गुरुवार, मार्च ३१, २०११

'लंकादहन ' शब्दप्रयोग कशासाठी ?

भारताविरुद्ध असलेला पाकिस्तानचा सामना म्हणजे एक धर्मयुद्ध आहे, अशी भूमिका बऱ्याच लोकांनी घेतली. क्रिकेट सारख्या खेळाला धर्मयुद्धाचे, हिंदू-मुस्लीम वादाचे स्वरूप देवून सामान्य माणसाच्या भावना भडकावण्याचे पाप काही लोकांनी केले. पाक विरुद्धचा सामना आपण जिंकला. त्यानंतर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देताना हिंदुनी मुसलमानावर विजय मिळवला अशा प्रकारची मांडणी केली. आता आपला अंतिम सामना श्रीलंकेबरोबर आहे. भारत अंतिम फेरीत पोहचला ही सर्व भारतीयांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल जरूर तो आनंद व्यक्त करावा. परंतु आनंदाच्या प्रदर्शनाचा अतिरेक झाला तर मात्र आपला उन्मत्तपणा दिसून येतो. श्रीलंका हा भारताचा शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध मांडणी

मंगळवार, मार्च २९, २०११

भारत विरुद्ध पाक सामना म्हणजे धर्मयुद्ध नव्हे

बुधवार दिनांक ३० मार्च रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा विश्वकप क्रिकेट सामन्यातील उपांत्यफेरीतील सामना आहे. पाकिस्तान हा भारताचा पारंपारिक शत्रू आहे. त्यातच भारत हा हिंदुबहुल आणि पाकिस्तान हा मुस्लिमबहुल देश आहे. या दोन्ही धर्मातील कट्टरवादयानि दोन्ही धर्मातील तेढ नेहमी वाढतच ठेवली आहे. हिंदू विरुद्ध मुस्लीम हा वाद पेटवण्यासाठी त्या धर्मांध लोकांना निमित्तच हवे असते. ते निमित्त भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याने मिळाले. परंतु धर्मांध प्रवृत्तीने कोणाचाही फायदा न होता नुकसानच होत आहे, हे सामान्य माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. क्रिकेट हा खेळ आहे. त्यात जय-पराजय ठरलेला आहे. एक संघ विजयी होणार आणि दुसरा पराभूत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. (जर सामना बरोबरीत सुटला नाही किंवा पावसाने रद्द झाला नाही तर) मग असे असताना टोकाची धर्मांध भावना कशासाठी ? भारत-पाक क्रिकेट सामना म्हणजे काही हिंदू-मुस्लीम धर्मयुद्ध नव्हे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशाच्या संघाची बाजू घेवून त्याच्या विजयाची आशा ठेवणे गैर नाही. परंतु त्यामुळे दोन धर्मात तेढ वाढून विनाकारण सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये हीच इच्छा.

मंगळवार, मार्च २२, २०११

‘हरी नरके’ वादाची दुसरी बाजू

प्रा. हरी नरके
गेल्या काही दिवसात बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रा. हरी नरके आणि बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांच्यातील वादामुळे बहुजन कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. या वादात बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडची बाजू ‘मुलनिवासी नायक’ मधून नेहमी मांडली जाते. परंतु हरी नरकेंची बाजू पाहण्यात आली नव्हती. एखाद्या वादग्रस्त गोष्टीवर लिहीत, बोलत असताना दोन्ही बाजू ऐकून घेणे क्रमप्राप्त आहे. एकच बाजू आपण सातत्याने मांडायची आणि दुसऱ्याची बाजू ऐकूनच घ्यायची नाही किंवा दुसऱ्याला त्याची बाजू मांडायची संधीही द्यायची नाही हा शुद्ध पक्षपातीपणा आहे. तो पक्षपातीपणा मी तरी करणार नाही. याआधी चारच दिवसापूर्वी मी या ब्लॉगवर

गुरुवार, मार्च ०३, २०११

महात्मा फुले यांचे मामा परमानंद यांस पत्र.

मामा परमानंद यांस पत्र.....................
मुक्काम पुणे त|| २ माहे जून १८८६ ई||
राजमान्य राजेश्री नारायणराव माधवराव परमानंद मु|| आंबेर

......................... साष्टांग नमस्कार वि.वि. आपले त|| ३० माहे गुदस्तचे कृपापात्र पावले. त्याचप्रे|| पुण्याचे हायस्कुलातील भागवतमास्तर यांनी शंकर तुकाराम यांनी छापलेला पवाडयाचे पुस्तकातील काही शाहिरांची एक याद मजला आणून दिली, यावरून मी त्यास येक वेळी कळवले कि, सदरचे पवाडयाची प्रत मजजवळ नाही

मंगळवार, मार्च ०१, २०११

महात्मा फुल्यांची बदनामी का होते ?

महात्मा फुले
महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला. महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते. बळीराजा आणि इतर असुर हे आमचे खरे पूर्वज आहेत हे सत्य महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितले. बहुजन समाजाला शैक्षणिक दृष्ट्या सबळ बनवून ब्राम्हणी वर्चस्वाला खिंडार पाडले. बहुजनांचे खरे महानायक आणि त्यांचे खरे स्वरूप फुल्यानीच समजावून सांगितले. 

शनिवार, फेब्रुवारी १९, २०११

शिवरायांचा आठवावा विचार...


छ. शिवराय....स्वराज्याची स्थापना करून या मातीतल्या गोरगरीब माणसाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा देणारे युगपुरुष....स्त्रीला मातेचा दर्जा देवून, स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे अशी निर्मळ भूमिका घेणारे महामानव....या मातीत आत्मसन्मानाची फुंकर घालणारे दृष्टे राजे..... प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, “शिवाजी महाराजांचे नाव घेतले की ३३ कोटी देवांची फलटण बाद होते, इतकी ताकद 'शिवाजी' या नावात आहे”.

गुरुवार, फेब्रुवारी १७, २०११

शैक्षणिक क्रांतीच्या प्रणेत्यांची उपेक्षा कशासाठी ?




सावित्रीमाई
तर मित्रानो आजचा विषय तसा गंभीर आहे.  म्हटले तर गंभीर नाहीतर मानवतेला, बुद्धिवादाला ख़तपानी घालणारा  आहे.  बर्याच वेळा आपण आपला मुद्दा पूर्णपणे स्पष्ट करू शकत नाही.  त्यामुले काहीजणांचा  गैरसमज होण्याची शक्यता असते.  तसे पाहिले तर प्रतेक विषय हा बुद्धिवादाच्या कसोटितून घासून पुसून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. परंतु  समोरची व्यक्ति त्याच तळमळिने तो विषय समजुन घेतेच असे नाही.  त्यामुळे   गैरसमज निर्माण होऊन दोष माझ्यावर येणार याची जाणीव असून ही मी तो

बुधवार, फेब्रुवारी १६, २०११

संस्कृतीच्या ठेकेदारांची विकृती

सध्या फेसबुक वर प्रबोधन या शब्दाचा विसर पडलेले काही महाभाग सर्रास शिव्या आणि अश्लील भाषेचा वापर करू लागले आहेत. बहुजन समाजातील तरुणांनी शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांना अपेक्षित असलेली क्रांतीची, समाजपरिवर्तनाची चळवळ चालू केली आहे. त्यामुळे आपल्या सामाजिक, धार्मिक वर्चस्वाला धक्का पोहचेल या भीतीने संस्कृतीचे ठेकेदार बिथरले आहेत. एकदा का माणूस बिथरला की मग तो विचार मांडत नाही तर विकृती निर्माण करतो. आणि याचाच प्रत्यय सध्या फेसबुकवर येत आहे.

शुक्रवार, फेब्रुवारी ०४, २०११

लोकप्रतिनिधींच्या अंधश्रद्धा

कालच अंधश्रद्धेवर टीका करणारा एक लेख लिहिला. वानखेडे स्टेडियम वर झालेल्या सत्यनारायण पुजेसंदर्भात सदर लेख लिहिला होता. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अंधश्रद्धांचे उदात्तीकरण केले तर निश्चितच समाजात चुकीचा संदेश जाईल. 

येडीयुराप्पा
लगोलग अंधश्रद्धेवर हा दुसरं लेख लिहायला घेतलाय त्याचे कारण म्हणजे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या अंधश्रद्धाळू स्वभावाच्या चर्चा जनमानसात होवू लागल्या आहेत. येडीयुरप्पा यांना आपल्यावर काळ्या जादूचा वाईट परिणाम झाला असल्याने अनेक संकटे येत आहेत असे वाटत आहे. त्या काळ्या जादूचा प्रभाव संपवण्यासाठी येडीयुराप्पानी एक नामी शक्कल शोधून काढली आहे. अर्थातच त्यांना ही युक्ती त्यांच्या एखाद्या मांत्रिकाने सांगितली असेल. येडीयुराप्पानी लगेच ते प्रमाण मानून तीन दिवस विवस्त्र अवस्थेत फरशीवर झोपणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आपल्यावरील काळ्या जादुंमुळे आलेले संकट निघून जाईल असे येडीयुराप्पाना वाटते. यापूर्वीही येडीयुराप्पांच्या अंधश्रद्धांची काही प्रकरणे

गुरुवार, फेब्रुवारी ०३, २०११

अंधश्रद्धांचे उदात्तीकरण


हल्ली माणसाच्या भावना कशाने दुखावल्या जातील हे सांगता यायचे नाही. चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचे आणि त्याविरुद्ध कुणी बोलले, लिहिले कि आमच्या भावना दुखवल्या म्हणून बोंब मारायची हे नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे माणसांच्या भावनांचा कितपत विचार करायचा याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा नाही कि माणसाच्या भावनेला, त्याच्या श्रद्धेला काहीच किंमत नाही. चांगल्या गोष्टींबद्दल समाजात अनेक जणांची चांगली भावना असते. त्याला विरोध करायचे काहीच कारण नाही. परंतु समाजातील एखाद्या अनिष्ट रूढीचे, प्रथेचे समर्थन समाज करू लागला तर अशा वेळी मात्र त्यांच्या या भावनेचा विचार करून त्या अनिष्ट रुधीविरुद्ध कुणी बोलायचे, लिहायचे नाही हे कोणत्याही सुज्ञ  माणसाला पटणार नाही.

सोमवार, जानेवारी ३१, २०११

इतिहासाची पुनर्मान्डणी अत्यावश्यक

भुतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत माहीती म्हणजे इतिहास होय, अशी इतिहासाची व्याख्या केली जाते. त्यामुळे भूतकाळात जे घडले ते निपक्षपातीपणे सांगणे हा इतिहासाचा हेतू होय. परंतू आजपर्यंत बहुजनाना इतिहासाच्या नावाखाली त्यांच्याच पराभवाच्या, बदनामीच्या गोष्टी तिखट-मिठ लावून सांगीतल्या गेल्या. स्वाताच्या पूर्वजांचा इतिहास समजून घेण्यासाठी बहुजन समाज ब्राम्हनावर अवलंबुन राहीला हे बहुजन समाजाचे दुर्दैव होय. 

गुरुवार, जानेवारी २७, २०११

शिवशक्ती आणि भिमशक्तीचा नारा : किती खरा, किती खोटा ?

रामदास आठवले
महाराष्ट्रातील दलित चळवळीतील एक महत्वाचे नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकतीच सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत बाळासाहेबांनी शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या एकीकरणाचा नारा दिला. या भेटीत अजून कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे गुलदस्त्यात असले तरी या भेटीमुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

रविवार, जानेवारी २३, २०११

महान क्रांतिकारक : संगोळी रायन्ना

संगोळी रायन्ना
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रातील एक विद्वान म्हणायचे, “इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही आहे.” स्वताचा गौरव कुणाला आवडणार नाही. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यावर आपल्या धडावर दुसऱ्यांचे डोके असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मनापासून टाळ्या वाजवल्या. स्वताचा गौरव करणे ही काय वाईट गोष्ट नाही. परंतु या गौरवाला अहंकाराचा स्पर्श झाला तर इतिहासाचे विकृतीकरण व्हायला वेळ लागत नाही. या संकुचित प्रवृत्तीनीच छ. शिवराय आणि महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक यांना महाराष्ट्रापुरते संकुचित करून टाकले. त्यांचा आदर्श, त्यांचे चरित्र इतर राज्यातील लोकांपर्यंत नीट पोहचू दिले नाही. आपला सामाजिक, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या महामानवांच्या नावाचा, कर्तुत्वाचा दुरुपयोग केला गेला. परिणामी या महामानवांच्या कर्तुत्वाला जे राष्ट्रीय आणि सर्वसमावेशक स्वरूप लाभायला पाहिजे होते ते लाभले नाही. त्याच प्रमाणे दुसऱ्या राज्यातील महामानवांचे कर्तृत्वही महाराष्ट्रातील

शनिवार, जानेवारी २२, २०११

बाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज

बाबासाहेब पुरंदरे
बाबासाहेब  पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन समाजाच्या मनात शिवचरीत्राविषयी अनेक गैरसमज निर्माण करून ठेवले . शिवचरित्र म्हणजे पुरंदरे आणि पुरंदरे म्हणजे शिवचरित्र असे एक समिकरणच बनून गेले आहे. प्रचार-प्रसाराची माध्यमे ब्राम्हनान्च्या ताब्यात असल्याने त्यानी पद्धतशीरपणे ही कादंबरी म्हणजे सत्य इतिहास असा भास निर्माण केला आहे. सामाजिक जाणीव नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला पुरंदरेंची ही कादंबरी म्हणजे उत्कृष्ट साहित्य कृतीचा नमुनाच वाटेल आणि त्याबद्दल ते पुरंदरेंची प्रशंसाही करतील. आणि नेमके हेच दुर्दैव पुरोगामी महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे. पुरंदरेनी अतिशय चाणाक्षपणे या कादंबरीत अशी काही विधाने केली आहेत की सामान्य वाचकाला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही. परन्तु जिजाऊ-शिवरायांच्या बदनामीने पेटून उठलेल्या चिकित्सक बहुजन मावळ्याला मात्र पुरंदरेची ही लबाडी लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. पुरंदरेची ही लबाडी प्रा. श्रीमंत कोकाटे सरानी पुराव्यानिशी दाखवून दिली आहे. त्याचप्रमाणे चित्रलेखाचे संपादक प्रा. ज्ञानेश महाराव यानीही पुरंदरेचे लिखाण, आचार, विचार यातील विसंगती आणि लबाडी दाखवून दिली आहे.

गुरुवार, जानेवारी २०, २०११

“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक

उमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी नाईक उपेक्षित क्रांतिकारक आहे....कारण उमाजी नाईक हे रामोशी समाजातील. त्यामुळे त्यांचा खराखुरा इतिहास लिहिण्यापेक्षा लेखणी ज्यांच्या हातात आहे अशा लोकांनी पूर्वग्रह आणि जातीयवाद मनात बाळगून इतिहासाचे लेखन केले. त्यांच्या या उपद्व्यापामुळे उमाजी नाईक सारखे अस्सल हिरो झिरो झाले आणि झिरो हिरो झाले. ही कला अवगत असते ज्याच्या हातात प्रचार-प्रसार माध्यमे असतात त्याला. लोकांना एखादी खोटी गोष्ट सांगितली तर ती पटतेच असे नाही. परंतु एकच खोटे शंभर वेळा खरे म्हणून सांगितले तर लोकांना ते नक्की पटते. 

सोमवार, जानेवारी १७, २०११

कराड (आगाशिव) ची बौद्ध लेणी - कराडचे सांस्कृतिक वैभव

 कराडच्या  आगशिव डोंगरात कोरलेल्या बौद्ध लेण्या
कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे. कराड पासून ४ कि.मी. अंतरावर आगाशिव या ठिकाणी प्राचीन बौद्ध लेणी आहे. ती जवळपास ६४ आहेत. प्राचीन बौद्ध लेणी हा कराड चा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. एकेकाळी भारत हा बौद्धमय होता असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे कराड परिसर सुद्धा बौद्धमय होता याचे अनेक संदर्भ मिळतात. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी 'नांदलापूर' हे गाव आहे. प्राचीन काळी 'नालंदा' हे ऐतिहासिक बौद्ध विद्यापीठ सर्वांनाच माहित आहे. या 'नालंदा' वरूनच या गावाचे नाव 'नालंदापूर'  असे पडले असावे असे या परिसरात बोलले जाते. नंतर 'नालंदापूर' चा अपभ्रंश 'नांदलापूर' असा झाला.

रविवार, जानेवारी १६, २०११

मनातून जात नाही ती जात

जातींची उतरंड कधी नष्ट होणार ?
‘जात नाही ती जात’ असे जरी आपल्या जातीव्यवस्थेबद्दल किंवा जातींबद्दल बोललं जात असलं तरी ते पूर्ण सत्य नाही. ते अर्धसत्य आहे. कारण खरं सत्य आहे ते ‘मनातून जात नाही ती जात’. बऱ्याच वेळा या जाती नकोशा वाटतात. आरक्षणासारखा मुद्दा समोर आला तर मात्र या जातीव्यवस्थेचा (कि जातींचा) फारच तिटकारा यायला लागतो. या जाती नसत्या तर बरे झाले असते असे वाटू लागते. एकसंध समाज निर्माण व्हयला हवा अशी स्वप्ने काही जणांना पडू लागतात. परंतु खरोखर आपण मनातून जाती हद्दपार करू शकतो का ? या प्रश्नाचा प्रामुख्याने विचार करायला हवा. आणि माझातरी असा अनुभव आहे कि वरवर पाहता सर्व जाती-धर्माचे लोक दैनंदिन व्यवहारामध्ये जातीपातीना महत्व देत नाहीत असा भास निर्माण करत असले तरी मनातून मात्र जाती अधिक बळकट केल्या जातात. जातीव्यवस्था बळकट व्हायला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत त्याचा उहापोह करून या व्यवस्थेला सुरुंग लावण्याऐवजी जातीनाच दोष दिला जातो. आपणच कळत नकळत जाती कशा बळकट करत असतो त्याचा नुकताच विदारक परंतु अपेक्षित अनुभव आला. 

शुक्रवार, जानेवारी १४, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. वी. वाले आणि पेपर वाले सांगत होते. त्या सभेचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रभर दाखवले. पण राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यासाठी राज ठाकरेच्या सभेला जितकी गर्दी होती त्याच्या पाचपट गर्दी असूनही एकाही प्रसारमाध्यमाने त्यांची दखल घेतली नाही. लेख वाचा 'प्रसारमाध्यमांचा पक्षपातीपणा' ) त्या सभेत राज ठाकरेनी बोलण्याच्या ओघात अतिशय खोटारडे विधान केले. बहुजन समाजातील महामानवांचा सत्य इतिहास दडपून जातीयवादी इतिहास लादण्याचे प्रयत्न कसे होतात त्याचे ते विधान म्हणजे उत्तम नमुना होय.

सोमवार, जानेवारी ०३, २०११

भारतीयांची ज्ञानाई : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले
सामान्यतः समाजातील बहुतांशी लोक कालचक्राप्रमाणे वाहत जातात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात कि त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. आणि यातच त्यांचे युग प्रवर्तकत्व सामावलेले असते.
महात्मा जोतीराव फुले
भारताचा इतिहास हा जेवढा पुरुषांच्या उज्वल आणि दैदिप्यमान कारकिर्दीने भरून आणि भारून गेला आहे तेवढाच स्त्रियांच्या सामर्थ्यवान कामगिरीने भारतीय इतिहासाची अनेक सुवर्णपाने रेखाटली आहेत. परंतू आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या कामगिरीला योग्य तो सन्मान अजून मिळालेला नाही. आज भारत २१ व्या शतकात मार्गक्रमण करत आहे. गेल्या दीडशे वर्षात भारताने कमालीची शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती केली आहे. परंतु या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचाराचे स्मरण आपण कितपत करतो ? विकासाच्या आणि प्रगतीच्या गप्पा मारताना आपण या महामानवांच्या विचाराकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष करतो.

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes