बुधवार, एप्रिल २५, २०१८

मराठी बिग बॉसमधील कलाकारांची विकृत मानसिकता

सध्या मराठी बिग बॉस हा कलर्स वाहिनीवरील रिऍलिटी शो खूप चर्चेत आहे. या कार्यक्रमात काही स्पर्धकांना ठराविक दिवस एका घरामध्ये बंद करून ठेवलेले असते. त्यांना वेगवेगळे टास्क दिले जातात आणि त्यातून नामांकन व मतदानाच्या प्रक्रियेने एकेका स्पर्धकाला बाद ठरवले जाते. त्या घरातील स्पर्धकांचा बाहेरील जगाशी काहीही संबंध नसतो. मात्र घरात काय चालुय हे बाहेर सर्व जग पाहू शकते. 

बुधवार, डिसेंबर १३, २०१७

रविवार, ऑगस्ट ०६, २०१७

एमपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी क्लास लावावाच का?

नमस्कार मित्रानो, मी प्रकाश पोळ. राज्यसेवा 2016 परीक्षेतून गटविकास अधिकारी या  पदासाठी माझी निवड झाली आहे. रिजल्ट लागल्यापासून मी अनेक विद्यार्थी मित्रांशी बोललो आहे. बहुतेक जणांचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे पोस्ट मिळण्यासाठी क्लास लावलाच पाहिजे का? क्लास लावल्याशिवाय पोस्ट मिळत नाही का? हा प्रश्न सर्वाना पडण्याचे कारण म्हणजे सध्या MPSC/UPSC क्षेत्रात क्लासेसचे प्रचंड मार्केटिंग चालू आहे. निवड झालेल्या प्रत्येक अधिकार्याचा फोटो कोणत्या ना कोणत्या क्लासच्या बॅनरवर असतो. काही क्लासेस वर्तमानपत्रातून भल्या मोठ्या जाहिराती देतात. त्यात निवड झालेल्या बहुतांशी अधिकाऱ्यांची नावे आणि फोटो छापलेले असतात. 

शी इज् नॉट वर्जिन…

आज खूप दिवसांनी मला माझ्या काॅलेजचा मित्र भेटला. काॅलेजनंतर तब्बल २ ते ३ वर्षानी आम्ही एकमेकांना भेटलो. अचानक घड़लेल्या भेटीत अनेक विषयांवर आमचं चर्चासत्र आणि हास्याविनोद चालू असतानाच मी त्याला काॅलेजपासून सुरू असलेल्या त्याच्या लव्ह स्टोरीबदल विचारलं, त्यावर तो काहीच न बोलता फक्त शांत बसला.

त्याच्या या शांततेने माझ्या ड़ोक्यात एकामागून एक प्रश्नाचा घड़ीमार सुरू झाला. एकमेकांशिवाय एक मिनीट ही न राहू शकणारे हे रोमियो – जूलिएट अचानक वेगळे कसे झाले? का झाले असतील आणि कशामुळे? इंग्रजीच्या व्याकरणातील ‘Wh’ टाईप प्रश्नांची रांग माझ्या ड़ोळयासमोर उभी राहिली.

रविवार, जून १८, २०१७

माझा बाप आणि मी

लालासाहेब पोळ
आज Father's Day...आयुष्यभर ज्या बापाने खस्ता खाऊन आपणाला वाढवले त्या बापाच्या संघर्ष, त्यागापुढे नतमस्तक होण्याचा दिवस...सकाळीच मोबाईलचे इंटरनेट चालू केले आणि Father's Day चे मेसेज यायला लागले. काळजात चर्रर्र झाले. ज्या दिवशी पप्पा अपघातात गेले तो दिवस आठवला. 5 फेब्रुवारी 2013...आयुष्यातला काळा दिवस...वाटलं नव्हतं कि असं काही होईल...घरून फोन आला आणि ती दुःखद बातमी ऐकून अवसान गळून गेलं. 

शनिवार, एप्रिल १५, २०१७

अजून किती हुंडाबळी हवेत ?


दुर्दैवी शीतल वायाळ 


भिसे वाघोली जि. लातूर येथील शीतल वायाळ या मुलीने हुंड्याच्या भितीने आत्महत्या केली. मनाला अतिशय चटका लावणारी अशी ही घटना मराठवाड्याच्या

गुरुवार, एप्रिल १३, २०१७

MPSC TOPPER मुलाखत - प्रकाश पोळ (उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी- वर्ग १)

*नाव- प्रकाश लालासाहेब पोळ*

*M.Sc. Biotech/M.A. Pol. Sci.*

*Panel- व्ही. एन. मोरे सर*

*वेळ- ३५ मि.*

*गुण- ७०*

मी- May I come in Sir ?

मोरे सर- Yes. Come in.

मी- Good morning Sir. Good morning sirs.

मोरे सर- Have a seat.

मी- Thank you sir.

गुरुवार, जानेवारी २६, २०१७

जाहीर श्रद्धाप्रदर्शनावर बंधने योग्यच

वास्तविक पाहता भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ होतो कि राज्याला कोणताही धर्म नसेल. राज्य धर्माच्या नावाने नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. सर्व धर्माना समान वागणूक देईल. कोणत्याही एका धर्माला झुकते माप मिळणार नाही.

मंगळवार, जुलै ०५, २०१६

हिंसाचार : एक दृष्टिकोन

हिंसाचाराचा उगम आपणाला टोळीजीवनापासूनच दिसून येतो. पूर्वीच्या काळी जेव्हा समाज टोळी जीवन जगात होता, तेव्हा दोन टोळ्यांमधील परस्पर संबंधात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराचा उद्भव दिसून येतो. त्या टोळ्यांमध्ये स्त्रिया तसेच शिकार अशा अनेक कारणांवरून झगडे होत असत. हिंसाचार हा टोळी जीवनाचा एक अविभाज्य भागच बनून गेला होता. टोळी जीवनातील रूढ संकेतांनुसार हा हिंसाचार समाजमान्य होता. म्हणजे एका टोळीने दुसर्या टोळीवर

सोमवार, जानेवारी ११, २०१६

मालदा प्रकरण, कमलेश तिवारी आणि मुस्लिमांची आक्रमकता

७ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील मुस्लिम समाज आक्रमक होवून रस्त्यावर आला होता. जवळजवळ अडीच लाखांचा समुदाय रस्त्यावर येवून अतिशय हिंसक पद्धतीने व्यक्त झाला. अखिल भारतीय हिंदू महासभेचा स्वयंघोषित नेता कमलेश तिवारी याने मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी समाज माध्यमामध्ये अश्लाघ्य टिपण्णी केल्याने वाद निर्माण झाला. काय होता हा प्रकार , नेमकी कुणाची चूक होती जरा सविस्तर पाहूया. 

मंगळवार, जानेवारी ०५, २०१६

सह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण

नमस्कार वाचक मित्रहो,
आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष पूर्ण झाली. २९ नोव्हेंबर २०१० रोजी सह्याद्री बाणा हा ब्लॉग चालू केला. बहुजन हितासाठी चालू केलेल्या या ब्लॉगला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या २९ नोव्हेंबर ला ब्लॉगला पाच वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून ब्लॉगच्या पाच वर्षाच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घ्यावा असा विचार आहे.

ब्लॉगची सुरुवात-
प्रकाश पोळ
वर सांगितल्याप्रमाणे सह्याद्री बाणा या ब्लॉगची निर्मिती २९ नोव्हेंबर २०१० रोजी केली. त्याआधीदोन-अडीच वर्ष मी "विद्रोही विचार मंच" नावाचा ब्लॉग चालवत होतो. मुळात ब्लॉग तयार करण्याची गरज का पडली हेही समजून घेणे योग्य ठरेल. पुरोगामी विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी एखादे व्यासपीठ हवे होते. वैचारिक वाचन चालूच होते. त्यामुळे अनेक विचार सुचत, अनेक विचारांवर प्रतिक्रिया द्यावीशी वाटे. समाजात आपल्या आजूबाजूला घडणार्या अनेक गोष्टींवर मतप्रदर्शन करावे वाटे. त्यामुळे लोकमत, पुढारी अशा वर्तमानपत्रातून 'वाचकांचा पत्रव्यवहार' या सदरातून लिहिता झालो. लोकमत आणि पुढारीतून जवळजवळ शंभरभर पत्रे प्रसिद्ध झाली. यातील काही पत्रे विद्रोही विचार मंच या ब्लॉगवर टाकली आहेत. वाचकांचा पत्रव्यवहार मधून लिहिता लिहिता कराड, सातारा येथील स्थानिक वर्तमानपत्रातून लेख लिहू लागलो. स्थानिक वृत्तपत्रे लेख प्रसिद्ध करायचे,

बुधवार, डिसेंबर ३०, २०१५

'ते आपल्या जातीचे नाहीत' म्हणून लांब कसले राहता ?


दै. लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या या पत्रामुळे एबीपी माझा वर सदर विषयावर चर्चा आयोजित केली होती.



शनिवार, ऑक्टोबर ३१, २०१५

आरक्षण आणि गुणवत्ता यांचा संबंध काय ?

'राष्ट्रहिताच्या द्रुष्टीने उच्च शैक्षणिक संस्थांमधील आरक्षण रद्द होण्याची गरज' (लोकसत्ता, 28ऑक्टो.) ही बातमी वाचली. आंध्र आणि तेलंगाणा या राज्यानी वैद्यकीय संस्थांमधील सुपरस्पेशालिटी कोर्सेसच्या प्रवेशासाठी संबंधित राज्यांच्या रहिवासाची अट घातली होती.याविरुद्ध काही जणानी याचिका दाखल केली असता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण धोरणासंबंधी काही मते मांडली.

सोमवार, ऑगस्ट १७, २०१५

भोंदूंच्या व्यवस्थेवर हल्ला होणार का ?

राधे मां
सध्या 'राधे मां' च्या तथाकथित पराक्रमांवर माध्यमांमध्ये मोठी चर्चा चालू आहे. गेल्या काही दिवसात आसाराम बापू, रामपाल अशा अनेक भोंदूबाबांचा पर्दाफाश झाला आहे. मूळात भारत ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असताना अशा भोंदू बाबा-अम्मांची संख्या वाढत आहे ही गंभीर बाब आहे. 

बुधवार, मे १३, २०१५

बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद

बाबासाहेब पुरंदरे याना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. पुरंदरे हे शिवचरित्राचे अभ्यासक मानले जातात. त्यानी 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी लिहिली आहे. पुरंदरे यांच्या समर्थकांचे असे म्हणने आहे कि पुरंदरे यानी शिवराय घराघरात पोहचवले. शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करण्यात पुरंदरे यांचा मोलाचा वाटा आहे.

सोमवार, फेब्रुवारी १६, २०१५

दाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा ?

20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात हत्या झाली. दाभोळकरांचे मारेकरी पोलीसाना सापडू शकले नाहीत. निदान या प्रकारामागे कोणत्या शक्ती होत्या याचाही अंदाज पोलीसाना आला नाही. हे दुर्दैवी असले तरी सत्य आहे. त्यानंतर बरोबर दिड वर्षानी कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी, डाव्या विचाराच्या नेत्यावर खुनी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पानसरे अण्णा आणि त्यांच्या पत्नी उमा गंभीर

सोमवार, नोव्हेंबर २४, २०१४

ऐसे कैसे झाले भोंदू

देव कोणाला म्हणावं ? संत कोण आहे हे कसं ओळखावं ? या प्रश्नांची उत्तरे संत तुकोबानी साडेतीनशे वर्षांपूर्वीच दिली आहेत. तुकोबा म्हणतात,
"जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुला,
तोची साधू ओळखावा,
देव तेथेची जाणावा..."
साडेतीनशे वर्षांपूर्वी जे तुकोबांना उमगलं ते आज एकवीसाव्या शतकात आपणाला कळू नये यासारखी शोकांतिका नाही. दोन दिवसांपूर्वी हरियाणातील हिस्सार येथील रामपाल या तथाकथित बाबाला पोलीस कारवाई

गुरुवार, नोव्हेंबर १३, २०१४

MPSC : सवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात बंदी अन्यायकारक

दै. लोकसत्ता, १३/११/२०१४
नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मागासवर्गीयांच्या खुल्या जागेवर होणार्या शिफारसीबाबत एक दुर्दैवी निर्णय घेतला आहे. मागासवर्गीयांसाठी असणार्या वय/परिक्षा शुल्क अशा प्रकारच्या कोणत्याही सवलतींचा लाभ मागास वर्गातील उमेदवाराने घेतला तर त्यांची खुल्या गटातील जागेसाठी शिफारस होणार नाही अशा प्रकारचा हा निर्णय आहे. दैनिक लोकसत्तामध्ये ही बातमी वाचनात आली. याआधी मागासवर्गीय उमेदवारांचे मेरिट खुल्या जागेच्या 'कट ऑफ' पेक्षा जास्त असेल तर त्यांची निवड खुल्या गटातून होत असे. समजा खुल्या गटाचे 'कट ऑफ' 100 पैकी 50 असेल, तर ज्या मागासवर्गीय उमेदवारांचे मेरिट 50 किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांची निवड खुल्या गटातून व्हायची. परंतु एमपीएससी च्या या सुधारित निर्णयानूसार मागासवर्गीयांसाठी असणार्या कोणत्याही सवलती या वर्गातील उमेदवाराने घेतल्या तर त्यांचा खुल्या गटावरील दावा नाकारला जाणार आहे. वास्तविक मागास वर्गांना आरक्षण देताना घटनेने त्यांना त्याच वर्गापूरते मर्यादित ठेवलेले नाही. आरक्षित जागेवर त्याच वर्गातील उमेदवार दावा करु शकतात. खुल्या जागा मात्र सर्वांसाठी असतात. त्यामूळे मागास वर्गातील उमेदवारांवर विविध बंधने लादून त्यांचा खुल्या जागेवरील दावा नाकारण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे.

गुरुवार, नोव्हेंबर ०६, २०१४

भारताचा पाकिस्तान होऊ नये

'हे कसले पाक' (6 नोव्हेंबर) हा अन्वयार्थ लोकसत्तामध्ये वाचला. पाकिस्तानच्या कोट राधाकिशन या गावात एका ख्रिस्ती दाम्पत्याला ईश्वरनिंदेच्या आरोपावरुन ठार मारण्यात आले. पाकिस्तान हा धर्मांध विचाराने कसा गुरफटला आहे त्याची प्रचिती आली. कट्टर धर्मांधता आणि त्यामाध्यमातून होणारा हिंसाचार ही सर्वच जगाची अतिशय गंभीर समस्या आहे. धर्म, धार्मिक प्रतिके यांची विटंबना किंवा निंदा केल्याच्या आरोपावरुन अनेकाना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते, तिथले लष्कर आणि धार्मिक नेते यानी पाक मधील सामाजिक वातावरण नेहमीच गढूळ ठेवले. कट्टर धर्मांधता जोपासत त्यानी

शनिवार, ऑक्टोबर २५, २०१४

भय इथले संपत नाही...

विधानसभेची निवडणूक नुकतीच संपली, ज्यामध्ये मतदारराजाने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात तुलनेने जास्त मताधिक्य टाकले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या १५ वर्षे सत्तेत असलेल्या आणि कथित फुले-शाहू-आंबेडकरवादी सरकारचा जोरदार पराभव झाला. समतावादी भूमिका असलेल्या या आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात खैरलांजी दलित हत्याकांड घडलं, जिथे भोतमांगे कुटुंबियांना दीर्घ प्रतीक्षेनंतर तुटपुंजा न्याय मिळाला. जातीय अत्याचार आणि दलितांवरील हल्ल्यांचे सत्र सर्वत्र वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या हिंसेचे क्रौर्य वाढलेले दिसते. नेवासा येथील सोनई हत्याकांड असो की खर्डा येथे नितीन आगे या महाविद्यालयीन तरुणाचा केलेला खून, या प्रकारच्या हल्ल्यांमधून ना सरकारी यंत्रणा शहाणी झाली, ना अन्यायाला वाचा फोडणारे आपण यातून काही शिकलो आहोत!

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes