हा परशुराम होता तरी कोण ? हा यशवंत रायकर
यांचा दि. १४ ऑक्टोबरच्या अंकातील लेख आणि त्यावरील दि. २५ नोव्हेंबरच्या अंकातीलश्यामसुंदर गंधे यांची प्रतिक्रिया वाचली. धार्मिक ग्रंथातून परशुरामासंबंधी ज्या-ज्या
कथा आलेल्या आहेत त्यापैकी बहुतांशी काल्पनिक आहेत हे स्पष्ट आहे. परशुराम हा
विष्णूच्या अवतारांपैकी एक. हा एकमेव विष्णूअवतार चिरंजीव मानण्यात आलेला आहे.
मुळात परशुरामाचा संबंध अनेक पिढ्यातील लोकांबरोबर आल्याचे दाखवले आहे. पुराणात
वर्णन केल्याप्रमाणे जर परशुरामाचे वय काढायचे म्हटले तर ते हजारो वर्षे होईल. आणि
हजारो वर्षे कोणतीही व्यक्ती जिवंत राहू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
परशुरामाभोवती काल्पनिक आणि चमत्कारी घटनांची इतकी गुंफण करून ठेवली आहे कि
त्यामुळे परशुरामाचे खरे चरित्र समजणे फार अवघड आहे. त्यात रायकर यांनी लिहिल्याप्रमाणे
नरसंहाराचा उच्चांक गाठलेला असतानाही परशुरामाला आगळे दैवत्व प्राप्त झाले आहे.
त्यामुळे परशुराम हा लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. परंतु जर प्रामाणिक चिकित्सा
करायची असेल तर परशुराम या व्यक्तीवर चमत्कारांची, काल्पनिक कथांची जी पुटे चढवली
आहेत ती दूर करून परशुरामाचे चरित्र समजावून घ्यावे लागेल.
परशुरामाच्या आयुष्यात ज्या काही प्रमुख
घटना घडल्या त्यात परशुरामाने रेणुकेचा केलेला शिरच्छेद ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी
लागेल. चित्ररथ गंधर्वाला पाहून रेणुकेचे मन विचलित झाले. त्यामुळे जमदग्नी
रागावले आणि आपल्या पाच मुलांना रेणुकेचा वध करण्याची आज्ञा केली. त्यापैकी फक्त
परशुरामाने पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून आईचा शिरच्छेद केला. त्यानंतर जमदग्नी
पराशुरामावर संतुष्ट झाले आणि वर मागण्यास सांगितले. परशुरामाने आईला जिवंत
करण्याचा वर मागितला. रेणुका पुन्हा जिवंत झाली. एखादी व्यक्ती एकदा मरण
पावल्यानंतर पुन्हा जीवंत होवू शकत नाही. त्यामुळे रेणुका पुन्हा जिवंत झाली हे
पुराणकारांचे म्हणणे साफ खोटे आहे. त्यामुळे या कथेतील चमत्कारिक भाग वगळता परशुरामाने
आईचा शिरच्छेद केला हेच एकमेव सत्य दिसून येते. रेणुकेचा तथाकथीत अपराध झाला होतं
असे वादासाठी गृहीत धरले तरी शिरच्छेद करण्याची शिक्षा देण्याची काहीही गरज
नव्हती. तरीही जमदग्नीच्या आदेशावरून रेणुकेला पश्चातापाची किंवा स्वतःची बाजू
मांडण्याची कोणतीही संधी न देता परशुरामाने तिचा वध केला ही माणुसकीला काळीमा
फासणारी घटना म्हणावी लागेल. आणि याबाबतीत परशुरामाच्या कृतीचे कधीही समर्थन होवू
शकणार नाही.
परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय
केल्याच्या कथा रंगवून सांगितल्या जातात. पण गमतीचा भाग असा आहे कि एकदा पृथ्वी
निक्षत्रीय केल्यानंतर पुन्हा क्षत्रिय आले कोठून ? आणि जर संपूर्ण क्षत्रिय नष्ट
झाले नसतील तर पृथ्वी निक्षत्रीय केली असे आपण कसे म्हणू शकतो ? म्हणजे
पुराणकारानी इतक्या विसंगत कथा लिहिल्या आहेत त्यांचा बऱ्याच वेळा आपापसात ताळमेळ
लागत नाही. हैहय वंशातील राजांचे भृगु हे पुरोहित होते. पण त्यांच्यात नंतर वैर उत्पन्न
झाले. हैहय कुळातील कार्तविर्याने वसिष्टांचा आश्रम जाळला. त्यांनतर वसिष्ठाने
त्याला शाप दिला कि, ‘भार्गवकुलोत्पन्न परशुराम तुझा वध करील’. यामुळे जमदग्नी, परशुराम
आणि कार्तवीर्य हे वैर अधिक तीव्र झाले. कार्तविर्याने जमदग्नीची कामधेनु पळविली.
त्यामुळे रागावून परशुरामाने कार्तविर्याबरोबर युद्ध केले व त्याला ठार मारले.
कार्तविर्याच्या मृत्यूने संतप्त होवून त्याच्या मुलांनी जमदग्नीचा वध केला.
पित्याच्या वधाची बातमी कळताच परशुरामाने सर्व पृथ्वी निक्षत्रीय करण्याची
प्रतिज्ञा घेतली. आता या कथेत जमदग्नी, परशुराम आणि कार्तवीर्य यांचे वैर अधिक
भडकून त्याचे पर्यावसान कार्तवीर्य आणि जमदग्नी यांच्या हत्येत झाले हे दिसून
येते. परंतु यांनतर परशुरामाने पृथ्वी निक्षत्रीय करण्याची प्रतिज्ञा घेतली हे
कितपत संयुक्तिक होते ? जमदग्नीच्या मृत्युनंतर परशुरामाने अंग, वंग, कलिंग,
विदेह, दरद, त्रिगर्त, ताम्रलीप्ती, मालव इ. देशातील राजांचाही संहार केला.
त्याच्या क्षत्रिय संहाराची वर्णने तर भयानक आहेत. इतका नरसंहार करणारा परशुराम
आदरणीय कसा ठरावा ? समाजातील एखाद्या व्यक्तीशी, घटकाशी शत्रुत्व आहे म्हणून
संपूर्ण समाजाचा संहार करण्याची ही कृती निंदनीयच म्हंटली पाहिजे. कार्तविर्याने
जमदग्नीची कामधेनु पळवली होती ही कार्तविर्याची चूक झाली. परंतु त्यासाठी
कार्तविर्याची हत्या करणे म्हणजे किरकोळ चोरी करणाऱ्या चोराला फाशीची शिक्षा
देण्यासारखे आहे. कार्तविर्याने पळवलेली कामधेनु परत मिळवून किंवा त्याला आर्थिक
दंड करून परशुराम कार्तविर्याला योग्य शिक्षा करू शकला असता. परंतु परशुरामाने
कार्तविर्याची हत्या केली आणि हे वैर अधिक पेटले.त्याची परिणती पुढे हजारो
क्षत्रियांच्या हत्येत झाली.
आपण ब्राम्हण आहोत असे भासवून कर्ण
परशुरामाचा शिष्य बनतो. परंतु कर्णाचे सत्य एक दिवशी परशुरामास समजते. त्यानंतर
परशुराम कर्णाला शाप देतो कि तुला आयत्यावेळी मंत्राचा विसर पडेल. त्यामुळे अर्जुनाकडून
कर्ण मारला जातो. ही महाभारतातील कथा. इथे कर्ण हा जाती/वर्णव्यवस्थेचा बळी ठरला
आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. कर्ण ब्राम्हण नाही म्हणून तो विद्या ग्रहण
करण्यास अपात्र आहे असा परशुरामाचा समज होता. विद्या ग्रहण करण्यासाठी का होईना
कर्ण खोटे बोलला ही त्याची चूकच होती. परंतु ब्राम्हण असल्याचे भासवून शिक्षण घेणे
यापेक्षा ब्राह्मणेतरांना शिक्षणाचा अधिकार नाकारणे हा गंभीर अपराध म्हंटला
पाहीजे. आपल्या शिष्याची छोटीशी चूक झाली आणि तीही कुणाला फसवण्यासाठी, कुणाचे
नुकसान करण्यासाठी केलेली नव्हे तर शिक्षण घेण्यासाठी चूक केलेली असताना
परशुरामाने कर्णाला इतका मोठी शिक्षा देणे संयुक्तिक वाटत नाही. शाप देण्याची कृती
जरी काल्पनिक असली तरी त्यामागील जाणीवा, भावना अन्यायकारकच आहेत. रेणुका,
कार्तवीर्य, कर्ण या सर्वांच्याबाबतीत परशुरामाने केलेला व्यवहार न्यायाचा नव्हता
हे पुराणातील कथांवरून स्पष्ट होते. पराशुरामाच्या या कृती निश्चीतच समर्थनीय
ठरणार नाहीत. परशुरामाच्या चरित्राकडे पाहायचे असेल तर बुद्धिवादी आणि चिकित्सक
बनूनच पहावे लागेल आणि त्यासाठी श्रद्धेच्या पोकळ कल्पना आपणास बाजूला साराव्या
लागतील.
15 टिप्पणी(ण्या):
पोळ साहेब, किती विरोधाभास आहे तुमच्या लिखाणात?
सुरुवातीलाच म्हणता की "धार्मिक ग्रंथातून परशुरामासंबंधी ज्या-ज्या कथा आलेल्या आहेत त्यापैकी बहुतांशी काल्पनिक आहेत हे स्पष्ट आहे."
जर एकदा हे मान्य केलं की हे सगळं काल्पनिक आहे तर मग एवढ्या शंका तरी कशासाठी उपस्थित केल्यात? काल्पनिक आहे म्हणा आणि सोडून द्या की.. च्यायला त्यावरून उगाच ब्राह्मण, क्षत्रिय जाती ओढून ताणून आणल्यात लेखात. बी-ग्रेडी लोकं काही झालं तरी सुधारणार नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं..
अजून तरी ऐका.. तुमचा तो पुर्ष्या खेडेकर त्या शर्द्या पवाराच्या नादाने तुम्हा लोकांना भडकावतोय आणि तुम्ही लोकं काहीही अक्कल न वापरता उगाच डोक्यात राख घालून घेता आणि असं काहीतरी लिहीत/बरळत सुटता. हे जातीपातीवरून असे वाद उकरून काढणं संपूर्ण समाजाच्या दृष्टीने अत्यंत अत्यंत हानिकारक आहे. जात आणि धर्म हे सर्वस्व असू शकत नही. असू नये. अधिक उशीर व्हायच्या आत सुधारा !! ही धमकी नही विनंती आहे.
प्रकाश, धण्यावाद अतिशय सुरेख लेख लिहिला आहे. बहुजन समजयच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. ब्राह्माणी वर्चसवावद हा समपलेला नाही हे मी अनुभवावरून सांगतो. माझे काही ब्राह्माण मित्रा आहेत....बर्याच वेळा चर्चा करताताना सहज विषय निघतो आणि त्यांच्या मनात दाटून रहोलली ब्राह्माणी वर्चासववादाची भावना बाहेर पडतो.....दारू पिताना माझे एक मित्रा मला म्हणाले होिते....पण काहीही झाले तरी जुन्या काळातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि बलुतेदारि पद्धत हीच योग्या होती............आता हे कोनालापन सहज छान वाटेल.....मग मी विचारले "कारे कारण त्यावेळी तुम्हाला काही काम धंदा न करता लोकाणा देवडिकाच्या नावाने वेड्यात काढून फुकट जगता येत होते म्हणून का? कारण सगळी कामे बहुजन समाजाने करायची आणि याना त्यातील वाटा द्यायचा फुकट हे काय बरोबर नव्हते. असो आता परशूरामा विषयी माझा अनुभव............माझी एक ब्राह्माण मैत्रीण इतिहास सांगता सांगता म्हणाली.......आणि परशूरामाने २१ वेळा पृथ्वी निकशत्री......जिब अडखलाली आणि म्हणाली दुस्टन्चा नाश केला होता.................म्हणजे क्षत्रियांचा नाश केल्याचा अभिमान कुठे तरी आत लपालेला असतो.............आजही जेवा परशुराम संमेलन भारतात त्याचा काय अर्थ असतो हे पण हेरंब यानी सांगावे..............................परशूरामाचे ५० फुटी पोस्टर्स पुण्यात लावतात त्यातून काय हेतू असतो? जर पुरश्या आणि शरद्या (हेरंब तुमच्या भाषेत) वाईट असतील तर २१ वेळ पृथ्वी निकशत्रिय केल्याचा अभिमान बाळगणारे पण वाईट पाहिजेत की नाही?
या लिंक्सवर बरीच माहिती उपलब्ध आहे. महत्वाचे शब्द अवतरण चिन्हांत इथे देत आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Perkunas
(Perkūnas possesses many weapons. They include an "axe or sledgehammer", stones, a sword, lightning bolts, "a bow and arrows", a club, and an iron or fiery knife.)
http://en.wikipedia.org/wiki/Parshuram
("Parashu means axe in Sanskrit", hence the name Parashurama literally means "Rama with the axe". It is said that "he fired an arrow from his mythical bow" that landed in Goa, at a place called Benaulim(Konkani:Banavali or बाणावाली)
parshuram bramhani pravruttiche pratik aahe
aataperyt aaplala murkh banvvel aatapen tec chalu aahai kuthala parshuram aani kuthala vishanu sagle natek aahai yanchi yana lokona murkh banun aapli ghare chalvaychi
Prakash sir, good article. Bahujan samajala aaj purogami vicharanchi garaj ahe. Parshuram ha kokanasth bramhanancha purvaj ahe. Ko bra chya drushtine to tyancha mahanayak tharat asel. Pan parshuramane amachya kshatriy purvajana sampavale, tyancha nirvans kela tyache kay? Parshuram ha bahujananchya drushtine khalnayak ahe yat shankach nahi. Thanx again, amhala hi mahiti dilyabaddal.
Rakesh Deshmukh.
Thane.
Prakash sir, good article. Bahujan samajala aaj purogami vicharanchi garaj ahe. Parshuram ha kokanasth bramhanancha purvaj ahe. Ko bra chya drushtine to tyancha mahanayak tharat asel. Pan parshuramane amachya kshatriy purvajana sampavale, tyancha nirvans kela tyache kay? Parshuram ha bahujananchya drushtine khalnayak ahe yat shankach nahi. Thanx again, amhala hi mahiti dilyabaddal.
Rakesh Deshmukh.
Thane.
Prakash sir, good article. Bahujan samajala aaj purogami vicharanchi garaj ahe. Parshuram ha kokanasth bramhanancha purvaj ahe. Ko bra chya drushtine to tyancha mahanayak tharat asel. Pan parshuramane amachya kshatriy purvajana sampavale, tyancha nirvans kela tyache kay? Parshuram ha bahujananchya drushtine khalnayak ahe yat shankach nahi. Thanx again, amhala hi mahiti dilyabaddal.
Rakesh Deshmukh.
Thane.
माती मऊ लागली म्हणून कोपराने खणू नका. पस्तावाल.
बाबासाहेबांनी जशा धर्मांतराच्या वेळी प्रतिज्ञा केल्या होत्या त्याचप्रमाणे आता ज्या लोकांना ब्राह्मणांचे अस्तित्व सहन होत नाही त्यांनी प्रतिज्ञा कराव्यात.
१. ज्या प्रसूतीगृहात ब्राह्मण असतील तिथे आमची मुले जन्म घेणार नाहीत.
२. ज्या शाळेत ब्राह्मण शिक्षक असतील तिथे आमच्या मुलांना प्रवेश घेणार नाही.
३. आम्ही ब्राह्मण डॉक्टरकडे, वकिलाकडे, दुकानदाराकडे जाणार नाही.
४. विजय मल्ल्या ह्या ब्राह्मणाने बनवलेली दारू आम्ही ढोसणार नाही.
५. सचिन हा ब्राह्मण आहे म्हणून आम्ही त्याचा खेळ बघणार नाही तसेच त्याला भारतरत्न मिळू नये म्हणून प्रयत्न करू.
६. कोणाच्या गळ्यात जानवे आहे यावर ब्राह्मणापेक्षाही बारीक नजर आम्ही ठेवू.
७. सावरकर नावाच्या हलकट ब्राह्मणाने मराठी भाषेमध्ये इंग्रजी आणि उर्दूला पर्याय म्हणून जे प्रतिशब्द घातले आहेत ते सर्व शब्द वापरणार नाही.
८. ज्या मालिका किंवा चित्रपटांशी ब्राह्मणांचा संबंध असेल त्यावर बहिष्कार टाकू.
९. नवीन मित्र जोडण्याआधी जात विचारणे अनिवार्य असेल. ब्राह्मण असल्यास वाळीत टाकू.
१०. सध्या राजसत्तेच्या माध्यमातून जे सामान्य लोकांचे शोषण होत आहे त्यावर मौन बाळगून शेकडो वर्षांपूर्वी धर्मसत्तेच्या माध्यमातून काही ब्राह्मणांनी लोकांना कसे उल्लू बनवले त्यावरच "प्रकाश"झोत टाकत राहू.
बोला अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज श्री खेडेकर महाराज की जय!!
ब्राह्मणांनी फक्त एकच प्रतिज्ञा करावी. जोपर्यंत सर्व हिंदूंना देवळाच्या गाभाऱ्यात जाण्याचा, वैदिक मंत्र म्हणण्याचा आणि जानवे घालण्याचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत ब्राह्मण देखील या सर्व गोष्टी करणार नाहीत.
पर्शूरामापर्यंतचे अवतार ब्राम्हण होते. आर्य-टोळ्यांना राज्य प्रास्थापित करण्यासाठी एवढे अवतार घ्यावे लागलेत. परंतू परशूरामने क्षत्रियांचे खच्चीकरण केल्यानंतर तडजोडी सुरु झाल्यात. क्षत्रियांनी नंबर दोनचे स्थान स्वीकारले. त्यानंतर ब्राम्हणांना संस्कृतीविस्तारासाठी व सत्ताविस्तारासाठी प्रत्यक्ष युद्ध करण्याची गरज राहीली नाही, ते काम क्षत्रिय राम, कृष्ण वगैरंनी केलं. आजही राज्यकर्ते मराठा, जाट, पटेल, रेड्डी वगैरें असतात, सत्ता मात्र चाणक्यनितीच्या ब्राम्हणांकडेच असते.
परशुरामाची भाकडकथा!
फुल्यांनी केलेली परशुरामाची हजामत!
क्षत्रियांना पराभूत न करू शकलेला परंतु तरीही २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केल्याचा दावा करणारा. ब्राह्मण सोडून इतर कोणालाही विद्या न देण्याचे पाप करणारा आणि स्वत:च्या आईचे मुंडके उडवून क्रूरतेचा शिरोमणी ठरलेला परशुराम चिरंजीव आहे, असा दावा सनातनी ब्राह्मण करीत असतात. अशा कथा महाभारत, हरीवंशम आणि श्रीमद्भागवत पुराणात आहेत. परशुरासम जर चिरंजीव असेल, तर तो कोणाला तरी कुठे तरी नजरेस पडायला हवा. तसा तो आजपर्यंत कोणाच्याही नजरेस पडलेला नाही. मग हा चिरंजीव म्हणजे कधीही न मरणारा परशुराम कुठे आहे? हा प्रश्न माझा एकट्याचा नाही. महात्मा फुले यांनाही हाच प्रश्न पडला होता.
परशुरामाचा पर्दाफाश करणारे लिखाण फुल्यांनी मोठ्या प्रमाणात केले आहे. त्यावेळी पुण्यातल्या ब्राह्मणांनी त्यांच्या विरुद्ध आकांडतांडव केले. परंतु त्याला अजिबात भिक न घालता फुल्यांनी परशुरामाला उद्देशून एक जाहीर प्रकटनच त्यावेळच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध केले होते. १ ऑगस्ट १८७२ रोजी हे प्रकटन प्रसिद्ध झाले.
आज आपण हरवलेल्या व्यक्तींविषयी ज्या प्रकारचे जाहीर प्रकटन वृत्तपत्रात वाचतो, तसेच हे प्रकटन फुल्यांनी दिले होते. त्याचा हा मजकूर (समग्रस फुले वाङ्मयातील या पत्राच्या पानाचा फोटो सोबत जोडला आहे.) फुले म्हणतात :
चिरंजीव परशुराम उर्फ आदिनारायणाचा अवतार यास--
मुक्काम सर्वत्र ठायी,
अरे दादा परशुरामा, तूं ब्राह्मणांच्या ग्रंथांवरून चिरंजीव आहेस. तूं कडू कां होईना, परंतु विधिपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस. तुला पहिल्यासारखे कोळ्यांच्या मढ्यापासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत. कारण हल्ली येथे तू जे मढ्यापासून उत्पन्न केलेले ब्राह्मण (आहेत) त्यांपैकी कित्येक ब्राह्मण ‘विविधज्ञानी' बनून बसले आहेत. त्यांना कांही अधिक ज्ञानसुद्धा देण्याची तुला जरूरी पडणार नाही. फक्त तूं येथे ये आणि त्यांनी शूद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्यांस चांद्रायण प्रायश्चित्त देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत्रजादूच्या सामथ्र्याने पहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश, फ्रेंच वगैरे लोकांस करून दाखीव म्हणजे झाले. तू असा तोंड चुकवून पळत फिरू नको. पण एकंदर सर्व जगांतील लोक तू सर्वसाक्ष आदिनारायणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील. व तू तसे न केल्यास येथील महारमांग आमच्या म्हसोबाच्या पाठीस लपून बसलेल्या तुझ्या विविधज्ञानी म्हणविणाèया ब्राह्मण बच्चांस ओढून आणून त्यांची फटफजीती करण्यास कधी कमी करणार नाहीत. आणि तेणेंकरून त्यांच्या तुणतुण्याची तार तुटून त्यांच्या झोळींत दगड पडल्याने त्यांस विश्वामित्रासारिखे उपाशी मरू लागल्यामुळे कुत्र्याचे फरे खाण्याचा प्रसंग आणू नको.
आपला खरेपणा पहाणारा,
जोतीराव फुले,
तारीख १ ली, माहे आगस्ट
सन १८७२ इसवी, पुणे,
जुना गंज, घर नं. ५२७
Exellent.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ