय खाते मिळू शकते.) अविचाराने बडबडणे किती धोकादायक आहे ते प्रशांत भूषण यांना समजले आहे. त्यांना जी मारहाण झाली ती अतिशय दुर्दैवी होती. परंतु जबाबदार व्यक्तीनीही बोलताना तोंडावर संयम ठेवला पाहिजे. पण अण्णा आणि त्यांची टीम यापैकी कुणाचेच आपल्या तोंडावर नियंत्रण नाही.
अण्णा कॉंग्रेसला विरोध करतात. अण्णा म्हणतात येत्या निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान करू नका. मग मतदान करायचे कुणाला ? कॉंग्रेसचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी भाजपला ? कि अण्णा त्यांचे स्वताचे उमेदवार उभे करणार ? अण्णांनी राजकीय भूमिका घ्यायला हरकत नाही. तसा त्यांना पूर्ण अधिकार आहे, परंतु अमुक एका पक्षाला पाडा किंवा त्यांना मते देवून नका असे सांगताना ज्यांना आपण पाठींबा देणार आहोत त्यांच्या स्वच्छ कारभाराची खात्री अण्णा देणार काय ? मागे अण्णांनी असे वक्तव्य केले होते कि भाजपने जनलोकपाल बिलाला पाठींबा दिला तर भाजपला पाठींबा दिला जाईल. मग कॉंग्रेस ने या बिलाला पाठींबा दिला तर कॉंग्रेसला पाठींबा देणार का ? किंवा भाजपने या बिलाला पाठींबा देवून ही भ्रष्टाचार केला तरी भाजपचे समर्थन करणार का ? या प्रश्नांची उत्तरे अण्णांना द्यावी लागतील.
कॉंग्रेसच्या किंवा इतरांच्या भ्रष्ट नेत्यांबद्दल अण्णा बोलतात पण भाजप बद्दल अण्णांनी एवढा सोफ्ट कॉर्नर का घेतला आहे ? कालच येडीयुरप्पा यांना अटक झाली. आणि दररोज पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर भरभरून बोलणारे अण्णा मौनव्रत धारण करून बसले आहेत ? मौनव्रत धारण करण्याने प्रश्न सुटणार नाहीत. उलट अण्णांनी बोलले पाहिजे. त्यांची मते जनतेपर्यंत पोहचली पाहिजेत. प्रशांत भूषण यांच्यासंदर्भात अण्णांची काय भूमिका आहे, येडीयुराप्पा आणि भाजपच्या इतर भ्रष्टाचाराबद्दल अण्णा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (मी कॉंग्रेस चा समर्थक नाही आणि भाजपाचाही नाही. मला जेवढा कॉंग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा राग येतो तेवढाच भाजपच्या भ्रष्ट आणि जातीयवादी धोरणांचाही येतो. पण अण्णा मात्र भाजपच्या भ्रष्ट कारभार आणि जाती-धर्मवादी विचारांकडे का दुर्लक्ष करत आहेत तेच समजत नाही.) अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट करत असताना त्याबद्दल जर काही प्रश्न उपस्थित झाले तर किमान त्यांना उत्तरे तरी द्यावीत. त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याने अण्णांची विश्वासार्हता धोक्यात येत आहे.
अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, बहुजन जनतेबद्दल काहीही देणेघेणे नाही अशा प्रकारची टीका व्हायला लागल्यानंतर अण्णांचे उपोषण सोडवायला एक दलित आणि एक मुस्लीम मुलगी बोलावण्यात आली. आणि त्यांच्या जात-धर्म सर्वांना कळेल अशा पद्धतीने पसरवले गेले. म्हणजे दलित आणि मुस्लीम मुलीच्या हातून लिंबू-पाणी पिले म्हणजे तुम्हाला या घटकांचा कळवळा आहे असे सिद्ध होत नाही. समाजातून टीका व्हायला लागल्यानंतर अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हे शहाणपण सुचावे याचेच जास्त आश्चर्य वाटते. संसदेत लोकपाल बिलावर चर्चा चालू असताना शरद यादव म्हणाले, अण्णा महाराष्ट्रातील असून त्यांना महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी माणसे दिसली नाहीत. (आणि त्यानंतर अण्णांनी या महामानवांची नावे घेतली) अण्णांनी कधीही जातीव्यवस्था, धार्मिक दंगली आणि दहशतवाद अशा सामाजिक प्रश्नी भूमिका घेतली नाही. याचे कारण काय ?
अण्णांचे आंदोलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाताळत असल्याचीही टीका अनेकांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी अण्णांना भेटून गेले. त्यांचे स्वयंसेवक हे अण्णांबरोबर होते आणि आहेत. अण्णांचे सहकारी केजरीवाल आणि संघाचे जवळचे संबध असल्याचे मागे दै. सकाळ मध्ये आले होते. केजरीवाल यांचे कुटुंबीय ही संघाशी संबंधित आहेत. त्यातच अण्णांचे भाजपला विरोध न कारणे, त्यांच्या भ्रष्टाचारावर न बोलणे यासारख्या बाबीतून या आंदोलनात संघाचा हात असल्याचा संशय अनेकांना येतोय. अण्णांनी आजवर महाराष्ट्रात अनेक आंदोलने आणि उपोषणे केली. त्यावेळी जरी त्यांना आज इतकी प्रसिद्धी मिळाली नसली तरी अण्णा हजारे हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहचले होते. भ्रष्टाचार आणि अनैतिक मार्गांविरुद्ध असलेला लढा लढताना एकेकाळी अण्णांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिलेदार सध्या कुठे गायब आहेत तेच कळत नाही. यातील काहीजण अधूनमधून टीवीवर किंवा वर्तमानपत्रातून अण्णांचे आंदोलन, त्यांची कार्यपद्धती, त्यांचे सहकारी आणि एकूणच अण्णांची भूमिका (सुरुवातीची आणि सध्याची) याचे विश्लेषण करताना दिसतात. जो माणूस अण्णांच्या पाठीशी आहे, त्यांच्या हो ला हो म्हणतो, तो चांगला. जरा वेगळी भूमिका घेतली कि तो गद्दार. अण्णांचे आजवरचे सहकारी असणारे देसरडा आज अण्णांबरोबर का नाहीत ? स्वामी अग्निवेश हे आजपर्यंत नव्हे आत्तापर्यंत अण्णांबरोबर होते. ते आज का बाहेर आहेत. आजवर आपले सहकारी असणाऱ्या या लोकांना बरोबर घ्यावे असे अण्णांना का वाटले नाही ? सरकारचा हेर म्हणून अग्निवेश यांना टीम अण्णाने बाहेर काढावे आणि अग्निवेश यांनी अण्णा आणि त्यांच्या आंदोलनावर ब्राम्हणवादाचा आरोप करावा याला काय म्हणावे. जेव्हा स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला झाला होता तेव्हाच अग्निवेश यांना अण्णांचे मौन खटकले होते. नंतर टीम अण्णा आणि अग्निवेश यांच्यातील मतभेद वाढतच गेले आणि त्याचे पर्यावसान अग्निवेश यांच्या हकालपट्टीत झाले. देसरडा आणि अग्निवेश दोघानीही अण्णांच्या आंदोलनावर ब्राम्हणवादाचा शिक्का मारला आहे. तो शिक्का पुसण्यासाठी तरी अण्णांनी तोंड उघडावे.
अण्णांचे आंदोलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाताळत असल्याचीही टीका अनेकांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी अण्णांना भेटून गेले. त्यांचे स्वयंसेवक हे अण्णांबरोबर होते आणि आहेत. अण्णांचे सहकारी केजरीवाल आणि संघाचे जवळचे संबध असल्याचे मागे दै. सकाळ मध्ये आले होते. केजरीवाल यांचे कुटुंबीय ही संघाशी संबंधित आहेत. त्यातच अण्णांचे भाजपला विरोध न कारणे, त्यांच्या भ्रष्टाचारावर न बोलणे यासारख्या बाबीतून या आंदोलनात संघाचा हात असल्याचा संशय अनेकांना येतोय. अण्णांनी आजवर महाराष्ट्रात अनेक आंदोलने आणि उपोषणे केली. त्यावेळी जरी त्यांना आज इतकी प्रसिद्धी मिळाली नसली तरी अण्णा हजारे हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहचले होते. भ्रष्टाचार आणि अनैतिक मार्गांविरुद्ध असलेला लढा लढताना एकेकाळी अण्णांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिलेदार सध्या कुठे गायब आहेत तेच कळत नाही. यातील काहीजण अधूनमधून टीवीवर किंवा वर्तमानपत्रातून अण्णांचे आंदोलन, त्यांची कार्यपद्धती, त्यांचे सहकारी आणि एकूणच अण्णांची भूमिका (सुरुवातीची आणि सध्याची) याचे विश्लेषण करताना दिसतात. जो माणूस अण्णांच्या पाठीशी आहे, त्यांच्या हो ला हो म्हणतो, तो चांगला. जरा वेगळी भूमिका घेतली कि तो गद्दार. अण्णांचे आजवरचे सहकारी असणारे देसरडा आज अण्णांबरोबर का नाहीत ? स्वामी अग्निवेश हे आजपर्यंत नव्हे आत्तापर्यंत अण्णांबरोबर होते. ते आज का बाहेर आहेत. आजवर आपले सहकारी असणाऱ्या या लोकांना बरोबर घ्यावे असे अण्णांना का वाटले नाही ? सरकारचा हेर म्हणून अग्निवेश यांना टीम अण्णाने बाहेर काढावे आणि अग्निवेश यांनी अण्णा आणि त्यांच्या आंदोलनावर ब्राम्हणवादाचा आरोप करावा याला काय म्हणावे. जेव्हा स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला झाला होता तेव्हाच अग्निवेश यांना अण्णांचे मौन खटकले होते. नंतर टीम अण्णा आणि अग्निवेश यांच्यातील मतभेद वाढतच गेले आणि त्याचे पर्यावसान अग्निवेश यांच्या हकालपट्टीत झाले. देसरडा आणि अग्निवेश दोघानीही अण्णांच्या आंदोलनावर ब्राम्हणवादाचा शिक्का मारला आहे. तो शिक्का पुसण्यासाठी तरी अण्णांनी तोंड उघडावे.
![]() |
अण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद |
स्वामी अग्निवेश म्हणतात-
- अण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद आहे.
- अण्णांच्या आंदोलनावर संघाचा प्रभाव आहे.
- लोकपाल बिलात दलित, आदिवासी, मुस्लीम यांना प्रतिनिधित्व हवे.
- सर्व निर्णय अण्णा आणि अरविंद केजरीवाल घेतात. कोर समितीला महत्व नाही.
- अण्णांच्या आंदोलनात लोकशाही नाही. अण्णा व्यक्तिवादी आहेत.
- महाराष्ट्रातील कोणताही मोठा सामाजिक कार्यकर्ता अन्नासोबत नाही.
स्वामी अग्निवेश यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे त्यांना टीम अन्नामधून बाहेर काढल्यानंतर केले आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद करून काहीजण या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न करतील. परंतु वरील प्रश्न वारंवार विविध सामाजिक कार्यकर्ते, दलित, बहुजन संघटना विचारत होत्या. हे मुद्दे जरी स्वामी अग्निवेश यांनी टीम अण्णाबरोबर झालेल्या वादानंतर मांडले असले तरी ते अतिशय महत्वाचे आहेत. या मुद्द्यांचे स्पष्टीकरण अण्णा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिले पाहिजे.
32 टिप्पणी(ण्या):
अत्यंत एकांगी आणि फडतूस लेख !!
http://www.harkatnay.com/2011/08/blog-post_23.html
Useless lekh. Jya Gopinath Mundencha ithe ullekh aahe. Tech Munde BJP che khasdar aahet, ani BJP tar sanghachi rajkiy shakah aahe. Kaay mhanane aahe aaple?
Shivay Munde jevha bhetayala gele teva te ekte navte tar bahujan nasalele Ananth Kumar pan tyanchya sobat hote. Kahitaree chukiche lihayache.
मोठे व्हा!!!
lok evendhi khuli kahi rahili mitra ki tuzya bolanyavar vishwas thevtil. Red color cha changala vapar kelay pan useless.
saglech lok kahi brahman nahit khuli asayala............
bahujan samaj Bamcef ,Sambhaji brigade ,BMM yanchyamule tyala bare ani vait yatil farak kalu laglay
@हेरंब-
tuamch hi pratikriya mhanaje mi yogya margavar aahe yache pratik aahe.
thanks.
@kalandar-
Gopinath Munde BJP che nete aahet parantu te bahujan asalyane anekvela tyanchi kuchambana hote. Munde yanchyabarobar je je nete bhetayala gele tyat sarvanchya najara aani rokh Munde yanchyavarach hota. tyamule Kiran Bedi ya kunala chor mhnalya he vegle sangayachi aavashyakata nahi. Jar tyancha tasa uddesh nasta aani gairsamaj pasaravala jaat asel tar tyani dilgiri vyakt karayala havi hoti. pan nahi aapalya bhumikeche samarthan karat rahilya.
aananchay aandolana che mala mahit nahi.... pan tumcha lekh jatiyawad pasrawatoy..
@Prakash,
Gopinath Mundechi kuchambana mhanjae kaay? Mulgee aamdar, Javai aamdar ani Putnya pan aamdar. hee mhanje kuchambana asel tar matra naailaj aahe. (Mundena kaay kaay mialale he mii yethe lihit nahi, karan tyat tyanche kartutva pan ahech.)
"Munde yanchyabarobar je je nete bhetayala gele tyat sarvanchya najara aani rokh Munde yanchyavarach hota" Tumhala kase kalale ki sagle tyanchya kadech pahat hote.
एका अंगाने विचार करून आणि निम्मं दृष्टीकोंनतून लिहिलेला लेख ...
फेसबुक वरील विद्रोही तुकाराम यांनी सदर प्रतिक्रिया दिली आहे.
नावात सह्याद्री तर तो तुमच्या लोगो मध्येही दिसावा..
सह्याद्रीचा बाणा..हे नाव त्या लोगो मधून झळकावे..
सह्याद्री म्हणजे डोंगर.. बाणा.. म्हणजे कडा..
अनेक आले आणि अनेक गेले पण हा सह्याद्री अजूनही कणखर कणा घेऊन ताठ उभा आहे...
अनेक शत्रूंना सह्याद्रीच्या ह्या कणखर कण्याने रोखून ठेवले..त्या मूळेच इथल्या मातीत..स्वातंत्र, मोकळेपणा , स्वावलंबी राहण्याचा ठेवा आहे..
हाच तो बाणा सह्याद्रीचा..आणि तसाच असावा सह्याद्रीतील लोकांचा बाणा...स्वतंत्र, निर्भीड, ताठ..मजबूत, पोलादी...
ज्यांचे विचार ह्या सह्याद्री प्रमाणे कणखर असावेत..अनेक आक्रमणे होतील..तरीही हा विचारांचा कणा कधी वाकला नाही पाहिजे...अथवा तो मोडला नाही पाहिजे
माणसाला जसा हाडाचा कणा नसेल तर तो पांगळा होतो..तसाच जर माणसाला विचारांचा कणा नसेल तर तो लाचार होतो...
इतरांना दोष देऊन काही उपयोग नाही प्रत्येकाने आपला कणा आपणच सांभाळायचा असतो...कितीही संकट आले तरी बेहत्तर.. पण ती वैचारिक गुलामगिरी नको..वैचारिक लाचारी नको...
असाच हवा तो मर्द मराठ्यांचा सह्याद्री बाणा..
सगळ्या दिशांना हरविणाऱ्या शूर वीर शंभू राज्यांचा सह्याद्री बाणा..अवघडातील अवघड प्रसंगातून सहजतेने मार्ग काढणारा शिवरायांचा सह्याद्री बाणा..स्वराज्याचा पहिला शंख नाद करणाऱ्या शहाजी राज्यांचा सह्याद्री बाणा...कुठल्याही मातीत शत्रूला लोळविणाऱ्या संताजी धनाजींचा सह्याद्री बाणा, हजारोंच्या सैन्यावर अवघे साता जणांनी हल्ला चढविणाऱ्या प्रतापरावांचा सह्याद्री बाणा...पावन खिंडीत धारातीर्थी पडलेल्या शेकडो बांदल सैनिकांचा सह्याद्री बाणा..पानिपता नंतर राखेतून सैन्य निर्माण करणाऱ्या महादजीचा सह्याद्री बाणा..शेकडो आया बहिणींची आब्रु वाचविणाऱ्या मराठा होळकरांचा सह्याद्री बाणा..अनेकांना धूळ चारणाऱ्या त्या प्रती शिवाजी नेताजीचा सह्याद्री बाणा..संकट समयी लक्ष विचलित न होता खंबीर पणे मागे उभे राहणाऱ्या हम्बीरावांचा सह्याद्री बाणा..तर शिवरायानवरचा घाव अंगावर घेणाऱ्या जीव महालाचा सह्याद्री बाणा..मातीच्या खडा नि खड्याशी हितगुज करणाऱ्या आमच्या बहिराजीचा बाणा ...पोटाच्या पोराला स्वराज्यासाठी मृत्युच्या अलींगणात हसत हसत पाठविणाऱ्या जिजाऊ मातेचा सह्याद्री बना.. हातात तलवारी घेऊन शत्रूला धूळ चारणाऱ्या ताराराणीचा सह्याद्री बाणा..समाजातील अन्यायावर वाचा फोडणारा शाहू, फुले, आंबेडकरांचा सह्याद्रीचा बाणा..
साक्षात हिमालयालाही लोळविल असाच हवा तो आमचा सह्याद्रीचा बाणा..सह्याद्रीचा बाणा..
साक्षात हिमालयालाही लोळविल असाच हवा तो आमचा सह्याद्रीचा बाणा..सह्याद्रीचा बाणा..
ह्या वाक्यात भविष्यकालीन फुटीरता वादाची बीजे आहेत. पुढेमागे खलिस्तानच्या धर्तीवर एखादी शिवस्तान निर्मितीची मागणी हिंसक वा अहिंसक स्वरुपात निर्माण होऊ नये एवढी दक्षता अवश्य घ्यावी. कृपया हे विधान हसण्यावारी नेऊ नये. आजपर्यंतच्या सर्वच फुटीरतावादी चळवळी ह्या अश्याच दुर्लक्षित विचारांतून निर्माण झालेल्या आहेत हे ध्यानी असावे.
परांजपे साहेब,
आपल्या फुटीरतावादी विचारांची आधी काळजी घ्या. राष्ट्राला कोणत्या विचारधारेमुळे धोका उत्पन्न होतो आहे, या देशात कोण दहशतवादी हल्ले करत आहेत ते पहा. ब्राम्हणी विचारसरणी हा आपल्या देशाचा नंबर एकचा शत्रू आहे. या ब्राम्हणी व्यवस्थेने देशाचे न भरून येणारे नुकसान केले आहे. हे प्रथम लक्षात घ्या. आम्ही या राष्ट्राला कोणत्याही व्यक्ती, जाती, धर्मापेक्षा श्रेष्ठ मानतो. राष्ट्राचे अहित होईल अशी कोणतीही गोष्ट आम्ही केली नाही आणि करणारही नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ पाहण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यातील मुसळ पहावे.
माझ्या आडनावावरून माझ्या विचारांना फुटीरतावादी ठरवणे ह्यालाच तुम्ही 'राष्ट्रीय' विचारसरणी म्हणत असाल तर बोलणेच खुंटले. पण तरीही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतो.
आज सत्तेच्या तुकड्यांसाठी लाचार होणाऱ्या नेत्यांमध्ये ब्राह्मण किती आहेत? आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून बहुजनांना मूर्ख बनवणारे त्यांचे नेते किती आहेत?
या देशातील ईशान्य आणि वायव्य भागात सैन्याचा वापर करून नियंत्रण का ठेवावे लागते? ब्राह्मण नष्ट झाल्याने ह्या भागातील समस्या नष्ट होणार आहेत का? जर ब्राह्मण फुटीरतावादी विचारांचे असते तर ब्राह्मण बहुसंख्य असलेल्या भागात सैन्य ठेवावे लागले असते. अथवा स्वातंत्र्य मिळताना इतरांनी जसे स्वत:साठी वेगळे राष्ट्र मागून घेतले तसे वेगळे ब्राह्मणी राष्ट्र मागितले असते.ब्राह्मण नसते तरी खलिस्तानची मागणी झालीच असती, ब्राह्मण नसते तरी पाकिस्तान झालेच असते, ब्राह्मण नसते तरी ईशान्य राज्यांमध्ये दहशतवाद पसरलाच असता. काश्मीरमध्ये दहशतवाद ब्राह्मणांनी निर्माण केलेला नाही. आणि ब्राह्मण सह्याद्रीला हिमालयापेक्षा मोठा मानून हिमालयाला लोळवण्याच्या वल्गना देखील करीत नाहीत.
जातीय / धार्मिक वर्चस्ववाद ब्राह्मणांमध्येही काही प्रमाणात आहे. पण ती केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात दक्षिणेतून वेगळ्या द्रविडीस्थानची मागणी केलीच होती. या सर्व गोष्टीना बहुजनांचा पाठींबा मिळावा म्हणून ब्राह्मणांचे नाव घेऊन त्यांची दिशाभूल केली जाते. तेव्हा बहुसंख्य लोकांनी हिमालयाला सह्याद्रीपेक्षा मोठा मानणे हा राष्ट्रवाद की सह्याद्रीला हिमालयापेक्षा मोठा मानणे हा राष्ट्रवाद हे तुम्हीच ठरवा.
@ परांजपे साहेब,
आपणाला ब्राम्हण निर्दोष वाटत असतील तर हरकत नाही. आम्हीही सर्व ब्राम्हणांना दोष देत नाही. बरेच ब्राम्हण चांगले (चांगल्या विचारांचे) आहेत, त्यांना आम्ही मनापासून मानतो. परंतु या देशाचे सर्वाधिक नुकसान (सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक)करण्यात ब्राम्हणी व्यवस्था कारणीभूत आहे हे आपणही जाणता. कदाचित हे सत्य पचवण्यास आपले मन आणि मेंदू तयार होणार नाही. परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ब्राह्मणवाद म्हणजे काय चीज आहे हे चांगले माहित आहे. समाजात नेतृत्व एका ठराविक प्रक्रियेतून पुढे येत असते. आजपर्यंत समाजाचे नेतृत्व करण्याची मूस ही वंशश्रेष्ठ्त्वाची होती. पण यापुढेही हेच चालत राहावे हे सामाजिक दृष्टीने योग्य होणार नाही. सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्थेचा उहापोह करताना जरा कुठे ब्राम्हणी व्यवस्थेवर टीका झाली तर लगेच समस्त ब्राह्मणावर टीका झाल्याचे मानू नये. आमचा लढा हा सामाजिक विषमतेविरुद्ध आहे. मग अशी विषमता ब्राम्हणाव्यतिरिक्त बहुजन समाजात आढळली तरी आमचा त्याला विरोधच राहील. परंतु एक गोष्ट सत्य आहे ती म्हणजे समाजातील सर्व विषमतेचे मूळ मात्र ब्राम्हणी वर्चस्ववाद किंवा या व्यवस्थेने निर्माण केलेल्या सामाजिक विषमतेमध्ये आहे.
सामाजिक/धार्मिक वर्चस्ववाद हा ब्राम्हनामध्ये आहे परंतु ती त्यांची मक्तेदारी नाही असे आपणास वाटते. परंतु जरा विचार केला तर आपणास असे आढळून येईल कि ती ब्राम्हनांचीच मक्तेदारी आहे. बहुजन समाजातील अनेक जातींमध्ये वर्चास्ववादाची भावना असते, परंतु हे ब्राम्हणी वर्चस्ववादाचे अनुकरण आहे. महत्वाचा फरक म्हणजे जिथे बहुजन समाजातील एखादी जात बहुसंख्य आहे तिथेच त्यांचा वर्चस्ववाद चालतो. परंतु ब्राम्हण मात्र अल्पसंख्य असूनही त्यांच्यात वर्चस्ववाद आहे, हे कसे काय ? अल्पसंख्य समाज कशाच्या आधारावर वर्चस्व गाजवू शकतो ? बहुसंख्य असणाऱ्या एखाद्या संघटीत जातीने वर्चस्ववाद जोपासला तरी तो फक्त त्यांच्या संख्याबळावर अवलंबून आहे असे दिसेल. परंतु ब्राम्हणी वर्चस्ववाद मात्र समाजाच्या सर्व क्षेत्रात आहे ते ही ब्राम्हण अल्पसंख्य असताना. आता याचे कारण तुम्ही द्याल कि 'ब्राम्हण समाज शिकला आहे आणि शिक्षणामुळे तो समाजात सर्वात पुढे आहे.' पण हे खरे नाही. ब्राम्हण समाज शिकला मात्र त्यांनी ज्ञानभांडाराच्या चाव्या स्वतःच्या कमरेला गुंडाळून ठेवल्या. त्या चाव्या हिसकावून घेवून बहुजन समाजाला शिक्षण खुले करण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीमाई, कर्मवीर अण्णा यांच्यासारखी माणसे पुढे आली. ब्राम्हणांनी स्वतःहून त्यांना शिक्षण उपलब्ध करून दिले नाही. धावण्याच्या शर्यतीत एका व्यक्तीला उभे करायचे आणि त्याचा पहिला नंबर आला म्हणून सर्वत्र त्याचे कौतुक करत फिरायचे हे हास्यास्पद आहे. फुले दाम्पत्याच्या कामी काही ब्राम्हण लोकांनीही मदत केली आहे. आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू, परंतु म्हणून ब्राम्हणी वर्चास्ववादाबद्दल बोलायचेच नाही हे योग्य नाही.
बहुजन चळवळीला फुटीरतावाद म्हणणे हे आपले मत अतिशय चुकीचे आहे. ज्या हिंसक चळवळींचा आपण उल्लेख केला त्यांची पार्श्वभूमी जरा अभ्यासा. त्या चळवळी कोणत्या सामाजिक समस्येतून निर्माण झाल्या, फोफावल्या ते पहा. अशा हिंसक चळवळी, ज्या देशाच्या हिताच्या आड येतील त्यांना विरोध झालाच पाहिजे. परंतु त्या चळवळी निर्माण होण्यामागची कारणे शोधून त्यावर उपाययोजना का केली जात नाही ? स्वतंत्र द्रविडीस्तान असेल किंवा खलिस्तान असेल त्यांचा उगम हा ब्राम्हणी वर्चस्ववादाच्या विरोधासाठीच झाला आहे.
'मग अशी विषमता ब्राम्हणाव्यतिरिक्त बहुजन समाजात आढळली तरी आमचा त्याला विरोधच राहील.'
- हा विरोध व्यक्त होताना दिसत नाही. कदाचित मी जन्माने ब्राह्मण असल्याने माझ्या भटी मेंदूत जन्मत: विकृती असावी. त्यामुळेच मला ब्राह्मणी वर्चस्वाची कावीळ झाली असण्याची शक्यता आहे.
'बहुजन समाजातील अनेक जातींमध्ये वर्चास्ववादाची भावना असते, परंतु हे ब्राम्हणी वर्चस्ववादाचे अनुकरण आहे.'
- साक्षात बाबासाहेबांचे संविधान लागू झाल्यावरही जर बहुजन समाज ब्राह्मण समाजाचेच अनुकरण करत असेल तर सगळा दोष ब्राह्मणांच्या माथी मारणे हे उपयुक्त असेल पण स्पृहणीय निश्चितच नाही. स्वत:चे हितसंबंध कसे जपावे हे प्रत्येक जातीला बरोबर कळते. म्हणूनच त्यांच्यात अंतर्गत झगडे चालू असतात. पण या गोष्टी चव्हाट्यावर आल्या तर तुमच्या आंदोलनाचे तीन तेरा वाजतील. त्यापेक्षा ब्राह्मणांना टार्गेट करणे जास्त सोपे आहे.
'ब्राम्हण समाज शिकला मात्र त्यांनी ज्ञानभांडाराच्या चाव्या स्वतःच्या कमरेला गुंडाळून ठेवल्या.'
- ब्राह्मण समाज शिकला कारण त्या समाजाने शिक्षणाचे महत्व ओळखले. बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व जर पटले असते तर आज फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून त्यांना कोणी मूर्ख बनवू शकले नसते. आज सत्ता आणि संपत्तीच्या चाव्या कोणाच्या कंबरेला बांधल्या आहेत याबद्दल सोयीस्कर मौन बाळगणे आणि दीडशे वर्षांपूर्वीच्या ब्राह्मणी अत्याचारांच्या कथा रंगवणे ह्यालाच सामाजिक विषमतेविरुद्धचा लढा म्हणत असावेत.
'स्वतंत्र द्रविडीस्तान असेल किंवा खलिस्तान असेल त्यांचा उगम हा ब्राम्हणी वर्चस्ववादाच्या विरोधासाठीच झाला आहे.'
- जर ब्राह्मणी वर्चस्ववाद हेच फुटीरतावादी चळवळीचे मुलभूत कारण असेल तर वेगळे खलिस्तान किंवा द्रविडीस्तान याऐवजी सरळ वेगळे बहुजनस्तान का मागितले जात नाही? याच आधारावर आंबेडकर देखील वेगळे दलितस्तान मागू शकले असते. आपापल्या धर्माचे / जातीचे नाव लावून वेगळे राज्य मागणे म्हणजे वर्चस्ववाद नाही तर काय आहे?
'जो माणूस अण्णांच्या पाठीशी आहे, त्यांच्या हो ला हो म्हणतो, तो चांगला. जरा वेगळी भूमिका घेतली कि तो गद्दार.'
- ह्या वाक्यात 'अण्णांच्या' ऐवजी 'बहुजनांच्या' हा शब्द घातला तर परिस्थिती काही फार वेगळी आहे असे नाही.
परांजपे म्हणतात - ब्राह्मण समाज शिकला कारण त्या समाजाने शिक्षणाचे महत्व ओळखले.
केवळ शिक्षणाचे महत्व ओळखले म्हणून ब्राम्हण समाज प्रगत झाला असे नाही तर, हे शिक्षण ब्राम्ह्णणेतरांना मिळू न देण्यासाठी जी वर्ण-जात व्यवस्था निर्माण केली व ती अत्यंत क्रुरपणे राबविली म्हणून ब्राम्हण 'जात' म्हणून प्रगत झाला. वर्ण-जाती च्या माध्यमातुन संपूर्ण देशाची ध्येय्य-धोरणांवर नियंत्रण ठेवणे ब्राम्हणांना शक्य आहे, त्यामुळे हा देश त्यांचा नसूनही तो त्यांना आपला वाटतो. देशाच्या निर्णयप्रक्रीयेतून ब्राम्हणेतर प्राचिन काळापसुनच बाहेर फेकला गेल्याने त्याला स्वतःचा देश 'आपला' वाटत नाही. म्हणून डॉ. बाबासाहेब म्हणतात, मि. गांधी मला मायभूमी नाही. जर बाबासाहेबांनी लहानपणी बुध्द वाचला नसता तर, त्यांनीही स्वतंत्र दलीत-स्थान मागीतले आसते. चाणक्यवादी ब्राम्हणांनी बौध्द धम्म या देशातून हद्दपार केल्यानंतरच देशांतर्गत फुटीरतावाद माजला, तेव्हापसून या देशावर परकीय आक्रामणे सूरु झालीत ती आजही थांबायचे नाव घेत नाहीत.
परांजपेंनी मूळातून अभ्यास व निरीक्षण केले पाहिजे.
---- प्रा. श्रावण देवरे, 9422788546
ज्यांना जगण्याची चिंता पडली आहे अशा बहुजनांसाठी आपण काय करत आहात? की ते बहुजन उपेक्षेच्या अंधारात खितपत मृत्यू पावले की मग ब्राह्मणांना दोष देऊन स्वत:चे उखळ पांढरे करून घेणार आहात?
vichar mandnyachya aani vidvatta pajalnyachya goshti sodun pratyaksha kruti ka karit nahi. babar kay tumcha purvaj hota....bamiyan prantat aatishay puratan aani pavitra budhh shilp tophechya tondi talibani mhanjech muslim kattarpanthiy det astana tumchi datkhil basali hoti...ishnya bhartatil khrishchan rashtravad urvarit bhartala todu pahtoy tyavar tumchi pratikriya nahi kalat...lakshit aani sampradaik hinsa vidheyak vachale aaahe ka..afzal gurula phashi deu naye aase kashmir vidhansabhet kase mhatale jau shakte.. rahul gandhi chi maitrin bhartiya ka asu shakat nahi..hindvi swarajya hi maharajanchi kalpana aaheki nahi...tuljabhavanicha drushtant ha pan bhanpak pana aahe ki kay....afzalkhanane murtya phodlya tumhi vichranchya navakhali tech kartay tuka mhane aishya nara kay karave...demography of europe site pahili ka....lahujinche shishyatva patkarun vasudev balwant ladhle ki nahi...ithe bahujananche varchaswa aase chitra disat nahi ka...aapali budhhi deshachya vikasasathi vapra.. samajvighatak aani futirtavadi vichar bas zale....soyisathi bjp che aamdarpad milvayche aani tyach pakshala manuvadi mhanayche he na jan nyaitpat lok murkh nahit...vidhyak aani murth thos krutishil yojna bharpur aahet aaani samajat shivajirao patwardhan nanasaheb gore baba aamte vikas prakash aamte mukta puntambekar dr. vikas kolhe aashi shantpane tevnari niranjane aahet..tyanchya mand shital pan nishchitpane samajpayogi prakashakade paha..aani srujanshil kruti kara...mazyasahit lakho nagrik ya abhiyanat twarit sahabhagi hotil...aani ho yala kewal tika samjun ....mhanje mi barobar chal loy asa bashkal mulama deu naka...
लोकशाहीला सर्वात मोठा धोका ज्या गोष्टीकडून आहे ती गोष्ट म्हणजे व्यक्तिमहात्म्य किंवा व्यक्तिपूजा. मग ते ओरिजिनल गांधी असोत किंवा दुसरे गांधी असोत. एकदा का लोकांनी आपले तारतम्य आणि सारासार विचार करण्याची क्षमता एका व्यक्तीच्या पायाशी गहाण टाकली की लोकशाहीचा अध:पात निश्चित सुरु होतो.
हे व्यक्तिमहात्म्य समाजाच्या सर्वच थरांमध्ये पसरलेले दिसत आहे. व्यक्तिमहात्म्य हे सत्तेच्या केन्द्रीकरणाचे प्रतीक आहे म्हणजेच पर्यायाने अनियंत्रित हुकूमशाहीचे प्रतीक आहे. हिटलरचा जुना सहकारी रुडॉल्फ हेस म्हणाला होता, "Adolf Hitler is Germany and Germany is Adolf Hitler ". अण्णांच्या आंदोलनाच्या वेळी प्रसिद्धी माध्यमांनी असेच काहीसे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा एखाद्या व्यक्तीचे हेतू कितीही चांगले असले, त्याच्या कामाची पद्धत कितीही प्रशंसनीय असली तरीही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही तात्कालिक कारणासाठी एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला सर्वाधिकारी होण्याचे अधिकार देणे म्हणजे स्पष्ट शब्दांत स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.
@Jidnyasu
tumache logic sagalyacha vyaktina lagu hote ka? ki kai apavad ahet? Pujaniy Dr. Babasaheb yanche karya mahan hote yabaddal kasalecha dumat nahi. pan tumache logic tyana pan lagu hote ka? Rajkiy nete Babasahebanche nav gheun apala swatha sadhat ahet ase vatate. Tech Shivaji maharajanbaddal chalu ahe.
@Anonymous
लोकशाहीला असलेल्या व्यक्तीपुजेच्या धोक्याची जाणीव सर्वात प्रथम करून देणारे बाबासाहेबच होते. ज्या वेळी शासनाने संविधानाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला त्या वेळी कडवा विरोध करणारे बाबासाहेबच होते. आज परिवर्तनवादी म्हणवून घेणाऱ्या शक्ती त्याच बाबासाहेबांना व्यक्तीपुजेच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक महापुरुषाला त्याच्या जातीपुरते बंदिस्त करून ठेवण्याचा हा गनिमी कावा आहे. ज्यांना शत्रूच्या गोटात शिरायचे असते त्यांना शत्रूचा वेष घालावा लागतो आणि शत्रूची भाषा बोलावी लागते. आज नेमके तेच चालले आहे.
ज्या ज्या वेळी ह्या देशातील लोकांचे धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला आहे त्या त्या वेळी शासनाला कडवा प्रतिकार सहन करावा लागला आहे. आज केवळ काश्मीर सारखा प्रदेश नियंत्रणात ठेवण्यासाठी सात लाख लष्कर + CRPF + पोलीस इतका भार देशाला उचलावा लागतो आहे. जर एखादा अविचारी मनुष्य परिवर्तनाच्या नावाखाली सत्ता बळकावून बसला तर काय अवस्था होऊ शकेल ह्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. इराक, लिबिया यासारख्या छोट्या देशांचा हुकुमशहा होणे वेगळे आणि भारतासारख्या विशाल बहुसांस्कृतिक देशाचा सर्वाधिकारी होणे वेगळे. समुद्रात वादळ चाललेले असताना शीड उभारणे हे धाडसाचे असले तरी शहाणपणाचे कृत्य निश्चितच नाही.
tumha lokanna mahit aselach ki anna he swat: brahman nahiyet, tar bahujan samajatun aahet. aata konatyahi vaeet goshtila brahmanvad, brahmanshahi, brahmani satta vagaire asle shabd vaparun batami karayachi mhanaje ati jhale. khari satta kayam marathyankade rahili. tyanchya virodhat bolu naka tumhi. te reservation magun tumacha vata hisakavanar OBC madhun. te karu det. tumhi konaviruddha lihave ha tumacha prashna aahe mhana.
aani he saggalikade brahman nav je vaparata na, te hyasathi jamate ki brahman hyavar akshep ghet nahit. mag tumhi ajun-ajun chidata tyavar.
babasahebanni adhikar dilay, jaga dilyat, mantra dilay, sanvidhan diley. tyacha vapar karun swat:cha aani paryayane rashtrac vikas karava he nakoy. kunala tari virodh karun, shivya ghalun lokanchi mathi bhadakavayala havit. mag kuthehi ghala braman shabd aani liha lekh. hyane kay honar? far tar daha bindok karti jama houn aani shivya ghalanar. vichar kara bandhunno! ase virodhatun nahi hot vikas! krutitun hoto. "shika - sanghatit vha - chalaval kara" he visaru naka.
Anonymous said...
tumha lokanna mahit aselach ki anna he swat: brahman nahiyet, tar bahujan samajatun aahet. aata konatyahi vaeet goshtila brahmanvad, brahmanshahi, brahmani satta vagaire asle shabd vaparun batami karayachi mhanaje ati jhale. khari satta kayam marathyankade rahili. tyanchya virodhat bolu naka tumhi. te reservation magun tumacha vata hisakavanar OBC madhun. te karu det. tumhi konaviruddha lihave ha tumacha prashna aahe mhana.
aani he saggalikade brahman nav je vaparata na, te hyasathi jamate ki brahman hyavar akshep ghet nahit. mag tumhi ajun-ajun chidata tyavar.
babasahebanni adhikar dilay, jaga dilyat, mantra dilay, sanvidhan diley. tyacha vapar karun swat:cha aani paryayane rashtrac vikas karava he nakoy. kunala tari virodh karun, shivya ghalun lokanchi mathi bhadakavayala havit. mag kuthehi ghala braman shabd aani liha lekh. hyane kay honar? far tar daha bindok karti jama houn aani shivya ghalanar. vichar kara bandhunno! ase virodhatun nahi hot vikas! krutitun hoto. "shika - sanghatit vha - chalaval kara" he visaru naka.
.................
सहमत आहे.
राष्ट्रवादीच्या विजयानंतर केजरीवाल आणि अण्णा यांच्यातील संवाद.
केजरीवाल: ए क्या बोलता तू?
अण्णा: ए क्या मै बोलू?
केजरीवाल: सुन
अण्णा: सुना
केजरीवाल: आता क्या दिल्ली को?
अण्णा: क्या करू आके मै दिल्ली को?
केजरीवाल: उपवास करेंगे, ज्यूस पियेंगे, ऐश करेंगे और क्या?
अण्णा: थक जाऊंगा सर्दी खांसी हो जायेगी मुझको.
केजरीवाल: इलेक्ट्रोलाईट लेकर जायेंगे पागल समझा क्या मुझको.
अण्णा: फोन लगा तू आरएसएस को जरा. पूछ ले आखिर है क्या माजरा? अरे पल में उछलती है पल में पलटती है कनफ्युज करती है बस क्या?
aaj ha lekh vachla khup fadtus lekh vatla.. ya lekhatun lekhakachya vikshipt budiche pradarshan hote :(
POL SIR -KRUPAYA EK PRASHANACHE UTTAR DYAWE?
APAN BAHUJANANCHE SAMARTHAK AHAT ASE DAKHAWATA.
GELI 60 WARSHE MARATHA PUDHARYANCHYA HATAT SATTA AHE
PUN (KAHI APAWAD WAGALATA) DALIT/OBC MUKYAMANTRI
KITIWELA ZALE.YAWAR SUDHA LEKH LIHA.
PRAGAT MARTHA SAMAJANE ATTA SATTA OBC/DALIT/MUSLIM
BANDHAWANKADE SOPWUN BAHUJAN WIKASALA WAHUN GHYAWE.
(EK OBC TARUN)
ही सर्व लढाई फक्त आणि फक्त सत्तेसाठीच चालली आहे. सर्वोच्च सत्तेमध्ये आपल्या जातीला आणि पर्यायाने आपल्याला वाटा मिळावा हाच प्रत्येकाचा उद्देश आहे. इथे इतरांना काय वाटते त्याची फिकीर करण्यास कोणाला वेळ आहे? स्वत:चे हेतू लपवण्यासाठी कधी त्यांना धर्माचा मुलामा द्यायचा तर कधी न्यायाचा. आज जे लोक सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आल्याचे ढोंग करत आहेत तेच उद्या सत्ता मिळाल्यावर एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसायला कमी करणार नाहीत. मोगलाईमध्ये हेच घडले, शिवशाहीमध्ये हेच घडले, पेशवाईमध्ये हेच घडले आणि आज एकविसाव्या शतकातही हेच घडत आहे. काळ बदलला तरी मानवी प्रवृत्ती बदलत नाहीत हेच खरे.
SATTECHYA WATA VIKASACHYAA MARGATUN GELYA TAR SAMRUDHHICHA PRAKASH APOAP PADEL.DIN DUBLE BHUMIHIN DALIT ADIVASI BHATKE ASHYA RAJSATTECHI WAT PAHAT THAKLE AHE HE APNA SAGLYANCHE DURBHAGYA TAR AHECH PAN SAMAJYACHYA ADHOGATICHE MOTHE LAKSHAN AHE.SAMAJIK PRASHNANKADE RAJKIYTENE PAHILE JATE YACHE WAIT VATTE
तुमचे विचार आता शुद्ध मराठीत :
सत्तेच्या वाटा विकासाच्या मार्गातून गेल्या तर समृद्धीचा प्रकाश अपोआप पडेल. दिन-दुबळे, भूमिहीन, दलित, आदिवासी, भटके अशा राजसत्तेची वाट पाहत ठाकले आहे हे अपना सगळ्यांचे दुर्भाग्य तर आहेच पण समाजाच्या अधोगतीचे मोठे लक्षण आहे. सामाजिक प्रश्नांकडे राजकीयतेने पहिले जाते याचे वाईट वाटते.
कृपया मराठीत लिहित रहा!
Deflector 2 . redirects a number high temperatures via combustion burning into your flue plates.
Beef roasts an chook, make the perfect 12" garlic bread, or just make 6-9 rounds off breads in a single work-time! Because you are nice people now shouldn't having a what you wish for, you actually argue (until you are definitely disciplined, in jail, and thus.).
My blog post :: making a toaster from scratch
ब्राम्हणांनी वर्ण व्यवस्था भारतीय समाजाच्या माथी मारली स्वजातीबद्दल आत्मीयता व परजातीबद्दल तिरस्कार हे ब्रान्हणी विचार बहुजनांनी अनुकरलले परंतु ब्राम्हण जर स्वत:ला हुशार समजतात तर जातीयवाद हे थोतांड आहे ब्राम्हण व शंकाराचार्य हे लोकांना का सांगत नाही मंदीरात पुजारी म्हणुन बहुजनांना का घेत नाही. मनुस्र्मूती हे एक थोतांड आहे असे ब्राम्हण स्वत: का जाहीर करीत नाहीत. बहुजनांनी ब्राम्हणाबद्दल काही जरी लिहीले तर लगेच प्रतिक्रिया व्यक्त होते परंतु बहुजनान बद्दल ते नीच जातीचे आहेत . असे जेव्हां ब्राम्हण उदगारतात तेव्हा काय? एक मात्र खरे आहे सर्व ब्राम्हण वाईट नाहीत.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ