
बाबासाहेब पुरंदरे याना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. पुरंदरे हे शिवचरित्राचे अभ्यासक मानले जातात. त्यानी 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी लिहिली आहे. पुरंदरे यांच्या समर्थकांचे असे म्हणने आहे कि पुरंदरे यानी शिवराय घराघरात पोहचवले. शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करण्यात पुरंदरे यांचा मोलाचा वाटा आहे.
...