खेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, एप्रिल ०७, २०११

क्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख

विश्वचषक अंतिम सामन्यात भारत विजयी झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत बी.सी.सी.आय. ने प्रत्येक खेळाडूला एक करोड रुपये देण्याची घोषणा केली.  भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला आणि  गर्भश्रीमंत असणाऱ्या सर्व खेळाडूंवर बक्षिसांच्या रुपाने करोडो रुपयांची उधळण झाली.  खेळाडूंना पैसा देण्यास आमचा विरोध नाही. परंतु क्रिकेटकडे इतके लक्ष देत असताना या देशातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न नजरेआड करून चालणार नाहीत.  जे लोक  देशासाठी आपली जमीन देतात. त्यांच्या जमिनीवर अनेक प्रकल्प उभे राहतात, त्या लोकांना मात्र आपले गाव सोडून आश्रीतासारखं दुसऱ्याच्या गावात राहायला लागतं. त्यांच्या मुला-बाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. या सर्व समस्या सोडवण्यासाठी हजारो लोक दररोज संघर्ष करत आहेत. खेळाडूंना सामना जिंकल्यावर बक्षीस देण्यासाठी जशी तत्परता दाखवली, तशी तत्परता प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी का दाखवली जात नाही ?  त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी वणवण भटकावं लागतं. काबाडकष्ट करावे लागतात. यांनी केलेल्या त्यागामुळे प्रकल्प उभे राहतात. त्याचा लाभ संपूर्ण देशाला होतो. तरीही ज्यांनी त्याग केलाय त्यांच्याकडे पाहायला सरकारला सवड नाही. क्रिकेटचा सामना हरला तर आपण रागाने लालबुंद होतो. खेळाडूंना शिव्या देतो. जर सामना जिंकला तर रस्त्यावर येवून जल्लोष करतो. खूप आनंदित होतो. परंतु या देशात लाखो लोक अत्यंत दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. त्याचे भान कुणाला आहे. या देशात अनेकांना आजही माणसाप्रमाणे स्वाभिमानी जीवन जगता येत नाही त्याचा खेद आपणाला वाटत नाही ? या देशात हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्यासाठी काय प्रयत्न होतात ? चार-दोन हजार रुपयांची सरकारी मदत मिळाली म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुटला असे समजायचे का ?

गुरुवार, मार्च ३१, २०११

'लंकादहन ' शब्दप्रयोग कशासाठी ?

भारताविरुद्ध असलेला पाकिस्तानचा सामना म्हणजे एक धर्मयुद्ध आहे, अशी भूमिका बऱ्याच लोकांनी घेतली. क्रिकेट सारख्या खेळाला धर्मयुद्धाचे, हिंदू-मुस्लीम वादाचे स्वरूप देवून सामान्य माणसाच्या भावना भडकावण्याचे पाप काही लोकांनी केले. पाक विरुद्धचा सामना आपण जिंकला. त्यानंतर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देताना हिंदुनी मुसलमानावर विजय मिळवला अशा प्रकारची मांडणी केली. आता आपला अंतिम सामना श्रीलंकेबरोबर आहे. भारत अंतिम फेरीत पोहचला ही सर्व भारतीयांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल जरूर तो आनंद व्यक्त करावा. परंतु आनंदाच्या प्रदर्शनाचा अतिरेक झाला तर मात्र आपला उन्मत्तपणा दिसून येतो. श्रीलंका हा भारताचा शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध मांडणी

मंगळवार, मार्च २९, २०११

भारत विरुद्ध पाक सामना म्हणजे धर्मयुद्ध नव्हे

बुधवार दिनांक ३० मार्च रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा विश्वकप क्रिकेट सामन्यातील उपांत्यफेरीतील सामना आहे. पाकिस्तान हा भारताचा पारंपारिक शत्रू आहे. त्यातच भारत हा हिंदुबहुल आणि पाकिस्तान हा मुस्लिमबहुल देश आहे. या दोन्ही धर्मातील कट्टरवादयानि दोन्ही धर्मातील तेढ नेहमी वाढतच ठेवली आहे. हिंदू विरुद्ध मुस्लीम हा वाद पेटवण्यासाठी त्या धर्मांध लोकांना निमित्तच हवे असते. ते निमित्त भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याने मिळाले. परंतु धर्मांध प्रवृत्तीने कोणाचाही फायदा न होता नुकसानच होत आहे, हे सामान्य माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. क्रिकेट हा खेळ आहे. त्यात जय-पराजय ठरलेला आहे. एक संघ विजयी होणार आणि दुसरा पराभूत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. (जर सामना बरोबरीत सुटला नाही किंवा पावसाने रद्द झाला नाही तर) मग असे असताना टोकाची धर्मांध भावना कशासाठी ? भारत-पाक क्रिकेट सामना म्हणजे काही हिंदू-मुस्लीम धर्मयुद्ध नव्हे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशाच्या संघाची बाजू घेवून त्याच्या विजयाची आशा ठेवणे गैर नाही. परंतु त्यामुळे दोन धर्मात तेढ वाढून विनाकारण सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये हीच इच्छा.

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes