शनिवार, ऑक्टोबर २५, २०१४

भय इथले संपत नाही...

विधानसभेची निवडणूक नुकतीच संपली, ज्यामध्ये मतदारराजाने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात तुलनेने जास्त मताधिक्य टाकले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या १५ वर्षे सत्तेत असलेल्या आणि कथित फुले-शाहू-आंबेडकरवादी सरकारचा जोरदार पराभव झाला. समतावादी भूमिका असलेल्या या आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात खैरलांजी दलित हत्याकांड घडलं, जिथे भोतमांगे कुटुंबियांना दीर्घ प्रतीक्षेनंतर तुटपुंजा न्याय मिळाला. जातीय अत्याचार आणि दलितांवरील हल्ल्यांचे सत्र सर्वत्र वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या हिंसेचे क्रौर्य वाढलेले दिसते. नेवासा येथील सोनई हत्याकांड असो की खर्डा येथे नितीन आगे या महाविद्यालयीन तरुणाचा केलेला खून, या प्रकारच्या हल्ल्यांमधून ना सरकारी यंत्रणा शहाणी झाली, ना अन्यायाला वाचा फोडणारे आपण यातून...

गुरुवार, ऑक्टोबर २३, २०१४

खैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे...

दलित हत्याकांड हा समाजात नेहमीच ऐरणीवर असणारा विषय आहे. कारण वरचेवर देशात दलित समाजातील व्यक्तींवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे पुरोगामी म्हणवला जाणारा महाराष्ट्र दलितांवरील अन्याय, अत्याचारात सर्वात पुढे आहे. सहा-सात वर्षांपूर्वीच सार्या समाजमनाचा थरकाप उडवणारे खैरलांजी हत्याकांड झाले. या बिभत्स हत्याकांडाने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे सामाजिक वातावरण ढवळून निघाले. एकाच कुटूंबातील चार व्यक्तींची हत्या आणि त्या कुटुंबातील माय-लेकींवर झालेला बलात्कार याने कोणत्याही संवेदनशील माणसाचे मन द्रवले असेल. ...

रविवार, ऑक्टोबर ०५, २०१४

आरक्षण...आंदोलने आणि राजकारण...!

संजय सोनवणी, ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत. यंदाचे वर्ष धनगर, कोळी, वडार, रामोशी, हलबा-कोष्टी अशा अनेक भटक्या विमूक्त समुहांतील जाती-जमतींच्या आरक्षणासाठीच्या उग्र आदोंलनांनी गाजले. त्याला विधानसभा निवडणुकीचीही पार्श्वभुमी होती. धनगर समाज तर प्रथमच एवढ्या प्रचंड सम्ख्येने रस्त्यावर उतरला. माध्यमांनी पुरेशी दखल घेतली नसती तरी स्वातंत्र्योत्तर काळात एवढा मोठा जनसमूह रस्त्यावर उतरल्याचे उदाहरण नाही. एकाच दिवशी ४०० ठिकाणी आंदोलने घडवायचा विक्रमही झाला. ...

बुधवार, ऑक्टोबर ०१, २०१४

भारत-चीन संबंध: युद्ध व्यापाराच्या मैदानात...

प्रकाश पोळ. -------------------------------------------------------- 19 सप्टेंबरच्या सकाळमध्ये 'सावध ऐका,चिनी हाका' हा अग्रलेख वाचला. अग्रलेखात म्हंटल्याप्रमाणे भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंधामध्ये प्रगती साधण्यातील मुख्य अडथळा सीमाप्रश्नाबरोबरच परस्पर व्यापारातील तूट हाही आहे. गेल्या काही वर्षात चीनकडून होणारी भारताची आयात लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. परंतू भारत करत असलेली निर्यात मात्र त्या प्रमाणात वाढताना दिसत नाही. 1990-91 पर्यंत भारतासोबत...

MPSC च्या निर्णयामूळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय

'मागासवर्गीयांसाठीच्या सवलती घेणार्यांची खुल्या गटातील पदांसाठी शिफारस नाही' हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. वास्तविक पहाता मागास वर्गातील उमेदवार खुल्या वर्गातील आरक्षणासाठीही पात्र ठरतात. हेच आरक्षणाचे मूलभूत तत्व राज्यघटनेला ...

Page 1 of 3712345Next

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes