lord ganesh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
lord ganesh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१३

गणेशोत्सव- जल्लोष, उन्माद आणि बरंच काही

गणपती हा शब्दच गणपतीचे मूळ स्वरूप दाखवून देतो. गणांचा अधिपती तो गणपती असा सरळ, साधा अर्थ आहे. शिव-पार्वतीचा पुत्र असणारा हा गणपती वैदिकांसाठी सुरुवातीला विघ्नकर्ता होता. त्याने विघ्न आणू नये म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीची आराधना करून होते. नंतरच्या काळात त्याचे मुळचे अवैदिक स्वरूप नष्ट होऊन त्याचे ब्राम्हणीकरण झाले. अवैदिक गणपतीचे वैदिक ब्रम्हणस्पतिबरोबर एकरूपत्व दाखवून गणेशाचे पूर्ण स्वरूप बदलवून टाकले. त्यासाठी जाणीवपूर्वक धार्मिक ग्रंथातून पूरक कथांची निर्मिती केली गेली.

गुरुवार, ऑक्टोबर २५, २०१२

अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख

डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या "बळीवंश" या ग्रंथात प्राचीन वैदिक ग्रंथातील काही पुरावे दिले आहेत. असुर व्यक्ती गणपती होत्या आणि असुर आणि शिवाचे नाते  याचे काही पुरावे . 

गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज

अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख
गणपती हा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख म्हणून विख्यात आहे. शंकराचे भक्त, सेवक आणि सैनिक असलेल्या गणांचा प्रमुख म्हणून त्याला गणपती, गणेश अशी नवे प्राप्त झाली आहेत. गणपती हे केवळ एखाद्या व्यक्तीचे वा देवतेचे नाव आहे, या दृष्टीने गणपतीकडे पाहण्याऐवजी एक अत्यंत महत्वाचे पद या दृष्टीने त्याच्याकडे पाहणे, हा खरा ऐतिहासिक दृष्टीकोन होय. शंकर

रविवार, सप्टेंबर ०४, २०११

गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज


बहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-धनाने साजरा करीत असतो. या उत्सवांदरम्यान बहुजन समाजाला इतर सर्व गोष्टींचा जवळ-जवळ विसर पडलेला असतो. सध्या गणपती उत्सवाचे वारे सगळीकडे वाहत आहे. अशा परिस्थितीत गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि त्यात बहुजन समाजाचा सहभाग यावर थोडक्यात केलेले भाष्य.....

गणपती
गणपती उत्सव हा बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलेला उत्सव. त्याआधी गणपतीची पूजा-अर्चा विशेषकरून पेशव्यांच्या दरबारी होत असे. परंतु स्वातंत्र्याचा लढा ऐन जोमात असताना टिळकांनी गणपती उत्सव सुरु केला. समाजात राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी, समाज उत्सवाच्या निमित्ताने एकत्र यावा, त्यांचे प्रबोधन व्हावे या हेतूने गणेश उत्सव सुरु केला असे सांगण्यात येते. गणेशोत्सव सुरु करण्यामागे वरील करणे जरी सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र याउलट परिस्थिती आहे. सध्या तर गणेशोत्सवाला अत्यंत हिडीस स्वरूप प्राप्त झाले आहे. गणेशोत्सव जवळ आला कि पोलिसांनाही सुरक्षा वाढवावी लागते. या काळात काही ठिकाणी धार्मिक दंगली घडून येण्याची शक्यताही असते. युवा पिढी बेभान होवून (दारू

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes