गुरुवार, जून २३, २०११

शिवशक्ती-भीमशक्ती भाग ३- कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे बेगडी दलीतप्रेम

रामदास आठवले यांनी शिवसेनेचे धनुष्य खांद्यावर घेतल्यापासून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला. शिवसेना कशी जातीयवादी आहे आणि त्यांना बाबासाहेबांच्या विचारांची कशी अलर्जी आहे याचा लेखाजोखा सारेजण मांडत आहेत. ज्यांच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून आठवले सेनेसोबत गेले त्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेही आठवले आणि सेना या दोघांना टीकेचे लक्ष बनवले आहे. आठवलेंचे सेनेसोबत जाणे हा बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे, आठवले बाबासाहेबांचा विचार विसरले अशा प्रकारची मांडणी सत्ताधाऱ्यांनी सुरु केली. मुळात सत्ताधाऱ्यांना आठवलेंच्या या भूमिकेवर बोलण्याचा अधिकार आहे का तेही तपासून पाहायला हवे.   आठवले सेनेसोबत जाणार हे स्पष्ट होताच कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपले डावपेच खेळण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीने सामाजिक हक्क परिषद भरवून आम्हीच दलित मागास जनतेचे कैवारी...

सोमवार, जून २०, २०११

शिवशक्ती-भीमशक्ती भाग २- शिवसेना आंबेडकरी विचार पचवू शकेल ?

रामदास आठवलेंनी शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय घेवून सर्वच परिवर्तनवादी घटकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याला शिवसेनेचा आजपर्यंतचा इतिहास कारणीभूत ठरला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, मागास समाजाच्या उन्नतीसाठी चळवळ उभी केली. देशाच्या सामाजिक पटलावर आपले क्रांतिकारी विचार मांडले. प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्याना नेहमीच सामाजिक टीकेचे लक्ष बनावे लागले आहे. अन्यायकारक व्यवस्था उलथवून टाकून समतावादी समज निर्माण करण्यासाठी जे-जे महापुरुष धडपडले त्यांची प्रथमदर्शनी समाजाने उपेक्षाच केली. परंतु जेव्हा त्या महापुरुषांच्या कार्याचे खरे मोल समाजाने जाणले तेव्हा मात्र त्या महापुरुषांचा गौरव व्हायला सुरुवात झाली. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर या सर्वाना याच चक्रातून जावे लागले. डॉ....

रविवार, जून १९, २०११

शिवशक्ती-भीमशक्ती - भाग १ : केवळ आठवले गट म्हणजे संपूर्ण भीमशक्ती ?

सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, ते शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीच्या चर्चेमुळे. रामदास आठवले यांनी शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. आजपर्यंत दलितांचे तारणहार म्हणवून घेत हे पक्ष महाराष्ट्रातील बहुतांश दलित मतदार स्वतःकडे वळवून घेण्यात यशस्वी झाले होते. परंतु रामदास आठवलेंच्या शिवसेनेशी युती करण्यामुळे आपला पारंपारिक आणि हक्काचा मतदार असलेला दलित वर्ग आपल्यापासून दूर जाईल या भीतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी सैरभैर झाले आहेत. प्रसारमाध्यमातून या युतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु हि चर्चा करत असताना काही महत्वाच्या मुद्द्यांना जाणीवपूर्वक बगल दिली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही मुद्द्यांची चर्चा करुया. भाग १ : केवळ...

बुधवार, जून १५, २०११

प्रजाहितदक्ष लोकमाता अहिल्यामाई होळकर

३१ मे २०११ रोजी लोकमाता अहिल्यामाई होळकर जयंतीनिमित्त दैनिक प्रीतीसंगम (सातारा) मध्ये आलेला माझा लेख Print Pag...

Page 1 of 3712345Next

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes